शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पिकांना वाचविण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांचे कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 23:22 IST

अनुभवासारखा दुसरा शिक्षक नाही, असे महापुरूषांनी म्हटले आहे. याचाच उपयोग एका शेतकऱ्याने आपल्या शेतातून वराह व वानरांना हुसकाविण्यासाठी प्रयोग केला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची नामी शक्कल : जंगली श्वापदांपासून पिकांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : अनुभवासारखा दुसरा शिक्षक नाही, असे महापुरूषांनी म्हटले आहे. याचाच उपयोग एका शेतकऱ्याने आपल्या शेतातून वराह व वानरांना हुसकाविण्यासाठी प्रयोग केला. यामुळे शेतातील पिकांना संरक्षण मिळणार आहे. काही शेतकºयांचा चणा अंकुरला. त्यांना प्राणी, पक्ष्यांपासून वाचविण्यासाठी शेतकºयाने प्लास्टिक पिशव्यांचे झाडांना कवच दिले आहे.सध्या शेतात कपाशी व तूर असून शेतकरी गहू व चना पेरण्याच्या कामात व्यस्त आहे. काही शेतकऱ्यांचा चना निघाला आहे. शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा म्हटले जाते; पण हाच शेतकरी नैसर्गिक संकट, वन्यप्राणी व शासनाच्या शेतीविरोधी धोरणामुळे जेरीस आला आहे. काबाडकष्ट करणाºयांची जमात असणारा शेतकरी आपल्या अनुभवाच्या जोरावर शेती पिकवितो; पण आता शेतकºयांना नुकसानच अधिक सोसावे लागते. शेतातील कपाशीचे तास पाडण्याचा सपाटा डुकरांनी लावला. यात तुरीचाही समावेश आहे. यामुळे शेतकरी चना व गहू पिके कसे वाचविता येईल, याचा विचार करीत आहे. वघाळा शिवारातील लिलाधर तुराळे या युवा शेतकºयाने चना पेरला. माकड, रानडुक्कर चना फेकू व खाऊ नये म्हणून शेतात प्लास्टिकच्या पिशव्या लावून चन्याचे संरक्षण केले आहे. हवेमुळे पिशव्यांचा आवाज होतो. रात्री त्या चमकतात. यामुळे वराह शेतात शिरत नसल्याने पिकांचे नुकसान होत नाही. शेतात वराहांचा कळप शिरल्यास एक-दोन एकरांचे नुकसान नक्कीच करतात. तुराळे यांचा हा उपक्रम यशस्वी होणार, असेच दिसते. शेवटी अनुभवच त्याच्या मदतीला धावून आला, हे निश्चित!प्रयोगशिल शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढशेतकºयाने प्रयोगशिल असावे, असे प्रत्येकाकडून सांगितले जाते; पण काहीच शेतकरी शेतात विविध प्रयोग करून पाहतात. हे प्रयोग करणाºया शेतकऱ्यांनाच शेतात विविध पिकांचे उत्पादन घेता येते, हे सिद्ध झाले आहे. वघाळा येथील तुराळे नामक शेतकºयानेही पिके वाचविण्याची नामी शक्कल शोधून काढली असून वन्य प्राण्यांपासून त्या पिकांचे रक्षण होत आहे.