शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

उपसा सिंचन योजनेने वाढविली अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 22:13 IST

आर्वी तालुक्यातील ४९ गावातील ८४०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी आर्वी उपसा सिंचन योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे; पण मालतपूर शेतशिवारात शेतातच मेन लाईनपासून पाणी वाहून नेणारे पाईप टाकण्यात आल्याने व त्याकडे युद्धपातळीवर काम पूर्णत्त्वास नेण्याची जबाबदारी असलेल्यांचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांच्या उन्हाळवाहीच्या कामांनाच ब्रेक लागला आहे.

ठळक मुद्देकंत्राटदाराची मनमर्जी : उन्हाळवाहीच्या कामाला लागला ‘ब्रेक’

फनिंद्र रघाटाटे।लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : आर्वी तालुक्यातील ४९ गावातील ८४०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी आर्वी उपसा सिंचन योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे; पण मालतपूर शेतशिवारात शेतातच मेन लाईनपासून पाणी वाहून नेणारे पाईप टाकण्यात आल्याने व त्याकडे युद्धपातळीवर काम पूर्णत्त्वास नेण्याची जबाबदारी असलेल्यांचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांच्या उन्हाळवाहीच्या कामांनाच ब्रेक लागला आहे.सिंचनाची भरीव सोय व्हावी म्हणून शासनाने आर्वी उपसा सिंचन योजना लोअर वर्धा प्र्रकल्पाच्या बॅक वाटर वर सुरू केली आहे. सुरूवातीच्या आराखड्यानुसार या योजनेवर २५० कोटी पेक्षा अधिक खर्च होणार आहे. मागील वर्षी सर्व्हेचे काम पूर्ण करण्यात आले. तर यावर्षी वॉटर टँक आणि जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. हा प्रकल्प नियोजीत वेळेत पूर्ण झाल्यास खर्चाचे बजेट वाढणार नाही. त्यामुळेच प्रत्यक्ष कामाला युद्धपातळीवर सुरूवात करण्यात आली; पण सध्या कामाचा वेग मंदावला आहे. शिवाय मलातपूर शेतशिवारात अनेकांच्या शेतात कंत्राटदाराने मोठाले पाईप टाकून ठेवले आहे. हे पाईप खोलवर खड्डा करून त्यात वेळीच पुरविणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात धन्यता मानली जात आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. कंत्राटदाराने तातडीने सदर पाईप जमिनीत पुरवावे अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांसह नागरिकांची आहे.सदर योजनेचे काम झटपट पूर्णत्वास गेल्यास याचा फायदा शेतकºयांनाच होणार आहे. हे जरी खरे असले तरी मागील काही दिवसांपासून शेतात मोठमोठे पाईप पडून आहेत. त्यामुळे उन्हाळवाहीची कामे कशी करावी, असा प्रश्न भेडसावत आहे.- नरेश वानरे, शेतकरी, मलातपूर.