शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
3
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
4
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
5
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
6
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
7
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
8
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
9
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
10
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
11
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
12
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
13
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
14
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
15
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
16
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
17
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
18
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
20
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा

पॅकेजमुळे भ्रष्टाचाराची साखळी फोफावली

By admin | Updated: March 11, 2015 01:41 IST

विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जे पॅकेज देण्यात आले. त्यातून काही साध्य झाले नाही. आपत्ती निवारणाच्या नावाने सरकार दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च करते;

वर्धा: विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जे पॅकेज देण्यात आले. त्यातून काही साध्य झाले नाही. आपत्ती निवारणाच्या नावाने सरकार दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च करते; मात्र ते पैसे वाया जातात. गत तीन वर्षात महाराष्ट्राने १५ हजार कोटींचे नुकसान भरपाईच्या नावाने वाटले. त्यामुळे भ्रष्टाचाराची साखळी पोसली गेली. या ऐवजी सर्व शेतकऱ्यांना पीकबुडी व किमान जीवनमानाची हमी देणाऱ्या विमायोजनेचे संरक्षण देण्यात यावे, असे मत अर्थतज्ज्ञ व महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य प्रा. एच.एम. देसरडा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.शेती दिवसेंदिवस अधिक व्यापक व बिकट होत असून आहे. त्यावर मुलगामी उपाययोजना केल्या खेरीज शेतकरी आत्महत्या थांबणार नाही. किंबहुना हवामान बदलामुळे अवर्षण, अवकाळी पाऊस, गारपीट, चक्रीवादळ, पीकबुडीच्या समस्या तीव्र होत आहे. हे संकट अस्मानी कमी व सुलतानी जास्त आहे. याला आजीमाजी केंद्र व राज्य शासनाचे धोरण कारणीभूत आहे.गोखले अर्थशास्त्र संस्थेच्या अवर्षण प्रतिरोध व जलसंपत्ती व्यवस्थापन केंद्राच्यावतीने त्यांनी राज्य सरकारला कायमस्वरूपी दुष्काळ निर्मूलनाचा आराखडा सादर केला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यात मुख्यत: शास्त्रशुद्ध पद्धतीने ‘माथा ते पायथा’ रिज टू व्हॉली लघु पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम चोखपणे अंमलबजावणी करण्याची शिफारस केली आहे. प्रा. देसरडा हे सध्या विदर्भाचा दौरा करीत आहेत. या संदर्भात नुकतीच अमरावती येथे एक विभागीय बैठक झाली. विदर्भातील दुष्काळ निर्मूलनासाठी लोक सहभागाने लघू-पाणलोट क्षेत्र विकासाचा कार्यक्रम प्रत्येक गाव शिवरात राबविण्यासाठी उपायावर येथे चर्चा झाली.(प्रतिनिधी)