शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे निधन झालेल्यांच्या वारसांची शासकीय मदतीसाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2022 05:00 IST

रोहणा येथील बहिणाबाई नारायण कुऱ्हाडे यांचा २५ फेब्रुवारी २०२१ रोजी कोरोनामुळे सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांचा मुलगा अविनाश यांनी आर्वी येथील एका सेतू केंद्रातून शासकीय योजनेचा लाभ मिळावा या हेतूने रीतसर कागदपत्रे जोडून ऑनलाइन नोंदणी केली. इतकेच नव्हे तर त्यानंतर गावातील आणखी दोन व्यक्तींनी रीतसर नोंदणी केली. या दोन व्यक्तींच्या बँक खात्यात शासकीय मदतीची रक्कम वळती झाली.

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना शासनाच्या वतीने ५० हजारांची आर्थिक मदत देण्याचे धोरण जाहीर करण्यात आले आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करावयाचा असला तरी अर्ज केल्यावर मदत मिळेल काय, याची माहितीच चौकशीसाठी गेलेल्यांना मिळत नसल्याचे वास्तव आहे. परिणामी गरजू आणि लाभार्थ्यांची पायपीट होत आहे. या प्रकारामुळे भीक नको पण कुत्रा आवर, अशी म्हणण्याची वेळ पात्र लाभार्थ्यांवर आली आहे.रोहणा येथील बहिणाबाई नारायण कुऱ्हाडे यांचा २५ फेब्रुवारी २०२१ रोजी कोरोनामुळे सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांचा मुलगा अविनाश यांनी आर्वी येथील एका सेतू केंद्रातून शासकीय योजनेचा लाभ मिळावा या हेतूने रीतसर कागदपत्रे जोडून ऑनलाइन नोंदणी केली. इतकेच नव्हे तर त्यानंतर गावातील आणखी दोन व्यक्तींनी रीतसर नोंदणी केली. या दोन व्यक्तींच्या बँक खात्यात शासकीय मदतीची रक्कम वळती झाली. पण कुऱ्हाडे यांना योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी पूर्वी सावंगी रुग्णालयात, नंतर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय तर त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय गाठून चौकशी केली. परंतु, सदर तिन्ही ठिकाणी माहितीच देण्यास टाळाटाळ करीत एक-दुसऱ्यांकडे बोट दाखविण्यात आले. त्यामुळे कुऱ्हाडे यांच्या अडचणीत भर पडली आहे. जिल्ह्यात अनेकांना या प्रकाराला सामोरे जावे लागत आहे.

न्यायालयाच्या सूचनांकडेही दुर्लक्षnमुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. शहरी असो वा ग्रामीण अनेकांना ऑनलाइन अर्ज करणे शक्य नसल्याने कोविड मृतांच्या वारसदारांनी अर्ज केला नसेल तरीही शासनाने आर्थिक मदत द्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. पण निगरगठ्ठ अधिकारी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसदारांना साधी माहिती देण्याकडेही दुर्लक्ष करीत आहेत.

ऑनलाइन नोंदणी केल्यावर अर्जावर काय प्रक्रिया झाली याची साधी माहिती विचारणा करण्यासाठी सावंगी (मेघे) येथील रुग्णालय, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे गेलो. पण कुणीही माहिती दिली नाही. काेरोनामुळे मृत्यू पावलेल्या वारसदारांनी नोंदणी केल्यावर त्यांच्या अर्जाचे काय झाले याची माहिती देण्यासाठी वेगळा कक्ष स्थापन करावा अशी अपेक्षा आहे. - अविनाश कुऱ्हाडे,  रोहणा

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या