शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

पुनर्वसित गावात समस्यांचे आगार

By admin | Updated: January 17, 2015 23:05 IST

निम्न वर्धा प्रकल्पात नेरी व पिपरी येथील गावकऱ्यांच्या शेतजमिनी गेल्याने या प्रकल्पग्रस्तांचे सालोड गावठाणावर पुनर्वसन करण्यात आले. पुनर्वसन करताना नागरी सुविधा देणे गरजेचे

वर्धा : निम्न वर्धा प्रकल्पात नेरी व पिपरी येथील गावकऱ्यांच्या शेतजमिनी गेल्याने या प्रकल्पग्रस्तांचे सालोड गावठाणावर पुनर्वसन करण्यात आले. पुनर्वसन करताना नागरी सुविधा देणे गरजेचे असताना येथे कुठल्याही सुविधा देण्यात आल्या नाहीत. गत १० वर्षापासून येथील रहिवासी मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत आहेत. या समस्या सोडविण्याकरिता येथील नागरिकांकडून अनेक वेळा मागणी करण्यात आली. मात्र याकडे कुणीही लक्ष दिले नाही. या भागात सध्या समस्यांचे आगार तयार झाले असून त्या सोडविण्याकरिता येथील रहिवासी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवीत आहेत. रहिवासी वस्तीत १८ नागरी सुविधा असणे अनिवार्य आहे. शिवाय या १८ सुविधा प्रत्येकाचा अधिकारही आहे. असे असताना या भागात या सुविधांची वाणवा आहे. पुनर्वसन झालेल्या या गावातील नागरिक हलाखीचे जीवन जगत आहेत. या गावात स्वतंत्र ग्रामपंचायत कार्यालय नसल्याने शासनाच्या कोणत्याही योजना त्यांना मिळत नाही. यामुळे या भागाचा विकास होत नसल्याची ओरड या भागातील नागरिकांची आहे. घराच्या भूखंडाची नोंद महसूलमध्ये करून मालकी हक्क द्यावे, शासनाकडून दिला जाणारा ४०० रुपये प्रतिमाह निर्वाह भत्ता अत्यल्प असून तो वाढवून दरमहा दरडोई एक हजार रुपये द्यावे, २००६ पासून प्रत्यक्ष शेती वाटप होईपर्यंत निर्वाह भत्ता सुरू ठेवावा, भूसंपादन प्रकरणात जिल्हा न्यायालयाने दिलेल्या नुकसान भरपाईच्या निकालाविरूद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल न करता त्याच निकालानुसार मोबदला देण्यात यावा, शेतीवरील पुनर्वसव अनुदान देताना न्यायालयाचा निकाल ग्राह्य धरावा, प्रकल्पग्रस्तांना आजन्म प्रकल्पग्रस्त निवृत्ती योजना लागू करावी, त्याकरिता वयाची अट ठेवू नये, प्रत्येक बाधित कुटुंबाला पाच लाख रुपये देण्याची तरतूद आहे. त्यानुसार इच्छुक प्रकल्पग्रस्तांना एकमुस्त पाच लाख देऊन त्यांच्या नोकरीचा हक्क वळता करावा, इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्यांचे निवेदन नुकतेच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देण्यात आले. यावेळी निमन वर्धा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण मिरगे, उपाध्यक्ष मोरेश्वर पिंपळे, सरचिटणीस विनोद कदम, बबन राऊत, प्रल्हाद खोब्रागडे, मधुकर वाघ, श्रीधर उईके, यांच्यासह गावाकरी उपस्थित होते.(प्रतिनिधी)