शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या बलाढ्य सैन्याला, सशस्त्र दलांना, गुप्तचर संस्थांना आणि शास्त्रज्ञांना सलाम- पंतप्रधान मोदी
3
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
4
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
5
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
6
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
7
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
8
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
9
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
10
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
11
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
12
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
13
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
14
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
15
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
16
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
17
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
18
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
19
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
20
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा

कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण; पण वर्धा, पुलगावात बसेस ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 05:00 IST

दिवाळी पूर्वी रामपच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. मध्यंतरी काही कर्मचारी कर्तव्यावर आले तरी अजूनही काही कर्मचारी विलीनीकरणासाठी लढा देत आहेत. या आंदोलनामुळे रापमची प्रवासी वाहतूक सेवा विस्कळली आहे. शुक्रवारी वर्धा व पुलगाव येथे बसेस आगारात होत्या. तर हिंगणघाट आगारातून दोन, तळेगाव आगारातून एक, आर्वी आगारातून सहा बसेस सोडण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत रापमचे जे कर्मचारी कर्तव्यावर रुजू होत आहेत. त्यांना पोलीस संरक्षण दिले जात आहे. विशेष म्हणजे पोलीस संरक्षणातच प्रवाशांसाठी बसेस सोडल्या जात असल्या तरी जिल्ह्यातील रापमच्या पाच पैकी वर्धा व पुलगाव या दोन आगारांत सध्या बसेस उभ्या आहेत, तर काही कर्मचारी कर्तव्यावर आल्याने शुक्रवारी हिंगणघाट, आर्वी व तळेगाव आगारातून बोटावर मोजण्या इतक्याच बसेस सोडण्यात आल्या. दिवाळी पूर्वी रामपच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. मध्यंतरी काही कर्मचारी कर्तव्यावर आले तरी अजूनही काही कर्मचारी विलीनीकरणासाठी लढा देत आहेत. या आंदोलनामुळे रापमची प्रवासी वाहतूक सेवा विस्कळली आहे. शुक्रवारी वर्धा व पुलगाव येथे बसेस आगारात होत्या. तर हिंगणघाट आगारातून दोन, तळेगाव आगारातून एक, आर्वी आगारातून सहा बसेस सोडण्यात आल्या आहेत.

०३ बसेसवर झाली दगडफेक

-   काही कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाल्याने बाेटावर मोजण्या इतक्या बसेस प्रवाशांसाठी सोडल्या जात आहेत. असे असले तरी प्रवाशांसाठी सोडण्यात आलेल्या तीन बसेसवर आतापर्यंत दगडफेक करण्यात आली आहे. यामुळे रापमचे मोठ्या नुकसान झाले आहे.-  वारंवार आवाहन करूनही कर्तव्यावर रुजू न झाल्याने तब्बल २१९ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यात कामयस्वरूपी १५८ कर्मचारी असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर ६१ रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती करण्यात आली आहे.

सुरक्षित प्रवास लालपरीचाचरापम कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे बसेस बंद आहेत. त्यामुळे खासगी प्रवासी वाहनांनी ये-जा करावी लागत आहे. असे असले तरी सुरक्षित प्रवास अशीच रापमच्या लालपरीची ओळख आहे. बसेस लवकर सुरू व्हायला पाहिजेत.- दिनेेश भोंगाडे, प्रवासी.

रापम कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे खासगी प्रवासी वाहतुकीला उधाण आले आहे. खासगी प्रवासी वाहतूक करणारे क्षमतेपेक्षा जास्त नागरिकांचा वाहनात भरणा करतात. त्यामुळे हा प्रकार एखाद्या मोठ्या अनुचित घटनेला निमंत्रण देणारा ठरत आहे. रापमच्या बसचा प्रवास हा सुरक्षित आहे, पण सध्या बसेस बंद आहे. बसेस लवकरात लवकर सुरू व्हायला हव्यात.- विलास घुडे, प्रवासी.

काही कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाल्याने शुक्रवारी हिंगणघाट, तळेगाव तसेच आर्वी या आगारामधून एकूण नऊ बसेस सोडण्यात आल्या आहेत, तर वर्धा आणि पुलगाव आगारातून एकही बस सोडण्यात आली नाही.- चेतन हसबनीस, विभाग नियंत्रणक, रापम, वर्धा.

 

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप