शहरं
Join us  
Trending Stories
1
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
2
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
3
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
4
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
5
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
6
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
7
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीसोबत करणार हातमिळवणी?
8
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
9
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
10
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
11
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
12
India Pakistan Update: हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी ओझरचे एचएएल 'हाय अलर्ट'वर !
13
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
14
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
15
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
16
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
18
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
19
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
20
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."

जिल्ह्यातील ६० गावे पोलीस पाटलाविना

By admin | Updated: November 1, 2014 23:13 IST

गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शासनाने गाव तेथे पालीस पाटील धोरणाची अंमलबजावणी केली. पोलीस पाटलांकडे गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना, दारूबंदी, तंटामुक्ती मोहिम यशस्वीपणे

अमोल सोटे - आष्टी(श.)गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शासनाने गाव तेथे पालीस पाटील धोरणाची अंमलबजावणी केली. पोलीस पाटलांकडे गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना, दारूबंदी, तंटामुक्ती मोहिम यशस्वीपणे राबविण्याची जबाबदारी होती. असंख्य पोलीस पाटील सेवानिवृत्त झाले. काहीजण मृत पावले. अशा जागा शासनाने अद्यापही भरल्या नाहीत. वर्धा जिल्ह्यात एकूण ६० जागा रिक्त आहे. आर्वी, आष्टी, कारंजा या तीन तालुक्यात २४ पदे रिक्त आहेत. पोलीस पाटील भरती स्पर्धा परीक्षांमधून होत असल्याने पदभरती करण्यास विलंब लागत असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात येते. महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी सुरू केली. त्यावेळी पोलीस पाटलांनी गावागावात आदर्शपणे उपक्रम राबवून मोलाची कामगिरी निभावली. तर रिक्त पद असलेल्या गावात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.पोलीस पाटलांची रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी शासनाने निर्देश दिले होते, पण अंमलबजावणी करणारी यंत्रणा उदासीन असल्यामुळे अनुशेष कायम राहिला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पोलीस पाटील पदाला मान होता, परंतु बदलती स्थिती यासाठी कारणीभूत ठरली. मानसन्मान कमी झाला तर मानधन वाढत गेले. कामाची जबाबदारी कमी झाली. तरीदेखील पोलीस पाटील पद शासनदरबारी कायम आहे. जिल्ह्यात अनेक पोलीस पाटील व्यसनाधीन झाले आहे. अनेक पोलीस पाटील दारू विकतात. त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले आहे. अशा पोलीस पाटलांवर निलंबनाची कारवाई करून नव्याने पदभरती करण्याची मागणीही होत आहे. यासोबतच पोलीस पाटील महसुल यंत्रणेचा दुवा म्हणून काम करीत आहे. रेती, गौणखनिज, रॉकेल, स्वस्त धान्य खुल्या बाजारात अवैध मार्गाने विकण्यावर लगाम घालण्यासाठीही महत्त्वाची भूमिका बजावतात. पोलिसांना खबर देवून गुन्हेगारी कारवाया करायला मदत होते. रेतीची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढून गेली. महसुल विभाग कारवाईस टाळाटाळ करतात. शासनाने पोलीस यंत्रणेला स्वतंत्र अधिकार प्रदान केले आहे. तरीही पदांचे अनुशेष कायमच आहे.