शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
4
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
5
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
6
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
7
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
8
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
9
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
10
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
11
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
12
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
13
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
14
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
15
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
16
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
17
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
18
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
19
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
20
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर

सरपंचाच्या गैरहजेरीतच चालतोय गावाचा कारभार

By admin | Updated: September 14, 2016 00:51 IST

येथील ग्रामपंचायतीचे सरपंच तीन महिन्यांपासून गैरहजर असल्याने विकास कामांत व्यत्यय निर्माण झाला आहे.

टाकरखेड ग्रामपंचायत : उपसरपंचाची गटविकास अधिकाऱ्यांना तक्रारटाकरखेड : येथील ग्रामपंचायतीचे सरपंच तीन महिन्यांपासून गैरहजर असल्याने विकास कामांत व्यत्यय निर्माण झाला आहे. असे असले तरी सर्व आर्थिक व्यवहारांवर सरपंच यांच्या सह्या घेतल्या जातात. मासिक सभा, ग्रामसभा उपसरपंचाच्या अध्यक्षतेत होत आहे. सरपंच यांच्या गैरहजेरीत सर्व अधिकार उपसरपंचाला असतात; पण हेतुपुरस्सर डावलले जात आहे, असा आरोप उपसरपंच वैशाली भुरभुरे यांनी केली आहे. याकडे लक्ष देत कार्यवाहीची मागणीही त्यांनी केली.सध्या ग्रा.पं. बेताल कारभार सुरु आहे. सर्व आर्थिक व्यवहारांची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी, असेही उपसरपंच भुरभुरे यांनी तक्रारीतून पं.स. गटविकास अधिकारी यांना कळविले आहे. ६ जुलै रोजी सरपंच तुषार मानकर यांचा अपघात झाला. ते आजारी आहेत. तेव्हापासून ते गावात नाहीत. बाहेरगावी उपचार घेत आहेत. यामुळे मासिक सभा, ग्रामसभा उपसरपंच वैशाली भुरभुरे यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आल्या; पण सर्व आर्थिक व्यवहार सरपंच यांच्या सहीने होत आहेत. ७ सप्टेंबरची मासिक सभा काढण्यात आली. त्या नोटीसवर सरपंच यांच्या सह्या घेण्यात आल्या. वास्तवित त्या सभेलाही ते उपस्थित नव्हते. जी व्यक्ती गावात हजर नाही, सभेला येऊ शकत नाही त्यांच्याच सहीने सर्व कामे होत असतील तर उपसरपंच यांनी कुणाकडे न्याय मागावा, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकारामुळे गावातील विकास कामे ठप्प झाली आहेत. बाहेर गावाहून कारभार चालत असतील तर स्थानिक लोकप्रतिनिधींचे कामच काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गावात अनेक समस्या असून ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. सरपंच सक्षम असतील तर त्यांनी गावात राहून स्वत: ग्रा.पं. मध्ये सभेला उपस्थित राहून कामकाज करावे, अन्यथा पदभार सोपवावा, अशी मागणीही भुरभुरे यांनी निवेदनातून केली आहे. याबाबत ग्रामसेविका मेघा कोळी यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा भ्रमणध्वनी स्विच आॅफ होता.(वार्ताहर)