शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

पॅकेजमुळे भ्रष्टाचाराची साखळी फोफावली

By admin | Updated: March 11, 2015 01:41 IST

विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जे पॅकेज देण्यात आले. त्यातून काही साध्य झाले नाही. आपत्ती निवारणाच्या नावाने सरकार दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च करते;

वर्धा: विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जे पॅकेज देण्यात आले. त्यातून काही साध्य झाले नाही. आपत्ती निवारणाच्या नावाने सरकार दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च करते; मात्र ते पैसे वाया जातात. गत तीन वर्षात महाराष्ट्राने १५ हजार कोटींचे नुकसान भरपाईच्या नावाने वाटले. त्यामुळे भ्रष्टाचाराची साखळी पोसली गेली. या ऐवजी सर्व शेतकऱ्यांना पीकबुडी व किमान जीवनमानाची हमी देणाऱ्या विमायोजनेचे संरक्षण देण्यात यावे, असे मत अर्थतज्ज्ञ व महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य प्रा. एच.एम. देसरडा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.शेती दिवसेंदिवस अधिक व्यापक व बिकट होत असून आहे. त्यावर मुलगामी उपाययोजना केल्या खेरीज शेतकरी आत्महत्या थांबणार नाही. किंबहुना हवामान बदलामुळे अवर्षण, अवकाळी पाऊस, गारपीट, चक्रीवादळ, पीकबुडीच्या समस्या तीव्र होत आहे. हे संकट अस्मानी कमी व सुलतानी जास्त आहे. याला आजीमाजी केंद्र व राज्य शासनाचे धोरण कारणीभूत आहे.गोखले अर्थशास्त्र संस्थेच्या अवर्षण प्रतिरोध व जलसंपत्ती व्यवस्थापन केंद्राच्यावतीने त्यांनी राज्य सरकारला कायमस्वरूपी दुष्काळ निर्मूलनाचा आराखडा सादर केला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यात मुख्यत: शास्त्रशुद्ध पद्धतीने ‘माथा ते पायथा’ रिज टू व्हॉली लघु पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम चोखपणे अंमलबजावणी करण्याची शिफारस केली आहे. प्रा. देसरडा हे सध्या विदर्भाचा दौरा करीत आहेत. या संदर्भात नुकतीच अमरावती येथे एक विभागीय बैठक झाली. विदर्भातील दुष्काळ निर्मूलनासाठी लोक सहभागाने लघू-पाणलोट क्षेत्र विकासाचा कार्यक्रम प्रत्येक गाव शिवरात राबविण्यासाठी उपायावर येथे चर्चा झाली.(प्रतिनिधी)