शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

श्रावणबाळ योजनेची प्रकरणे प्रलंबित

By admin | Updated: June 14, 2014 01:19 IST

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर संजय गांधी निराधार समितीची सभा न घेण्यात आली नाही.

कारंजा (घा.) : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर संजय गांधी निराधार समितीची सभा न घेण्यात आली नाही. यामुळे श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांची प्रकरणे प्रलंबित आहे. शिवाय २०१३ मधील प्रकरणे अद्यापही निकाली काढण्यात आली नसून याचा फटका मात्र लाभार्थ्यांना सहन करावा लागत आहे. जानेवारी २०१४ मध्ये संजय गांधी निराधार समितीची सभा झाली. त्यात फक्त संजय गांधी निराधार लाभार्थ्यांची प्रकरणे निकालात निघून त्यांचे मानधन सुरू झाले. श्रावणबाळ योजनेयील प्रकरणे प्रलंबित राहिली. त्याची नोंद आवक रजिस्टरवर आहे. त्यानंतर ग्रा.पं.व लोकसभा, विधान परिषदेची आचारसंहिता लागली. सभेची तारीख निश्चित करुन सभा रद्द करावी लागली. त्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतर ३० जूनच्या आत समितीची त्रैमासिक सभा अपेक्षित आहे. त्यामध्ये प्रलंबित व नव्याने सादर झालेली प्रकरणे निकालात काढणे गरजेचे आहे. बीपीएलमधील श्रावणबाळ लाभार्थी वगळता संजय गांधी निराधार व नॉन बीपीएल श्रावणबाळ लाभार्थ्यांचे एप्रिल महिन्याचे अनुदान खात्यात जमा झाल्याची माहिती आहे. राष्ट्रीयीकृत बँकांनी यावेळी अनुदान जमा करण्यास विलंब केल्याचे कळते. मे २०१४ चे अनुदान काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती संबंधित कार्यालयाकडून दिली जाते. बीपीएल श्रावणबाळ लाभार्थ्यांचे अनुदान संबंधित नायब तहसीलदारांच्या स्वाक्षरीला तांत्रिकरित्या मंजुरी न मिळाल्याने प्रलंबित असल्याचे समजते. २०१३ मध्ये तत्कालीन महिला तहसीलदाराच्या काळातील बरीचशी प्रकरणे प्रलंबित आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतर या अधिकाऱ्यांकडे ही प्रकरणे हाताळली असताना त्यातील बरीच कागदपत्रे गहाळ झाल्याचे बोलले जाते. या संदर्भात समितीने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच ही प्रकरणे नव्याने तपासून उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांमार्फत निकालात काढावयाची होती, पण त्या संदर्भातील कार्यवाही अपूर्ण राहिली. याची चौकशी करण्याची मागणी आहे.(शहर प्रतिनिधी)