शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी मागितली आत्महत्येची परवानगी

By admin | Updated: July 22, 2015 02:41 IST

शेतात अंकुरलेले सोयाबीन, कपाशी, तूर व अन्य पिके श्वापदांनी फस्त केली. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले.

धामणगाव वाठोडा येथील शेतकऱ्यांचे साकडेवर्धा : शेतात अंकुरलेले सोयाबीन, कपाशी, तूर व अन्य पिके श्वापदांनी फस्त केली. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले. पिकांचे त्वरित सर्वेक्षण करून वन विभागाने नुकसान भरपाई द्यावी. भरपाई देता येत नसेल तर आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी धामणगाव (वाठोडा) येथील १८ शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत सोमवारी वन विभागाला निवेदन सादर करण्यात आले आहे.शेतकऱ्यांनी खरीप पिकांची लागवड केली. पावसाने दडी मारल्याने उगवलेली पिके रोही, रानडुक्कर व जंगली श्वापदांनी फस्त केली. यामुळे धामणगाव व वाठोडा या दोन्ही गावातील १०० एकरपेक्षा अधिक जमिनीतील पिके उद्ध्वस्त झाली. प्रवीण ठाकरे या शेतकऱ्याने श्वापदांच्या त्रासाबाबत अनेकदा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना तक्रारी केल्या. ग्रा.पं. मध्ये श्वापदांचा बंदोबस्त करण्याची मागणी करणारा ठराव पारित करून त्याच्या प्रतीही पाठविल्या; पण कुठलीही कारवाई झाली नाही. शिवाय पत्रव्यवहारही न केला नाही. यामुळे श्वापदांनी पुन्हा पिकांची नासधूस केली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानीची १०० टक्के भरपाई द्यावी व तसे होत नसल्यास आत्महत्येची परवानगी द्यावी, अशी मागणी प्रवीण ठाकरे, वसंत भोयर, पद्माकर भगत, सुभाष कुचेवार, रवी चाफेकर, गुलाब भोयर, वसंत भानसे, मिलिंद मेंढे, नामदेव धनवीज, अर्जुन तेलतुंबडे, मधुकर होणाडे, कपिल देशमुख, रूपचंद कांबळे, श्यामसुंदर ठाकरे, विजय राऊत, मोहन लोहकरे, विजय होणाडे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केली आहे. निवेदन पंतप्रधान यांच्या नावाने देण्यात आले असून मुख्यमंत्री, वनमंत्री, जिल्हाधिकारी व आ. रणजीत कांबळे यांनाही निवेदन देण्यात आले.(कार्यालय प्रतिनिधी)पाच एकरातील सोयाबीन पिकाची नासाडीबोरधरण - हिंगणी परिसरात वन्य प्राण्यांनी धुमाकूळ घातला आहे. अंकुरलेल्या पिकांची नासाडी केल्याने शेतकरी हैराण झाले. वानवहिरा येथील महिला शेतकरी प्रतीभा टापरे रा. नागपूर यांनी काही वर्षांपूर्वी वानविहरा शिवारात शेती घेतली. यावर्षी त्यांनी पाच एकर शेतात सोयाबीन पेरले. या पिकाची वन्य प्राण्यांनी नासाडी केली. परिणामी, शेतकरी संकटात सापडले. वन विभागाने लक्ष देत श्वापदाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.हिंगणी परिसर जंगलव्याप्त आहे. येथे वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. जंगलातील वन्य प्राणी शेतात धुमाकूळ घालून पिके उद्ध्वस्त करतात. प्रतीभा टापरे यांची वानविहरा शिवारात शेती असून पाच एकरात सोयाबीन पेरले. समाधानकारक पाऊस आल्याने सोयाबीनचे पीक अंकुरले होते. एका रात्रीत अंकुरलेल्या पिकात वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घालून संपूर्ण पीक उद्ध्वस्त केले. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. कपाशी, तूर व सोयाबीनची पेरणी झाली आहे; पण वन्यप्राणी धुमाकूळ घालत असल्याने शेतकरी त्रस्त आहे. रानडुकर, रोही, सांबराचे कळप पिकांची नासाडी करीत आहे. शेतकरी टापरे यांच्या तक्रारीवरून हिंगणीचे क्षेत्रसहायक कावळे व वनरक्षक तुपे यांनी पाहणी करून पंचनामा केला.(वार्ताहर)