शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दिवाळीमध्ये पेटणार जुन्याच कापसाच्या वाती

By admin | Updated: October 14, 2014 23:22 IST

खरीप हंगाम सुरू झाल्यापासून कपाशीचे पीक विविध संकटांचा सामना करीत आहे. या पिकाच्या अवस्थेमुळे कापूस उत्पादक त्रस्त झाले़ या शेती हंगामात आतापर्यंतचा पावसाचा लहरीपणा कपाशीला

वर्धा : खरीप हंगाम सुरू झाल्यापासून कपाशीचे पीक विविध संकटांचा सामना करीत आहे. या पिकाच्या अवस्थेमुळे कापूस उत्पादक त्रस्त झाले़ या शेती हंगामात आतापर्यंतचा पावसाचा लहरीपणा कपाशीला प्रभावित करणारा ठरला़ सध्या कोरडवाहू खारपान पट्ट्यात कपाशीची बोंड परिपक्व होत आहे़ यामुळे दिवाळीत यंदा शेतकऱ्यांच्या घरी पेटणाऱ्या दिव्यांमध्ये जुन्याच कापसाच्या वाती राहतील, हे वास्तव शेतकरी बोलून दाखवितात़ यंदा खरीप तथा रबी हंगाम शेतकऱ्यांसाठी मृजवळ ठरले़ खरीपाच्या पेरण्या उशीरा झाल्या. त्यातच अनेक शेतांत भूजिया भुंग्याने अंकुरलेले कपाशीचे कोंब कुरतडले होते. शेतकऱ्यांना प्रारंभीच या संकटांच्या उपाययोजनेवर मोठा खर्च करावा लागला़ यानंतर कपाशीला पाण्याचा ताण सहन करावा लागला. यातच कपाशीवर रसशोषक कीडींचा प्रादुर्भाव जाणवत होता. एकीकडे कीटकनाशकांची फवारणी सुरू होती तर दुसरीकडे संरक्षित कपाशीला तुषार संचाद्वारे पाणी दिले जात होते. काही दिवसांनी पावसाचे सत्र सुरू झाले. यामुळे कपाशीच्या शेतातील मशगतीची कामे थांबली़ शेतात पाणी साचून होते. डवरण व निंदण न झाल्याने कपाशीच्या वाढीवर परिणाम झाला होता. पावसाचे वातावरण दूर होताच कपाशीवर फुलकीडे, तुडतुडे, पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाला़ यावेळी शेतकऱ्यांची फवारणी पांढऱ्या माशीपुढे बेअसर ठरल्याचे शेतकरी सांगतात. पांढऱ्या माशीचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार फवारणीची कामे करावी लागली. हिरवीगार कपाशीची पाने आता लालसर होत आहे़ लाल्या आल्याने कपाशीचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बागायती शेती क्षेत्रात शेतकऱ्यांना पूर्ण हंगामी कपाशीची लागवड केली होती. अशा शेतकऱ्यांच्या घरात सध्या कापूस आला आहे. शेतांत कापूस वेचणीची कामे मजुरांकडून केली जात आहेत; पण कोरडवाहू खारपान पट्ट्यात कपाशीचे बोंड परिपक्व होत आहे़ दसरा गेला, दिवाळी आली तरी शेतकऱ्यांच्या घरात कापूस येण्याची चिन्हे नाहीत. शिवाय परतीचा पाऊस नसल्याने उत्पादन घटणार असल्याचे दिसते़(कार्यालय प्रतिनिधी)