शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

पॅकेजमुळे भ्रष्टाचाराची साखळी फोफावली

By admin | Updated: March 11, 2015 01:41 IST

विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जे पॅकेज देण्यात आले. त्यातून काही साध्य झाले नाही. आपत्ती निवारणाच्या नावाने सरकार दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च करते;

वर्धा: विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जे पॅकेज देण्यात आले. त्यातून काही साध्य झाले नाही. आपत्ती निवारणाच्या नावाने सरकार दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च करते; मात्र ते पैसे वाया जातात. गत तीन वर्षात महाराष्ट्राने १५ हजार कोटींचे नुकसान भरपाईच्या नावाने वाटले. त्यामुळे भ्रष्टाचाराची साखळी पोसली गेली. या ऐवजी सर्व शेतकऱ्यांना पीकबुडी व किमान जीवनमानाची हमी देणाऱ्या विमायोजनेचे संरक्षण देण्यात यावे, असे मत अर्थतज्ज्ञ व महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य प्रा. एच.एम. देसरडा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.शेती दिवसेंदिवस अधिक व्यापक व बिकट होत असून आहे. त्यावर मुलगामी उपाययोजना केल्या खेरीज शेतकरी आत्महत्या थांबणार नाही. किंबहुना हवामान बदलामुळे अवर्षण, अवकाळी पाऊस, गारपीट, चक्रीवादळ, पीकबुडीच्या समस्या तीव्र होत आहे. हे संकट अस्मानी कमी व सुलतानी जास्त आहे. याला आजीमाजी केंद्र व राज्य शासनाचे धोरण कारणीभूत आहे.गोखले अर्थशास्त्र संस्थेच्या अवर्षण प्रतिरोध व जलसंपत्ती व्यवस्थापन केंद्राच्यावतीने त्यांनी राज्य सरकारला कायमस्वरूपी दुष्काळ निर्मूलनाचा आराखडा सादर केला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यात मुख्यत: शास्त्रशुद्ध पद्धतीने ‘माथा ते पायथा’ रिज टू व्हॉली लघु पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम चोखपणे अंमलबजावणी करण्याची शिफारस केली आहे. प्रा. देसरडा हे सध्या विदर्भाचा दौरा करीत आहेत. या संदर्भात नुकतीच अमरावती येथे एक विभागीय बैठक झाली. विदर्भातील दुष्काळ निर्मूलनासाठी लोक सहभागाने लघू-पाणलोट क्षेत्र विकासाचा कार्यक्रम प्रत्येक गाव शिवरात राबविण्यासाठी उपायावर येथे चर्चा झाली.(प्रतिनिधी)