शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

सरपंचाच्या गैरहजेरीतच चालतोय गावाचा कारभार

By admin | Updated: September 14, 2016 00:51 IST

येथील ग्रामपंचायतीचे सरपंच तीन महिन्यांपासून गैरहजर असल्याने विकास कामांत व्यत्यय निर्माण झाला आहे.

टाकरखेड ग्रामपंचायत : उपसरपंचाची गटविकास अधिकाऱ्यांना तक्रारटाकरखेड : येथील ग्रामपंचायतीचे सरपंच तीन महिन्यांपासून गैरहजर असल्याने विकास कामांत व्यत्यय निर्माण झाला आहे. असे असले तरी सर्व आर्थिक व्यवहारांवर सरपंच यांच्या सह्या घेतल्या जातात. मासिक सभा, ग्रामसभा उपसरपंचाच्या अध्यक्षतेत होत आहे. सरपंच यांच्या गैरहजेरीत सर्व अधिकार उपसरपंचाला असतात; पण हेतुपुरस्सर डावलले जात आहे, असा आरोप उपसरपंच वैशाली भुरभुरे यांनी केली आहे. याकडे लक्ष देत कार्यवाहीची मागणीही त्यांनी केली.सध्या ग्रा.पं. बेताल कारभार सुरु आहे. सर्व आर्थिक व्यवहारांची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी, असेही उपसरपंच भुरभुरे यांनी तक्रारीतून पं.स. गटविकास अधिकारी यांना कळविले आहे. ६ जुलै रोजी सरपंच तुषार मानकर यांचा अपघात झाला. ते आजारी आहेत. तेव्हापासून ते गावात नाहीत. बाहेरगावी उपचार घेत आहेत. यामुळे मासिक सभा, ग्रामसभा उपसरपंच वैशाली भुरभुरे यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आल्या; पण सर्व आर्थिक व्यवहार सरपंच यांच्या सहीने होत आहेत. ७ सप्टेंबरची मासिक सभा काढण्यात आली. त्या नोटीसवर सरपंच यांच्या सह्या घेण्यात आल्या. वास्तवित त्या सभेलाही ते उपस्थित नव्हते. जी व्यक्ती गावात हजर नाही, सभेला येऊ शकत नाही त्यांच्याच सहीने सर्व कामे होत असतील तर उपसरपंच यांनी कुणाकडे न्याय मागावा, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकारामुळे गावातील विकास कामे ठप्प झाली आहेत. बाहेर गावाहून कारभार चालत असतील तर स्थानिक लोकप्रतिनिधींचे कामच काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गावात अनेक समस्या असून ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. सरपंच सक्षम असतील तर त्यांनी गावात राहून स्वत: ग्रा.पं. मध्ये सभेला उपस्थित राहून कामकाज करावे, अन्यथा पदभार सोपवावा, अशी मागणीही भुरभुरे यांनी निवेदनातून केली आहे. याबाबत ग्रामसेविका मेघा कोळी यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा भ्रमणध्वनी स्विच आॅफ होता.(वार्ताहर)