शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
4
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
5
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
6
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
7
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
8
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
9
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
10
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
11
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
12
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
13
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
14
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
15
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
16
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
17
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
18
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
19
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
20
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू

एकच ध्येय, शहर होवो टँकरमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 21:38 IST

शहरात कधी नव्हे एवढा पाण्याचा दुष्काळ यावर्षी पडला. विहिरी, बोअरवेल कोरड्या पडू लागल्या आहे. नगरपालिका पाणी पुरवठा करण्यास असमर्थ ठरली. शहरवासी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. अशातच पर्यावरण संवर्धन संस्था मागील ५ वर्षांपासून घरोघरी रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यावर भर देत आहे. पाणीटंचाईवर हा एकमात्र उपाय सुचवत आली आहे. आणि प्रत्यक्ष स्वरूपात कार्यही करीत आहे.

ठळक मुद्देपर्यावरण संवर्धन संस्थेचा उपक्रम : घरोघरी रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी प्रोत्साहन

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शहरात कधी नव्हे एवढा पाण्याचा दुष्काळ यावर्षी पडला. विहिरी, बोअरवेल कोरड्या पडू लागल्या आहे. नगरपालिका पाणी पुरवठा करण्यास असमर्थ ठरली. शहरवासी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. अशातच पर्यावरण संवर्धन संस्था मागील ५ वर्षांपासून घरोघरी रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यावर भर देत आहे. पाणीटंचाईवर हा एकमात्र उपाय सुचवत आली आहे. आणि प्रत्यक्ष स्वरूपात कार्यही करीत आहे.२०१७ ला ५ ठिकाणी करण्यात आलेल्या मोकळ्या जागेवरील जल संधारण उपक्रमातून वाढलेली पाण्याची पातळी पाहून याहीवर्षी संत तुकडोजी वॉर्ड येथील ३ ठिकाणी तर संत ज्ञानेश्वर वार्ड येथील पटवारी कॉलनीत हा उपक्रम राबविण्यात आला. ७ फुट खोलीचे खड्डे करून त्यात लहान-मोठे दगड भरण्यात आले.लोक वर्गणीतून दगडांची तर पर्यावरण संवर्धन संस्थेच्या वतीने जेसीबीची व्यवस्था करण्यात आली. श्रमदानातून या खड्ड्यांमध्ये दगड टाकण्यात आले. या अभियानात नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले आहेत. हा उपक्रम एकाच दिवशी चार ठिकाणी राबविण्यात आला.घरोघरी रेन वाटर हार्वेस्टिंगसाठी पर्यावरण संवर्धन प्रयत्नरत आहे. संस्थेने जनजागृतीतून पाण्याचे महत्त्व पटवून देऊन आणि नगरपालिकेला नियमांचे पालन करायला लावून अनेक घरांमध्ये रेन वाटर हार्वेस्टिंग करून घेतले. यावर्षी नगरसेवक मनोज वरघणे यांच्या घरी हा प्रयोग करण्यात आला. यामध्ये वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांनी तयार केलेले संयंत्र लावण्यात आले. तसेच खड्डा करून ड्रमच्या सहाय्यानेही पाणी जिरवण्याची व्यवस्था करण्यात आली.नगरपालिका प्रशासन उदासीनयावर्षी एवढा भयंकर दुष्काळ पडूनही नगरपालिका मात्र सुस्त आहे. दरवर्षी टँकरने पाणी पुरवठा करण्यावर भर देणाऱ्या नगरपालिकेने आता टँकरचे पाणी मिळणार नाही, असे सांगून जबाबदारीपासून पळ काढलेला आहे. पर्यावरण संवर्धन संस्थेने आजपर्यंत रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करण्याकररिता अनेकदा निवेदने दिली. परंतु यावर एकदाही जाणीवपूर्वक विचार करण्यात आला नाही. पाण्यासंबधी नेहमीच थातूर मातूर उपाययोजना केल्याने नदीने वेढलेल्या या शहरावर दुष्काळाशी सामना करण्याची वेळ ओढवली आहे.