शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

शेताचा ताबा सोडण्यासाठी वन कर्मचाऱ्यांकडून दबाव

By admin | Updated: June 20, 2014 00:01 IST

नजीकच्या वरूड (साती) येथील सखाराम बिजाराम कुडमते (६५) हे आदिवासी शेतकरी गत ३५ ते ४० वर्षांपासून वरूड येथील ०.८९ आर. जमिनीवर शेती करीत आहे़ यातूनच त्यांच्या कुटुंबाचे गुजराण होत आहे़

मोझरी (शे़) : नजीकच्या वरूड (साती) येथील सखाराम बिजाराम कुडमते (६५) हे आदिवासी शेतकरी गत ३५ ते ४० वर्षांपासून वरूड येथील ०.८९ आर. जमिनीवर शेती करीत आहे़ यातूनच त्यांच्या कुटुंबाचे गुजराण होत आहे़ यात अस्मानी व सुलतानी संकटामुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे. या परिक्षेत्रातील वनकर्मचारी या जमिनीवरील ताबा सोडण्यासाठी दबाव आणत आहेत़ या प्रकारामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे़ याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़तुम्ही वाहत असलेल्या जमिनीचा पट्टा वनविभागाच्या क्षेत्रात आहे़ तुम्ही जमिनीचा ताबा सोडा, असे वनकर्मचारी सांगत आहेत़ हे वाक्य ऐकून कुडमते यांना धक्काच बसला़ निरक्षर असलेले सखाराम कुडमते हे गत ३५ ते ४० वर्षांपासून सदर जमिनीवर शेती करीत आहे़ गावस्तरावर वनहक्क समितीच्यावतीने ही जमीन कुडमते यांना वाहू देण्यात यावी, या ठराव पारित करून मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे़ तो प्रस्तावित असल्याचे समजते़ २००९ मध्ये ग्रा.प. प्रशासनानेही याबाबत नाहरकत दिले आहे़ २०११ मध्ये जिल्हा वनहक्क समितीकडे अर्ज सादर करण्यात आला होता; पण त्यांना कोणतेही उत्तर मिळाले नाही. शिक्षणाचा गंध नसलेले सखारामजी पारंपरिक पद्धतीने ०.८९ आर जमीन गत ३५ ते ४० वर्षांपासून कसत आहे़ नापिकीमुळे परिसरातील शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढून शेतकरी आत्महत्या वाढत आहे़ यातच शासकीय कर्मचारी निरक्षर आदिवासी शेतकऱ्यांचे उदनिर्वाहाचे साधन हिसकावत असतील तर शेतकऱ्याने कुणाकडे दाद मागावी, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ सदर परिक्षेत्राचे वनकर्मचारी गत काही दिवसांपासून वरूड येथील शेतकरी कुडमते यांना शेताचा ताबा सोडण्यासाठी दबाव आणत आहेत़ संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे़(वार्ताहर)