शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

पिकांना वाचविण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांचे कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 23:22 IST

अनुभवासारखा दुसरा शिक्षक नाही, असे महापुरूषांनी म्हटले आहे. याचाच उपयोग एका शेतकऱ्याने आपल्या शेतातून वराह व वानरांना हुसकाविण्यासाठी प्रयोग केला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची नामी शक्कल : जंगली श्वापदांपासून पिकांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : अनुभवासारखा दुसरा शिक्षक नाही, असे महापुरूषांनी म्हटले आहे. याचाच उपयोग एका शेतकऱ्याने आपल्या शेतातून वराह व वानरांना हुसकाविण्यासाठी प्रयोग केला. यामुळे शेतातील पिकांना संरक्षण मिळणार आहे. काही शेतकºयांचा चणा अंकुरला. त्यांना प्राणी, पक्ष्यांपासून वाचविण्यासाठी शेतकºयाने प्लास्टिक पिशव्यांचे झाडांना कवच दिले आहे.सध्या शेतात कपाशी व तूर असून शेतकरी गहू व चना पेरण्याच्या कामात व्यस्त आहे. काही शेतकऱ्यांचा चना निघाला आहे. शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा म्हटले जाते; पण हाच शेतकरी नैसर्गिक संकट, वन्यप्राणी व शासनाच्या शेतीविरोधी धोरणामुळे जेरीस आला आहे. काबाडकष्ट करणाºयांची जमात असणारा शेतकरी आपल्या अनुभवाच्या जोरावर शेती पिकवितो; पण आता शेतकºयांना नुकसानच अधिक सोसावे लागते. शेतातील कपाशीचे तास पाडण्याचा सपाटा डुकरांनी लावला. यात तुरीचाही समावेश आहे. यामुळे शेतकरी चना व गहू पिके कसे वाचविता येईल, याचा विचार करीत आहे. वघाळा शिवारातील लिलाधर तुराळे या युवा शेतकºयाने चना पेरला. माकड, रानडुक्कर चना फेकू व खाऊ नये म्हणून शेतात प्लास्टिकच्या पिशव्या लावून चन्याचे संरक्षण केले आहे. हवेमुळे पिशव्यांचा आवाज होतो. रात्री त्या चमकतात. यामुळे वराह शेतात शिरत नसल्याने पिकांचे नुकसान होत नाही. शेतात वराहांचा कळप शिरल्यास एक-दोन एकरांचे नुकसान नक्कीच करतात. तुराळे यांचा हा उपक्रम यशस्वी होणार, असेच दिसते. शेवटी अनुभवच त्याच्या मदतीला धावून आला, हे निश्चित!प्रयोगशिल शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढशेतकºयाने प्रयोगशिल असावे, असे प्रत्येकाकडून सांगितले जाते; पण काहीच शेतकरी शेतात विविध प्रयोग करून पाहतात. हे प्रयोग करणाºया शेतकऱ्यांनाच शेतात विविध पिकांचे उत्पादन घेता येते, हे सिद्ध झाले आहे. वघाळा येथील तुराळे नामक शेतकºयानेही पिके वाचविण्याची नामी शक्कल शोधून काढली असून वन्य प्राण्यांपासून त्या पिकांचे रक्षण होत आहे.