शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
2
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
4
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
5
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
6
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
7
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
8
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
9
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
10
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
11
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
12
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
13
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
14
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
15
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
16
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
17
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
18
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
19
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
20
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!

कोरोनामुळे निधन झालेल्यांच्या वारसांची शासकीय मदतीसाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2022 05:00 IST

रोहणा येथील बहिणाबाई नारायण कुऱ्हाडे यांचा २५ फेब्रुवारी २०२१ रोजी कोरोनामुळे सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांचा मुलगा अविनाश यांनी आर्वी येथील एका सेतू केंद्रातून शासकीय योजनेचा लाभ मिळावा या हेतूने रीतसर कागदपत्रे जोडून ऑनलाइन नोंदणी केली. इतकेच नव्हे तर त्यानंतर गावातील आणखी दोन व्यक्तींनी रीतसर नोंदणी केली. या दोन व्यक्तींच्या बँक खात्यात शासकीय मदतीची रक्कम वळती झाली.

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना शासनाच्या वतीने ५० हजारांची आर्थिक मदत देण्याचे धोरण जाहीर करण्यात आले आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करावयाचा असला तरी अर्ज केल्यावर मदत मिळेल काय, याची माहितीच चौकशीसाठी गेलेल्यांना मिळत नसल्याचे वास्तव आहे. परिणामी गरजू आणि लाभार्थ्यांची पायपीट होत आहे. या प्रकारामुळे भीक नको पण कुत्रा आवर, अशी म्हणण्याची वेळ पात्र लाभार्थ्यांवर आली आहे.रोहणा येथील बहिणाबाई नारायण कुऱ्हाडे यांचा २५ फेब्रुवारी २०२१ रोजी कोरोनामुळे सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांचा मुलगा अविनाश यांनी आर्वी येथील एका सेतू केंद्रातून शासकीय योजनेचा लाभ मिळावा या हेतूने रीतसर कागदपत्रे जोडून ऑनलाइन नोंदणी केली. इतकेच नव्हे तर त्यानंतर गावातील आणखी दोन व्यक्तींनी रीतसर नोंदणी केली. या दोन व्यक्तींच्या बँक खात्यात शासकीय मदतीची रक्कम वळती झाली. पण कुऱ्हाडे यांना योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी पूर्वी सावंगी रुग्णालयात, नंतर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय तर त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय गाठून चौकशी केली. परंतु, सदर तिन्ही ठिकाणी माहितीच देण्यास टाळाटाळ करीत एक-दुसऱ्यांकडे बोट दाखविण्यात आले. त्यामुळे कुऱ्हाडे यांच्या अडचणीत भर पडली आहे. जिल्ह्यात अनेकांना या प्रकाराला सामोरे जावे लागत आहे.

न्यायालयाच्या सूचनांकडेही दुर्लक्षnमुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. शहरी असो वा ग्रामीण अनेकांना ऑनलाइन अर्ज करणे शक्य नसल्याने कोविड मृतांच्या वारसदारांनी अर्ज केला नसेल तरीही शासनाने आर्थिक मदत द्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. पण निगरगठ्ठ अधिकारी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसदारांना साधी माहिती देण्याकडेही दुर्लक्ष करीत आहेत.

ऑनलाइन नोंदणी केल्यावर अर्जावर काय प्रक्रिया झाली याची साधी माहिती विचारणा करण्यासाठी सावंगी (मेघे) येथील रुग्णालय, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे गेलो. पण कुणीही माहिती दिली नाही. काेरोनामुळे मृत्यू पावलेल्या वारसदारांनी नोंदणी केल्यावर त्यांच्या अर्जाचे काय झाले याची माहिती देण्यासाठी वेगळा कक्ष स्थापन करावा अशी अपेक्षा आहे. - अविनाश कुऱ्हाडे,  रोहणा

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या