शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा

By admin | Updated: January 24, 2016 02:00 IST

राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता! मात्र याचे विस्मरण होऊन २६ जानेवारी या दिवशी मोठ्या अभिमानाने मिरवले जाणारे कागदी किंवा प्लास्टिकचे राष्ट्रध्वज ....

प्रशासनाला साकडे : जिल्हा व तालुका समित्या स्थापन करावर्धा : राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता! मात्र याचे विस्मरण होऊन २६ जानेवारी या दिवशी मोठ्या अभिमानाने मिरवले जाणारे कागदी किंवा प्लास्टिकचे राष्ट्रध्वज त्या दिवसापासूनच रस्त्यावर अन् गटारात फाटलेल्या अवस्थेत आढळतात. शिवाय प्लास्टिकच्या वापरामुळे ते लगेच नष्ट ही होत नाहीत आणि अनेक दिवस राष्ट्रध्वजाची ही विटंबना पहावी लागते. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये याची काळजी घ्यावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले आहे.ही विटंबना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका (१०३/२०११) दाखल केली आहे. याचा प्रतिसाद म्हणून न्यायालयाने शासनाला राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याचे आदेश दिले आहेत. हिंदु जनजागृती समिती १० वर्षांपासून राष्ट्रध्वजाच्या अवमानाविरोधात कार्यरत आहे. त्यासाठी शाळांमधून व्याख्याने आणि प्रश्नमंजुषा घेणे, जनजागृतीपर ध्वनीचित्रफित स्थानिक केबल आॅपरेटरच्या माध्यमातून दाखवणे, फ्लेक्स लावणे, हस्तपत्रकांचे वाटप करणे, सामाजिक संकेतस्थळावरुन मोहीम राबविणे आदी माध्यमातून समिती प्रयत्न करत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार आणि डिसेंबर २०१४ च्या गृह विभागाच्या परिपत्रकानुसार (गृह विभाग, परिपत्रक कं्र. ०३१३/७१४/प्र. क्र. ६२/ विशा १ अ, दि. डिसेंबर २०१४) शासनाच्यावतीने राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर कृती समिती स्थापन करण्यात यावी. कार्यक्षेत्रातील शाळांमधून राष्ट्रध्वजाच्या सन्मानाविषयी जनजागृतीपर व्याख्याने आणि प्रश्नमंजुषा घेण्यासाठी हिंदु जनजागृती समितीला सहभागी करण्यात यावे. राज्यशासनाने पोलीस ठाण्यांना विशेष सूचना देऊन रस्त्यावर आणि अन्य ठिकाणी पडलेले राष्ट्रध्वज गोळा करण्याचे नियोजन करुन ध्वजसंहितेनुसार त्याचे विसर्जन करावे, अशी मागणी निवासी जिल्हाधिकारी वैभव नावडकर, पोलीस उपअधीक्षक आर.जी. किल्लेकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सुनंदा हरणे, हिंदु जनजागृती समितीचे सुमती सरोदे आदींची उपस्थिती होती.(शहर प्रतिनिधी)जनजागृतीची गरजशाळांमधून व्याख्याने आणि प्रश्नमंजुषा घेणे, जनजागृतीपर ध्वनीचित्रफित स्थानिक केबल आॅपरेटरच्या माध्यमातून दाखवणे, फ्लेक्स लावणे, हस्तपत्रकांचे वाटप करणे, सामाजिक संकेतस्थळावरुन मोहीम राबविणे आदी माध्यमातून समिती प्रयत्न करत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.