शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

एकच ध्येय, शहर होवो टँकरमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 21:38 IST

शहरात कधी नव्हे एवढा पाण्याचा दुष्काळ यावर्षी पडला. विहिरी, बोअरवेल कोरड्या पडू लागल्या आहे. नगरपालिका पाणी पुरवठा करण्यास असमर्थ ठरली. शहरवासी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. अशातच पर्यावरण संवर्धन संस्था मागील ५ वर्षांपासून घरोघरी रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यावर भर देत आहे. पाणीटंचाईवर हा एकमात्र उपाय सुचवत आली आहे. आणि प्रत्यक्ष स्वरूपात कार्यही करीत आहे.

ठळक मुद्देपर्यावरण संवर्धन संस्थेचा उपक्रम : घरोघरी रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी प्रोत्साहन

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शहरात कधी नव्हे एवढा पाण्याचा दुष्काळ यावर्षी पडला. विहिरी, बोअरवेल कोरड्या पडू लागल्या आहे. नगरपालिका पाणी पुरवठा करण्यास असमर्थ ठरली. शहरवासी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. अशातच पर्यावरण संवर्धन संस्था मागील ५ वर्षांपासून घरोघरी रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यावर भर देत आहे. पाणीटंचाईवर हा एकमात्र उपाय सुचवत आली आहे. आणि प्रत्यक्ष स्वरूपात कार्यही करीत आहे.२०१७ ला ५ ठिकाणी करण्यात आलेल्या मोकळ्या जागेवरील जल संधारण उपक्रमातून वाढलेली पाण्याची पातळी पाहून याहीवर्षी संत तुकडोजी वॉर्ड येथील ३ ठिकाणी तर संत ज्ञानेश्वर वार्ड येथील पटवारी कॉलनीत हा उपक्रम राबविण्यात आला. ७ फुट खोलीचे खड्डे करून त्यात लहान-मोठे दगड भरण्यात आले.लोक वर्गणीतून दगडांची तर पर्यावरण संवर्धन संस्थेच्या वतीने जेसीबीची व्यवस्था करण्यात आली. श्रमदानातून या खड्ड्यांमध्ये दगड टाकण्यात आले. या अभियानात नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले आहेत. हा उपक्रम एकाच दिवशी चार ठिकाणी राबविण्यात आला.घरोघरी रेन वाटर हार्वेस्टिंगसाठी पर्यावरण संवर्धन प्रयत्नरत आहे. संस्थेने जनजागृतीतून पाण्याचे महत्त्व पटवून देऊन आणि नगरपालिकेला नियमांचे पालन करायला लावून अनेक घरांमध्ये रेन वाटर हार्वेस्टिंग करून घेतले. यावर्षी नगरसेवक मनोज वरघणे यांच्या घरी हा प्रयोग करण्यात आला. यामध्ये वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांनी तयार केलेले संयंत्र लावण्यात आले. तसेच खड्डा करून ड्रमच्या सहाय्यानेही पाणी जिरवण्याची व्यवस्था करण्यात आली.नगरपालिका प्रशासन उदासीनयावर्षी एवढा भयंकर दुष्काळ पडूनही नगरपालिका मात्र सुस्त आहे. दरवर्षी टँकरने पाणी पुरवठा करण्यावर भर देणाऱ्या नगरपालिकेने आता टँकरचे पाणी मिळणार नाही, असे सांगून जबाबदारीपासून पळ काढलेला आहे. पर्यावरण संवर्धन संस्थेने आजपर्यंत रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करण्याकररिता अनेकदा निवेदने दिली. परंतु यावर एकदाही जाणीवपूर्वक विचार करण्यात आला नाही. पाण्यासंबधी नेहमीच थातूर मातूर उपाययोजना केल्याने नदीने वेढलेल्या या शहरावर दुष्काळाशी सामना करण्याची वेळ ओढवली आहे.