शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

पीककर्ज उद्दिष्टपूर्तीचे आव्हान कायम

By admin | Updated: July 30, 2015 01:51 IST

पीक कर्जाची उद्दिष्टपूर्ती १०० टक्के व्हावी यासाठी अग्रणी बँक प्रयत्नशील आहे. उद्दिष्टपूर्ती होत नसल्याने सतत कर्ज वाटपाच्या मुदतीत वाढ केली जात आहे.

जिल्ह्यात ७० टक्के कर्जवाटप : कारंजा तालुका केवळ ४८.०१ टक्क्यांवरचपराग मगर वर्धापीक कर्जाची उद्दिष्टपूर्ती १०० टक्के व्हावी यासाठी अग्रणी बँक प्रयत्नशील आहे. उद्दिष्टपूर्ती होत नसल्याने सतत कर्ज वाटपाच्या मुदतीत वाढ केली जात आहे. एवढेच नव्हे तर आता शेतकऱ्यांना गरज असेल तेव्हा पीककर्ज दिले जाणार आहे. असे असतानाही अद्याप ७० टक्केच उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. कारंजा विभागात तर ५० टक्केही कर्जवाटप अद्याप झालेले नाही. यामुळे उद्दिष्टपूर्तीचे आव्हान अद्याप कायमच असल्याचे दिसते. जिल्ह्यातील ५४ हजार ४४९ खातेदारांना ६०५ कोटी पीक कर्जाचे वाटप करण्याचे उद्दिष्ट बँकांवर आहे. यापैकी एकूण ४३ हजार २५९ खातेदारांना आतापर्यंत ३८२ कोटी ५१ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. अद्याप ११ हजार १९० खारेदारांना कर्जवाटपाचे आव्हान अग्रणी बँकेवर आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची स्थिती सध्या दयनीय आहे. खरीपाचा खर्च त्यांना करता यावा यासाठी राज्य शासनाने खरीप पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे; पण त्याची पूर्तता करताना अग्रणी बँकेच्या नाकी नऊ येत आहे. कर्जवाटपाची आकडेवारी पाहता आष्टी तालुक्यात ९४.४८ एवढे सर्वाधिक कर्जवाटप करण्यात आले आहे, तर कारंजा तालुक्यात सर्वात कमी केवळ ४८.०१ एवढेच पीक कर्ज वाटप झाले. त्यामुळे पीककर्ज वाटपाचे १०० टक्के उद्दिष्ट केव्हा पूर्ण होईल हा प्रश्न कायम आहे. जिल्ह्यातील २२ बँकांना पीककर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. यामध्ये सर्वाधिक कर्जवाटप बँक आॅफ इंडियाने केले आहे. या बँकेने आतापर्यंत १७ हजार ४६ खातेदारांना १२० कोटी २० लाख एवढे कर्जवाटप केले आहे. त्या खालोखाल स्टेट बँक आॅफ इंडियाने ९ हजार २१५ खातेधारकांना ८८ कोटी ५१ लाख एवढे कर्जवाटप केले आहे. बँक आॅफ महाराष्ट्रने ४ हजार ६१५ खातेदारांना ५३ कोटी २९ लाख एवढे कर्जवाटप केले आहे. कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होत नसल्याने काहीच दिवसांपूर्वी जिल्ह्यातील दहा राष्ट्रीयकृत बँकांना जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. असे असतानाही उद्दिष्टपूर्ती होण्यास अवकाश आहे. कारंजा, देवळी, हिंगणघाट या तालुक्यात अद्याप ६० टक्केही कर्जवाटप झालेले नाही. या तालुक्यातील बँकांवर काही कारवाई होणार का, याकडे लक्ष लागले आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे संबंधितांनी सांगितले. कर्ज वाटपात आष्टी तालुका सर्वात पुढे४जिल्हा अग्रणी बँकेने दिलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत १०० टक्के उद्दिष्ट एकाही विभागाने पूर्ण केलेले नसले तरी आष्टी विभाग कर्जवाटपात सर्वात पूढे आहे. या विभागात आतापर्यंत ९४.४८ टक्के कर्जवाटप झालेले आहे. त्या खालोखाल समुद्रपूर विभागात ८३.८४ टक्के, वर्धा विभागात ८१. १४ टक्के, आर्वी विभाग ७६.८२ टक्के, देवळी ५७.१० टक्के, हिंगणघाट ५४.६२ टक्के, कारंजा ४८.०१ तर सेलू विभागात आतापर्यंत ७३.५५ टक्के कर्जवाटप करण्यात आले आहे.४यात कारंजा विभागात सर्वात कमी कर्जवाटप झालेले आहे. त्यामुळे या विभागातील बँक अधिकारी कर्जवाटप उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबत उदासीन असल्याचे दिसते.आतापर्यंत बँकांनी केलेले कर्जवाटप४राष्ट्रीयकृत बँकांना दिलेल्या उद्दिष्टांमध्ये आतापर्यंत कॉर्पोरेशन बँकेने उद्दिष्टापेक्षाही जास्त सर्वाधिक असे १९१ टक्के कर्जवाटप केले आहे. शिवाय अलाहाबाद बँक ९२ टक्के, बँक आॅफ इंडिया ८०, युको बँक १५६, युनियन बँक १४३, विजया बँक १७०, आयसीआयसीआय १६० टक्के, सेंट्रल बँक आॅफ इंडिया ७८ टक्के, विदर्भ कोकण ग्रामीण बँक ६६ टक्के अशा प्रकारे खरीपाचे कर्ज वाटप करण्यात आले. यात काही बँकांचे उद्दिष्ट अतिशय सुमार असल्याचे दिसते.