शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
2
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
3
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
4
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
5
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
7
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
8
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
9
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
10
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
11
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
12
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
13
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
14
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
15
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
16
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
17
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
18
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
19
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
20
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 

न.पं. कर्मचारी तुटपुंज्या वेतनावर

By admin | Updated: April 6, 2017 00:16 IST

दोन वर्षापूर्वी समुद्रपूर येथे नगरपंचायत अस्तित्वात आली. परंतु अजूनही येथील कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत काळातील जुने वेतन दिले जाते.

नागरिकांची गैरसोय : कर्मचाऱ्यांच्या कमी संख्येमुळे कामाचा ताण समुद्रपूर : दोन वर्षापूर्वी समुद्रपूर येथे नगरपंचायत अस्तित्वात आली. परंतु अजूनही येथील कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत काळातील जुने वेतन दिले जाते. यात सुटीच्या दिवसाचे वेतन कापले जाते. न.पं. आकृतीबंधानुसार पुरेसे कर्मचारी नसल्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडतो. आकृतीबंधानुसार जुन्या कर्मचाऱ्यांना कायम करून उर्वरित जागी नवीन कर्मचारी त्वरित नियुक्त करावे, अशी मागणी नागरिकातून होत आहे. सध्या येथील कर्मचाऱ्यांना १०० ते १५० रूपये रोज याप्रमाणे वेतन दिले जाते. हे वेतन शेतमजूराच्या मजुरीपेक्षाही कमी आहे. महागाईच्या काळात हे वेतन अत्यंत तुटपुंजे असल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहे. अपुरी कर्मचारी संख्या, अल्पवेतन व कामाचा ताण यामुळे नागरी सेवा, सुविधा व कार्यालयीन कामकाजावर विपरीत परिणाम होऊन नागरिकांची गैरसोय होताना दिसते. त्यामुळे येथे कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी नागरिकातून होत आहे. दोन वर्षापूर्वी तालुका स्थळ म्हणून समुद्रपूर ग्रामपंचायतीला नगरपंचायतचा दर्जा प्राप्त झाला. दर्जा वाढला तसे कामही वाढले. परंतु वेतनाचा दर्जा वाढण्याची कर्मचाऱ्यांची अपेक्षा अद्याप पूर्ण होताना दिसत नाही. याउलट नगरपंचायतीच्या नियमानुसार सुटीच्या दिवसांचे वेतन कपात केले जाते. यापेक्षा ग्रामपंचायतच बरी होती, असे म्हणण्याची वेळ येथील कर्मचाऱ्यांवर आली आहे. नगरपंचायतच्या आकृतीबंधानुसार वीस कर्मचारी आवश्यक असताना येथे फक्त अकरा कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये जुने आठ कर्मचारी व रोजमजुरी प्रमाणे काम करणारे नवीन तीन कर्मचारी अशी संख्या आहे. नगरपंचायतीला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळण्यास आठ महिन्यांचा कालावधी लागला. आता आकृतीबंधानुसार पूर्ण कर्मचारी उपलब्ध होण्यास आणखी किती कालावधी लागेल असा प्रश्न नागरिक उपस्थित करतात. तालुक्याचे स्थळ असल्याने मागील काही वर्षामध्ये शहराच्या लोकवस्तीत बरीच वाढ झाली आहे. त्यामुळे नागरी सेवा व सुविधांबाबतची मागणी वाढली आहे. त्यामुळे येथे आकृतीबंधानुसार कर्मचारी उपलब्ध करुन देणे गरजेचे ठरत आहे. शहरातील विविध वॉर्डात अस्वच्छता आढळते. जनावरांच्या कोंडवाड्याकडे लक्ष द्यायला कर्मचारी नाही. पाणीपुरवठा वेळेत सुरू होत नाही. यासोबतच नागरिकांची कार्यालयीन कामेही प्रभावित होत आहे. आकृतीबंधानुसार कर्मचारी उपलब्ध असल्यास नागरिकांच्या समस्या वेळेत निकाली निघु शकतात. (शहर प्रतिनिधी)