शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

पत्रावळींमुळे पशुधनाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 13:16 IST

लग्न समारंभापासून तर छोटेखानी कार्यक्रमातील पत्रावळी रस्त्यावर टाकल्या जात असून त्या जनावरे खातात़ यामुळे जनावरांना गंभीर स्वरूपाचे आजार होत आहेत़ प्रसंगी जनावरे मृत झाल्याची अनेक उदाहरणे आहेत़

ठळक मुद्देवैरण टंचाईचा परिणाम गुरांमध्ये पोटाचे आजार बळावले

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लग्न समारंभापासून तर छोटेखानी कार्यक्रमातील भोजनासाठी पत्रावळी, द्रोण, कप, ग्लास यांचा वापर अगदी शहरासह ग्रामीण भागातही होतो़ आधुनिकतेमुळे वेळेची बचत होत असली तरी यामुळे पर्यावरणाचा ºहास होतो़ या पत्रावळी रस्त्यावर टाकल्या जात असून त्या जनावरे खातात़ यामुळे जनावरांना गंभीर स्वरूपाचे आजार होत आहेत़ प्रसंगी जनावरे मृत झाल्याची अनेक उदाहरणे आहेत़पूर्वी लग्नप्रसंगी व इतर कार्यक्रमातील जेवणाकरिता वड, पळस, मोह आदींच्या पानांपासून पत्रावळी व द्रोण तयार केले जात होते़ या पत्रावळीवर जेवणाची लज्जत काही वेगळीच होती़ या पत्रावळीमुळे ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होत होता़ या पत्रावळी जमिनीत कुजून जायच्या वा जनावरांनी खाल्यास काही अपाय होत नव्हता़ एकंदरीत पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होत होती़ आता मात्र आधुनिकतेच्या नावाखाली चमकणाऱ्या वाट्या, ग्लास वाढले आहेत़ यामुळे नैसर्गिकरित्या वृक्षाच्या पानांपासून तयार केलेले द्रोण व पत्रावळी काळाच्या ओघात लुप्त होत आहेत़ विविध कार्यक्रमांत वापरण्यात येणारे द्रोण, कप, पत्रावळी कार्यक्रमानंतर खुल्या जागेत फेकल्या जातात़ प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने ते ‘जैसे थे’च राहतात़ परिणामी, प्लास्टिक पत्रावळींमुळे पशुधन धोक्यात आल्याचे दिसते़ यामुळे या प्लास्टिकच्या पत्रावळी इतरत्र न फेकता नष्ट करणे गरजेचे झाले आहे़सणालाही प्लास्टिकच्या पत्रावळीपूर्वज पूजनाचा सण म्हणून अक्षयतृतियेला मान आहे़ या दिवशी वृक्षाच्या पानापासून तयार केलेल्या पत्रावळी, द्रोण यावर अन्नपदार्थ मांडून पूजनाचा मान आहे; पण आता त्या मिळत नसल्याने प्लास्टिक पत्रावळींवरच पूजन केले जाते़सणाच्या दिवशीही पत्रावळी मिळत नसल्याने प्लास्टिकच्या वस्तूच वापरल्या जातात़

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी