शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा

By admin | Updated: January 24, 2016 02:00 IST

राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता! मात्र याचे विस्मरण होऊन २६ जानेवारी या दिवशी मोठ्या अभिमानाने मिरवले जाणारे कागदी किंवा प्लास्टिकचे राष्ट्रध्वज ....

प्रशासनाला साकडे : जिल्हा व तालुका समित्या स्थापन करावर्धा : राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता! मात्र याचे विस्मरण होऊन २६ जानेवारी या दिवशी मोठ्या अभिमानाने मिरवले जाणारे कागदी किंवा प्लास्टिकचे राष्ट्रध्वज त्या दिवसापासूनच रस्त्यावर अन् गटारात फाटलेल्या अवस्थेत आढळतात. शिवाय प्लास्टिकच्या वापरामुळे ते लगेच नष्ट ही होत नाहीत आणि अनेक दिवस राष्ट्रध्वजाची ही विटंबना पहावी लागते. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये याची काळजी घ्यावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले आहे.ही विटंबना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका (१०३/२०११) दाखल केली आहे. याचा प्रतिसाद म्हणून न्यायालयाने शासनाला राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याचे आदेश दिले आहेत. हिंदु जनजागृती समिती १० वर्षांपासून राष्ट्रध्वजाच्या अवमानाविरोधात कार्यरत आहे. त्यासाठी शाळांमधून व्याख्याने आणि प्रश्नमंजुषा घेणे, जनजागृतीपर ध्वनीचित्रफित स्थानिक केबल आॅपरेटरच्या माध्यमातून दाखवणे, फ्लेक्स लावणे, हस्तपत्रकांचे वाटप करणे, सामाजिक संकेतस्थळावरुन मोहीम राबविणे आदी माध्यमातून समिती प्रयत्न करत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार आणि डिसेंबर २०१४ च्या गृह विभागाच्या परिपत्रकानुसार (गृह विभाग, परिपत्रक कं्र. ०३१३/७१४/प्र. क्र. ६२/ विशा १ अ, दि. डिसेंबर २०१४) शासनाच्यावतीने राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर कृती समिती स्थापन करण्यात यावी. कार्यक्षेत्रातील शाळांमधून राष्ट्रध्वजाच्या सन्मानाविषयी जनजागृतीपर व्याख्याने आणि प्रश्नमंजुषा घेण्यासाठी हिंदु जनजागृती समितीला सहभागी करण्यात यावे. राज्यशासनाने पोलीस ठाण्यांना विशेष सूचना देऊन रस्त्यावर आणि अन्य ठिकाणी पडलेले राष्ट्रध्वज गोळा करण्याचे नियोजन करुन ध्वजसंहितेनुसार त्याचे विसर्जन करावे, अशी मागणी निवासी जिल्हाधिकारी वैभव नावडकर, पोलीस उपअधीक्षक आर.जी. किल्लेकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सुनंदा हरणे, हिंदु जनजागृती समितीचे सुमती सरोदे आदींची उपस्थिती होती.(शहर प्रतिनिधी)जनजागृतीची गरजशाळांमधून व्याख्याने आणि प्रश्नमंजुषा घेणे, जनजागृतीपर ध्वनीचित्रफित स्थानिक केबल आॅपरेटरच्या माध्यमातून दाखवणे, फ्लेक्स लावणे, हस्तपत्रकांचे वाटप करणे, सामाजिक संकेतस्थळावरुन मोहीम राबविणे आदी माध्यमातून समिती प्रयत्न करत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.