शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

एकच ध्येय, शहर होवो टँकरमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 21:38 IST

शहरात कधी नव्हे एवढा पाण्याचा दुष्काळ यावर्षी पडला. विहिरी, बोअरवेल कोरड्या पडू लागल्या आहे. नगरपालिका पाणी पुरवठा करण्यास असमर्थ ठरली. शहरवासी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. अशातच पर्यावरण संवर्धन संस्था मागील ५ वर्षांपासून घरोघरी रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यावर भर देत आहे. पाणीटंचाईवर हा एकमात्र उपाय सुचवत आली आहे. आणि प्रत्यक्ष स्वरूपात कार्यही करीत आहे.

ठळक मुद्देपर्यावरण संवर्धन संस्थेचा उपक्रम : घरोघरी रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी प्रोत्साहन

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शहरात कधी नव्हे एवढा पाण्याचा दुष्काळ यावर्षी पडला. विहिरी, बोअरवेल कोरड्या पडू लागल्या आहे. नगरपालिका पाणी पुरवठा करण्यास असमर्थ ठरली. शहरवासी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. अशातच पर्यावरण संवर्धन संस्था मागील ५ वर्षांपासून घरोघरी रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यावर भर देत आहे. पाणीटंचाईवर हा एकमात्र उपाय सुचवत आली आहे. आणि प्रत्यक्ष स्वरूपात कार्यही करीत आहे.२०१७ ला ५ ठिकाणी करण्यात आलेल्या मोकळ्या जागेवरील जल संधारण उपक्रमातून वाढलेली पाण्याची पातळी पाहून याहीवर्षी संत तुकडोजी वॉर्ड येथील ३ ठिकाणी तर संत ज्ञानेश्वर वार्ड येथील पटवारी कॉलनीत हा उपक्रम राबविण्यात आला. ७ फुट खोलीचे खड्डे करून त्यात लहान-मोठे दगड भरण्यात आले.लोक वर्गणीतून दगडांची तर पर्यावरण संवर्धन संस्थेच्या वतीने जेसीबीची व्यवस्था करण्यात आली. श्रमदानातून या खड्ड्यांमध्ये दगड टाकण्यात आले. या अभियानात नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले आहेत. हा उपक्रम एकाच दिवशी चार ठिकाणी राबविण्यात आला.घरोघरी रेन वाटर हार्वेस्टिंगसाठी पर्यावरण संवर्धन प्रयत्नरत आहे. संस्थेने जनजागृतीतून पाण्याचे महत्त्व पटवून देऊन आणि नगरपालिकेला नियमांचे पालन करायला लावून अनेक घरांमध्ये रेन वाटर हार्वेस्टिंग करून घेतले. यावर्षी नगरसेवक मनोज वरघणे यांच्या घरी हा प्रयोग करण्यात आला. यामध्ये वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांनी तयार केलेले संयंत्र लावण्यात आले. तसेच खड्डा करून ड्रमच्या सहाय्यानेही पाणी जिरवण्याची व्यवस्था करण्यात आली.नगरपालिका प्रशासन उदासीनयावर्षी एवढा भयंकर दुष्काळ पडूनही नगरपालिका मात्र सुस्त आहे. दरवर्षी टँकरने पाणी पुरवठा करण्यावर भर देणाऱ्या नगरपालिकेने आता टँकरचे पाणी मिळणार नाही, असे सांगून जबाबदारीपासून पळ काढलेला आहे. पर्यावरण संवर्धन संस्थेने आजपर्यंत रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करण्याकररिता अनेकदा निवेदने दिली. परंतु यावर एकदाही जाणीवपूर्वक विचार करण्यात आला नाही. पाण्यासंबधी नेहमीच थातूर मातूर उपाययोजना केल्याने नदीने वेढलेल्या या शहरावर दुष्काळाशी सामना करण्याची वेळ ओढवली आहे.