शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

पत्रावळींमुळे पशुधनाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 13:16 IST

लग्न समारंभापासून तर छोटेखानी कार्यक्रमातील पत्रावळी रस्त्यावर टाकल्या जात असून त्या जनावरे खातात़ यामुळे जनावरांना गंभीर स्वरूपाचे आजार होत आहेत़ प्रसंगी जनावरे मृत झाल्याची अनेक उदाहरणे आहेत़

ठळक मुद्देवैरण टंचाईचा परिणाम गुरांमध्ये पोटाचे आजार बळावले

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लग्न समारंभापासून तर छोटेखानी कार्यक्रमातील भोजनासाठी पत्रावळी, द्रोण, कप, ग्लास यांचा वापर अगदी शहरासह ग्रामीण भागातही होतो़ आधुनिकतेमुळे वेळेची बचत होत असली तरी यामुळे पर्यावरणाचा ºहास होतो़ या पत्रावळी रस्त्यावर टाकल्या जात असून त्या जनावरे खातात़ यामुळे जनावरांना गंभीर स्वरूपाचे आजार होत आहेत़ प्रसंगी जनावरे मृत झाल्याची अनेक उदाहरणे आहेत़पूर्वी लग्नप्रसंगी व इतर कार्यक्रमातील जेवणाकरिता वड, पळस, मोह आदींच्या पानांपासून पत्रावळी व द्रोण तयार केले जात होते़ या पत्रावळीवर जेवणाची लज्जत काही वेगळीच होती़ या पत्रावळीमुळे ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होत होता़ या पत्रावळी जमिनीत कुजून जायच्या वा जनावरांनी खाल्यास काही अपाय होत नव्हता़ एकंदरीत पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होत होती़ आता मात्र आधुनिकतेच्या नावाखाली चमकणाऱ्या वाट्या, ग्लास वाढले आहेत़ यामुळे नैसर्गिकरित्या वृक्षाच्या पानांपासून तयार केलेले द्रोण व पत्रावळी काळाच्या ओघात लुप्त होत आहेत़ विविध कार्यक्रमांत वापरण्यात येणारे द्रोण, कप, पत्रावळी कार्यक्रमानंतर खुल्या जागेत फेकल्या जातात़ प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने ते ‘जैसे थे’च राहतात़ परिणामी, प्लास्टिक पत्रावळींमुळे पशुधन धोक्यात आल्याचे दिसते़ यामुळे या प्लास्टिकच्या पत्रावळी इतरत्र न फेकता नष्ट करणे गरजेचे झाले आहे़सणालाही प्लास्टिकच्या पत्रावळीपूर्वज पूजनाचा सण म्हणून अक्षयतृतियेला मान आहे़ या दिवशी वृक्षाच्या पानापासून तयार केलेल्या पत्रावळी, द्रोण यावर अन्नपदार्थ मांडून पूजनाचा मान आहे; पण आता त्या मिळत नसल्याने प्लास्टिक पत्रावळींवरच पूजन केले जाते़सणाच्या दिवशीही पत्रावळी मिळत नसल्याने प्लास्टिकच्या वस्तूच वापरल्या जातात़

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी