शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण; पण वर्धा, पुलगावात बसेस ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 05:00 IST

दिवाळी पूर्वी रामपच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. मध्यंतरी काही कर्मचारी कर्तव्यावर आले तरी अजूनही काही कर्मचारी विलीनीकरणासाठी लढा देत आहेत. या आंदोलनामुळे रापमची प्रवासी वाहतूक सेवा विस्कळली आहे. शुक्रवारी वर्धा व पुलगाव येथे बसेस आगारात होत्या. तर हिंगणघाट आगारातून दोन, तळेगाव आगारातून एक, आर्वी आगारातून सहा बसेस सोडण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत रापमचे जे कर्मचारी कर्तव्यावर रुजू होत आहेत. त्यांना पोलीस संरक्षण दिले जात आहे. विशेष म्हणजे पोलीस संरक्षणातच प्रवाशांसाठी बसेस सोडल्या जात असल्या तरी जिल्ह्यातील रापमच्या पाच पैकी वर्धा व पुलगाव या दोन आगारांत सध्या बसेस उभ्या आहेत, तर काही कर्मचारी कर्तव्यावर आल्याने शुक्रवारी हिंगणघाट, आर्वी व तळेगाव आगारातून बोटावर मोजण्या इतक्याच बसेस सोडण्यात आल्या. दिवाळी पूर्वी रामपच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. मध्यंतरी काही कर्मचारी कर्तव्यावर आले तरी अजूनही काही कर्मचारी विलीनीकरणासाठी लढा देत आहेत. या आंदोलनामुळे रापमची प्रवासी वाहतूक सेवा विस्कळली आहे. शुक्रवारी वर्धा व पुलगाव येथे बसेस आगारात होत्या. तर हिंगणघाट आगारातून दोन, तळेगाव आगारातून एक, आर्वी आगारातून सहा बसेस सोडण्यात आल्या आहेत.

०३ बसेसवर झाली दगडफेक

-   काही कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाल्याने बाेटावर मोजण्या इतक्या बसेस प्रवाशांसाठी सोडल्या जात आहेत. असे असले तरी प्रवाशांसाठी सोडण्यात आलेल्या तीन बसेसवर आतापर्यंत दगडफेक करण्यात आली आहे. यामुळे रापमचे मोठ्या नुकसान झाले आहे.-  वारंवार आवाहन करूनही कर्तव्यावर रुजू न झाल्याने तब्बल २१९ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यात कामयस्वरूपी १५८ कर्मचारी असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर ६१ रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती करण्यात आली आहे.

सुरक्षित प्रवास लालपरीचाचरापम कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे बसेस बंद आहेत. त्यामुळे खासगी प्रवासी वाहनांनी ये-जा करावी लागत आहे. असे असले तरी सुरक्षित प्रवास अशीच रापमच्या लालपरीची ओळख आहे. बसेस लवकर सुरू व्हायला पाहिजेत.- दिनेेश भोंगाडे, प्रवासी.

रापम कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे खासगी प्रवासी वाहतुकीला उधाण आले आहे. खासगी प्रवासी वाहतूक करणारे क्षमतेपेक्षा जास्त नागरिकांचा वाहनात भरणा करतात. त्यामुळे हा प्रकार एखाद्या मोठ्या अनुचित घटनेला निमंत्रण देणारा ठरत आहे. रापमच्या बसचा प्रवास हा सुरक्षित आहे, पण सध्या बसेस बंद आहे. बसेस लवकरात लवकर सुरू व्हायला हव्यात.- विलास घुडे, प्रवासी.

काही कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाल्याने शुक्रवारी हिंगणघाट, तळेगाव तसेच आर्वी या आगारामधून एकूण नऊ बसेस सोडण्यात आल्या आहेत, तर वर्धा आणि पुलगाव आगारातून एकही बस सोडण्यात आली नाही.- चेतन हसबनीस, विभाग नियंत्रणक, रापम, वर्धा.

 

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप