शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा

By admin | Updated: January 24, 2016 02:00 IST

राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता! मात्र याचे विस्मरण होऊन २६ जानेवारी या दिवशी मोठ्या अभिमानाने मिरवले जाणारे कागदी किंवा प्लास्टिकचे राष्ट्रध्वज ....

प्रशासनाला साकडे : जिल्हा व तालुका समित्या स्थापन करावर्धा : राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता! मात्र याचे विस्मरण होऊन २६ जानेवारी या दिवशी मोठ्या अभिमानाने मिरवले जाणारे कागदी किंवा प्लास्टिकचे राष्ट्रध्वज त्या दिवसापासूनच रस्त्यावर अन् गटारात फाटलेल्या अवस्थेत आढळतात. शिवाय प्लास्टिकच्या वापरामुळे ते लगेच नष्ट ही होत नाहीत आणि अनेक दिवस राष्ट्रध्वजाची ही विटंबना पहावी लागते. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये याची काळजी घ्यावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले आहे.ही विटंबना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका (१०३/२०११) दाखल केली आहे. याचा प्रतिसाद म्हणून न्यायालयाने शासनाला राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याचे आदेश दिले आहेत. हिंदु जनजागृती समिती १० वर्षांपासून राष्ट्रध्वजाच्या अवमानाविरोधात कार्यरत आहे. त्यासाठी शाळांमधून व्याख्याने आणि प्रश्नमंजुषा घेणे, जनजागृतीपर ध्वनीचित्रफित स्थानिक केबल आॅपरेटरच्या माध्यमातून दाखवणे, फ्लेक्स लावणे, हस्तपत्रकांचे वाटप करणे, सामाजिक संकेतस्थळावरुन मोहीम राबविणे आदी माध्यमातून समिती प्रयत्न करत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार आणि डिसेंबर २०१४ च्या गृह विभागाच्या परिपत्रकानुसार (गृह विभाग, परिपत्रक कं्र. ०३१३/७१४/प्र. क्र. ६२/ विशा १ अ, दि. डिसेंबर २०१४) शासनाच्यावतीने राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर कृती समिती स्थापन करण्यात यावी. कार्यक्षेत्रातील शाळांमधून राष्ट्रध्वजाच्या सन्मानाविषयी जनजागृतीपर व्याख्याने आणि प्रश्नमंजुषा घेण्यासाठी हिंदु जनजागृती समितीला सहभागी करण्यात यावे. राज्यशासनाने पोलीस ठाण्यांना विशेष सूचना देऊन रस्त्यावर आणि अन्य ठिकाणी पडलेले राष्ट्रध्वज गोळा करण्याचे नियोजन करुन ध्वजसंहितेनुसार त्याचे विसर्जन करावे, अशी मागणी निवासी जिल्हाधिकारी वैभव नावडकर, पोलीस उपअधीक्षक आर.जी. किल्लेकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सुनंदा हरणे, हिंदु जनजागृती समितीचे सुमती सरोदे आदींची उपस्थिती होती.(शहर प्रतिनिधी)जनजागृतीची गरजशाळांमधून व्याख्याने आणि प्रश्नमंजुषा घेणे, जनजागृतीपर ध्वनीचित्रफित स्थानिक केबल आॅपरेटरच्या माध्यमातून दाखवणे, फ्लेक्स लावणे, हस्तपत्रकांचे वाटप करणे, सामाजिक संकेतस्थळावरुन मोहीम राबविणे आदी माध्यमातून समिती प्रयत्न करत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.