शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
2
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
3
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
4
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
5
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
6
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
7
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
8
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
9
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
10
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
11
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध
12
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
13
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
14
राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांत शाळाच नाही; केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश
15
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
16
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
17
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
18
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
19
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
20
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 

रस्त्यावर खड्डे; बसेस आल्या धक्क्यावर

By admin | Updated: September 1, 2014 23:49 IST

पावसाळ्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या अखत्यारितील रस्त्यांची डागडुजी करण्याचा प्रयत्न केला; पण पावसाने त्या दुरूस्तीची पोलच खोलली़ शिवाय रस्ते विकास महामंडळाचे रस्तेही उखडलेत़

वर्धा : पावसाळ्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या अखत्यारितील रस्त्यांची डागडुजी करण्याचा प्रयत्न केला; पण पावसाने त्या दुरूस्तीची पोलच खोलली़ शिवाय रस्ते विकास महामंडळाचे रस्तेही उखडलेत़ यामुळे जिल्ह्यातील प्रमुख रस्ते खड्डेमयच दिसतात़ या खड्ड्यांमुळे होणारा त्रास आणि नुकसान मात्र परिवहन महामंडळाला सोसावे लागत असल्याचे दिसते़ खड्ड्यांच्या रस्त्यांमुळे बहुतांश बसेस धक्क्यावर आल्या असून अनेक बसेस खिळखिळ्या झाल्यात़दुरवस्थेत असलेल्या रस्त्यांचा सर्वाधिक फटका महामंडळाच्या बसेसला बसत आहे़ गत दोन ते तीन महिन्यांत बसेस खिळखिळ्या झाल्याचे खुद्द परिवहनचे अधिकारीच सांगत असल्याने यावर शिक्कामोर्तब झाले आहे़ जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाचे वर्धा, हिंगणघाट, आर्वी, पुलगाव व तळेगाव, असे पाच आगार आहेत. वर्धा येथील एमआयडीसी परिसरात एक कार्यशाळा आहे. जिल्ह्यात २०० च्या वर एसटी बसेस कार्यरत आहेत़ यातील बहुतांश बसेस ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था गंभीर असल्याने खिळखिळ्या झाल्या आहेत़ हिंगणघाट तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते खड्डेमय असल्याने व राज्य महामार्गाचीही दुरवस्था झाल्याने आगारातील २० ते २२ बसेसची अवस्था गंभीर असल्याचे सांगितले जाते़ तळेगाव व आर्वी या आगारांतील अंतर केवळ १५ किमीचे आहे. आर्वी ते पुलगाव रस्त्याची अवस्था दयनिय असल्याने या मार्गावर धावणाऱ्या जनता व जलद बसेस ‘भोपू सोडून सर्वच वाजते’, अशी झाली आहे़ आर्वी येथून वऱ्हा कुऱ्हा मार्गे अमरावती जाणाऱ्या रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे़ या मार्गावर राज्य परिवहनची बस चालविणे कठीण आहे. आर्वी ते पुलगाव रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मागील वर्षी या मार्गावर बसफेरी चालवायची की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला होता़ काही दिवस बसेस बंदही ठेवण्यात आल्या होत्या़ यानंतर तात्पुरती डागडुजी करण्यात आली़ आता पुन्हा हा मार्ग धनोडी ते विरूळ दरम्यान तसेच पुढे खुबगावकडे नादुरूस्त झाला आहे़ तळेगाव आगाराच्या बसेस कारंजा (घा.), आष्टी या दोन तालुक्यांत धावतात. कारंजा तालुक्यात ग्रामीण रस्ते दुरवस्थेत आहेत़ आष्टी ते हातुर्णा हा रस्ता निकामीच झाल्याचे दिसते़ ३० किमीचा प्रवास करण्यास बसला तब्बल एक तास लागतो. यामुळे ग्रामीण भागातील बसफेऱ्या विलंबाने धावतात. वरूड, आर्वी, तळेगाव व हिंगणघाट आगारांच्या सदर मार्गावर धावणाऱ्या बसेस खिळखिळ्या झाल्या आहेत.वर्धा आगारातून सेलू, सिंदी (रेल्वे), मांडगाव मार्गे समुद्रपूर, वायगाव मार्गे हिंगणघाट बसेस सोडल्या जातात़ हे सर्व रस्ते दुरवस्थेत आहे़ वायगाव ते इंझापूर दरम्यान रस्ता खराब असल्याने हिंगणघाटसह वर्धा आगाराच्या बसेसचे नुकसान होत आहे़ रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एसटीची प्रवासी वाहतूक सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली असून नुकसान सोसावे लागत आहे़ याकडे लक्ष देत रस्त्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे़(कार्यालय प्रतिनिधी)