शहरं
Join us  
Trending Stories
1
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
2
Asia Cup Final : सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
3
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
4
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
5
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
6
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
7
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
8
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
9
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
10
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
11
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
12
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
13
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
14
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
15
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
16
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
17
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
18
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
19
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
20
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'

शेतकऱ्यांनी मागितली आत्महत्येची परवानगी

By admin | Updated: July 22, 2015 02:41 IST

शेतात अंकुरलेले सोयाबीन, कपाशी, तूर व अन्य पिके श्वापदांनी फस्त केली. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले.

धामणगाव वाठोडा येथील शेतकऱ्यांचे साकडेवर्धा : शेतात अंकुरलेले सोयाबीन, कपाशी, तूर व अन्य पिके श्वापदांनी फस्त केली. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले. पिकांचे त्वरित सर्वेक्षण करून वन विभागाने नुकसान भरपाई द्यावी. भरपाई देता येत नसेल तर आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी धामणगाव (वाठोडा) येथील १८ शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत सोमवारी वन विभागाला निवेदन सादर करण्यात आले आहे.शेतकऱ्यांनी खरीप पिकांची लागवड केली. पावसाने दडी मारल्याने उगवलेली पिके रोही, रानडुक्कर व जंगली श्वापदांनी फस्त केली. यामुळे धामणगाव व वाठोडा या दोन्ही गावातील १०० एकरपेक्षा अधिक जमिनीतील पिके उद्ध्वस्त झाली. प्रवीण ठाकरे या शेतकऱ्याने श्वापदांच्या त्रासाबाबत अनेकदा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना तक्रारी केल्या. ग्रा.पं. मध्ये श्वापदांचा बंदोबस्त करण्याची मागणी करणारा ठराव पारित करून त्याच्या प्रतीही पाठविल्या; पण कुठलीही कारवाई झाली नाही. शिवाय पत्रव्यवहारही न केला नाही. यामुळे श्वापदांनी पुन्हा पिकांची नासधूस केली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानीची १०० टक्के भरपाई द्यावी व तसे होत नसल्यास आत्महत्येची परवानगी द्यावी, अशी मागणी प्रवीण ठाकरे, वसंत भोयर, पद्माकर भगत, सुभाष कुचेवार, रवी चाफेकर, गुलाब भोयर, वसंत भानसे, मिलिंद मेंढे, नामदेव धनवीज, अर्जुन तेलतुंबडे, मधुकर होणाडे, कपिल देशमुख, रूपचंद कांबळे, श्यामसुंदर ठाकरे, विजय राऊत, मोहन लोहकरे, विजय होणाडे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केली आहे. निवेदन पंतप्रधान यांच्या नावाने देण्यात आले असून मुख्यमंत्री, वनमंत्री, जिल्हाधिकारी व आ. रणजीत कांबळे यांनाही निवेदन देण्यात आले.(कार्यालय प्रतिनिधी)पाच एकरातील सोयाबीन पिकाची नासाडीबोरधरण - हिंगणी परिसरात वन्य प्राण्यांनी धुमाकूळ घातला आहे. अंकुरलेल्या पिकांची नासाडी केल्याने शेतकरी हैराण झाले. वानवहिरा येथील महिला शेतकरी प्रतीभा टापरे रा. नागपूर यांनी काही वर्षांपूर्वी वानविहरा शिवारात शेती घेतली. यावर्षी त्यांनी पाच एकर शेतात सोयाबीन पेरले. या पिकाची वन्य प्राण्यांनी नासाडी केली. परिणामी, शेतकरी संकटात सापडले. वन विभागाने लक्ष देत श्वापदाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.हिंगणी परिसर जंगलव्याप्त आहे. येथे वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. जंगलातील वन्य प्राणी शेतात धुमाकूळ घालून पिके उद्ध्वस्त करतात. प्रतीभा टापरे यांची वानविहरा शिवारात शेती असून पाच एकरात सोयाबीन पेरले. समाधानकारक पाऊस आल्याने सोयाबीनचे पीक अंकुरले होते. एका रात्रीत अंकुरलेल्या पिकात वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घालून संपूर्ण पीक उद्ध्वस्त केले. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. कपाशी, तूर व सोयाबीनची पेरणी झाली आहे; पण वन्यप्राणी धुमाकूळ घालत असल्याने शेतकरी त्रस्त आहे. रानडुकर, रोही, सांबराचे कळप पिकांची नासाडी करीत आहे. शेतकरी टापरे यांच्या तक्रारीवरून हिंगणीचे क्षेत्रसहायक कावळे व वनरक्षक तुपे यांनी पाहणी करून पंचनामा केला.(वार्ताहर)