शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

पाणी टंचाईचे केवळ 160 प्रस्ताव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 05:00 IST

उन्हाळ्याच्या दिवसांत पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विविध कामे हाती घेतली जातात. ग्रामीण भागातील या समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा विभाग प्रयत्न करतो. ३१ मार्चपूर्वी आलेल्या ३० लाखांपर्यंतच्या प्रस्तावांना मंजुरी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना राहात असल्याचे सांगण्यात आो; तर ३१ मार्चनंतरचे प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाला पाठवावे लागत असल्याचे वास्तव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात सूर्य आग ओकू लागला आहे. वाढत्या उष्णतामानाच्या तुलनेत पाणी समस्या निर्माण झालेली नाही. पण उन्हाळ्याच्या पुढील दिवसांत पाणी समस्या निकाली काढण्यासाठी प्रभावी नियोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाला एकूण २०६ प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यापैकी १६० प्रस्तावांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे, तर २१ प्रस्ताव ३१ मार्च २०२२ नंतर प्राप्त झाल्याने ते प्रस्ताव मंजुरीसाठी थेट शासनाला पाठविण्यात आले आहेत, तर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात २५ प्रस्तावांची तपासणी युद्धपातळीवर सुरू असून, हेही प्रस्ताव मंजुरीसाठी थेट शासनाला पाठविले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

३० लाखांपर्यंतच्या कामांना मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना-    उन्हाळ्याच्या दिवसांत पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विविध कामे हाती घेतली जातात. ग्रामीण भागातील या समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा विभाग प्रयत्न करतो. ३१ मार्चपूर्वी आलेल्या ३० लाखांपर्यंतच्या प्रस्तावांना मंजुरी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना राहात असल्याचे सांगण्यात आो; तर ३१ मार्चनंतरचे प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाला पाठवावे लागत असल्याचे वास्तव आहे.

गरज पडल्यास दहा टँकरने होणार पाणी पुरवठा-    जिल्ह्याचा माथा असलेल्या आष्टी तालुक्यासह कारंजा तालुक्यात उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी समस्या तोंड वर काढत होती. पण मध्यंतरी पाणी समस्या उद्भवणााऱ्या या गावांत पाणी पुरवठ्यासंदर्भातील विविध कामे करण्यात आल्याने ही गावे गतवर्षी टँकरमुक्त झाली आहेत. -   असे असले तरी एप्रिल ते जून या काळात पाणी समस्या बिकट झाल्यास आष्टी तालुक्यासाठी आठ, तर आर्वी तालुक्यासाठी दोन टँकर प्रस्तावित करण्यात आले आहेत. -    जिगरज पडल्यास नागरिकांची मागणी लक्षात घेता, तहसीलदारांच्या आदेशान्वये प्रत्यक्ष टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

पंचायत समिती स्तरावर होणार निविदा प्रक्रिया-   मंजूर प्रस्तावांची निविदा प्रक्रिया तीनदिवसीय विशेष मोहीम हाती घेऊन पंचायत समिती स्तरावर होणार आहे. विशेष म्हणजे मागीलवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीटंचाईची समस्या निकाली काढण्यासाठी सात कोटींचा निधी खर्च झाला होता, तर यंदा १४ कोटींचा आराखडा प्रस्तावित आहे.

पाणी टंचाईच्या १६० प्रस्तावांना जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाली आहे; तर २१ प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाला पाठविण्यात आले आहेत, शिवाय २५ प्रस्तावांची युद्धपातळीवर तपासणी सुरू असून, ते प्रस्ताव तातडीने मंजुरीसाठी शासनाला पाठविले जाणार आहेत. येत्या ४८ तासांत प्रस्ताव पाठविले जातील.- दीपक वाघ, कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा, जि.प., वर्धा.

 

टॅग्स :water shortageपाणीकपात