शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
मोठी बातमी! ट्रान्स-हार्बर लोकल ट्रेन सेवा अनिश्चित काळासाठी बंद, तुर्भेजवळ गर्डर पडला
3
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वे हाय अलर्टवर; अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी
4
Operation Sindoor : राजनाथ सिंह घेणार मोठी बैठक, तिन्ही लष्करप्रमुख आणि सीडीएस राहणार उपस्थित!
5
India-Pakistan Conflict: बलुचिस्तान मुक्त झाला! भारताच्या कारवाईदरम्यान मोठा दावा; दिल्लीत दूतावास उघडण्याची मागणी
6
४१ वर्षीय मराठमोळा अभिनेता करतोय परिक्षेची तयारी, काही दिवसांनी आहेत पेपर, म्हणतो - "मला चांगलं करायचं आहे…"
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
9
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
10
Operation Sindoor: युद्धजन्य स्थिती, अस्वस्थ मनस्थिती; सैनिकांसाठी स्वामींना कळकळीने करा 'ही' प्रार्थना!
11
Mother's Day 2025: आईला द्या ५ स्कीममध्ये गुंतवणूक करुन गिफ्ट; लोकही म्हणतील, मुल असावं तर असं!
12
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
13
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
14
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
15
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
17
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
20
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?

बोरधरण परिसरात पर्यटकांकडून प्लास्टिकचा कचरा

By admin | Updated: September 14, 2016 00:47 IST

बोरधरण येथे जाणाऱ्या पर्यटकाकडून प्लास्टिक पन्नी उपयोगानंतर फेकली जाते. शिवाय खाण्याच्या पदार्थांचे खाली पॅकेटही तेथेच टाकून दिले जातात.

जनावरांचा जीव धोक्यात : संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे सेलू : बोरधरण येथे जाणाऱ्या पर्यटकाकडून प्लास्टिक पन्नी उपयोगानंतर फेकली जाते. शिवाय खाण्याच्या पदार्थांचे खाली पॅकेटही तेथेच टाकून दिले जातात. मोकाट जनावरे अन्नाचे कण लागून असल्याने पूर्ण प्लास्टिक खाऊन टाकतात. यामुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय पर्यटनस्थळ असलेल्या बोरधरण, बोर व्याघ्र प्रकल्पात प्रदूषण होत आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. पर्यटकांनी आपल्याकडून या परिसरात घाण होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे; पण निष्काळजीपणा परिसरातील स्वच्छतेला बाधा पोहोचवित असल्याचे दिसते. खाऊन झाल्यावर उष्टे अन्न तेथेच टाकून दिले जाते. यामुळे कालांतराने दुर्गंधी पसरते. बोरधरणाचे नैसर्गिक सौंदर्य न्याळाण्यासाठी आलेल्या इतर पर्यटकांना मात्र याचा त्रास सहन करावा लागतो. बोरी गावची वन व्यवस्थापन समितीकडून धरणावर येणाऱ्या पर्यटकाकडून उपद्रव शुल्काच्या नावाखाली पैसे घेतले जातात; पण त्यांनी केलेला उपद्रव स्वच्छ केला जात नाही, असा आरोपही होत आहे. बोर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पचा दर्जा मिळाल्याने पर्यटकांची संख्या वाढत आहे; पण सुविधांअभावी पर्यटकांचा हिरमोड होतो. संबंधितांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.(तालुका प्रतिनिधी)सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपायोजनांचा अभावबोरधरण आणि बोर व्याघ्र प्रकल्प परिसरात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठल्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. धरणाच्या पाण्यापर्यंत सहज जाता येत असल्याने पर्यटक त्याच परिसरात केरकचरा टाकून ठेवतात. परिणामी, पर्यटनस्थळी प्रदूषण होत असल्याचे दिसून येत आहे. या कचऱ्यामुळे प्राण्यांचे जीवनही धोक्यात येत असल्याचे दिसते. बोर व्याघ्र प्रकल्प व बोरधरण प्रशासनाने याकडे लक्ष देत उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे.