शहरं
Join us  
Trending Stories
1
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
2
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
3
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
4
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
5
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
6
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
7
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
8
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
9
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
10
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
11
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
12
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
13
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
14
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
15
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
16
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
17
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
18
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
19
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
20
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?

न.पं. कर्मचारी तुटपुंज्या वेतनावर

By admin | Updated: April 6, 2017 00:16 IST

दोन वर्षापूर्वी समुद्रपूर येथे नगरपंचायत अस्तित्वात आली. परंतु अजूनही येथील कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत काळातील जुने वेतन दिले जाते.

नागरिकांची गैरसोय : कर्मचाऱ्यांच्या कमी संख्येमुळे कामाचा ताण समुद्रपूर : दोन वर्षापूर्वी समुद्रपूर येथे नगरपंचायत अस्तित्वात आली. परंतु अजूनही येथील कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत काळातील जुने वेतन दिले जाते. यात सुटीच्या दिवसाचे वेतन कापले जाते. न.पं. आकृतीबंधानुसार पुरेसे कर्मचारी नसल्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडतो. आकृतीबंधानुसार जुन्या कर्मचाऱ्यांना कायम करून उर्वरित जागी नवीन कर्मचारी त्वरित नियुक्त करावे, अशी मागणी नागरिकातून होत आहे. सध्या येथील कर्मचाऱ्यांना १०० ते १५० रूपये रोज याप्रमाणे वेतन दिले जाते. हे वेतन शेतमजूराच्या मजुरीपेक्षाही कमी आहे. महागाईच्या काळात हे वेतन अत्यंत तुटपुंजे असल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहे. अपुरी कर्मचारी संख्या, अल्पवेतन व कामाचा ताण यामुळे नागरी सेवा, सुविधा व कार्यालयीन कामकाजावर विपरीत परिणाम होऊन नागरिकांची गैरसोय होताना दिसते. त्यामुळे येथे कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी नागरिकातून होत आहे. दोन वर्षापूर्वी तालुका स्थळ म्हणून समुद्रपूर ग्रामपंचायतीला नगरपंचायतचा दर्जा प्राप्त झाला. दर्जा वाढला तसे कामही वाढले. परंतु वेतनाचा दर्जा वाढण्याची कर्मचाऱ्यांची अपेक्षा अद्याप पूर्ण होताना दिसत नाही. याउलट नगरपंचायतीच्या नियमानुसार सुटीच्या दिवसांचे वेतन कपात केले जाते. यापेक्षा ग्रामपंचायतच बरी होती, असे म्हणण्याची वेळ येथील कर्मचाऱ्यांवर आली आहे. नगरपंचायतच्या आकृतीबंधानुसार वीस कर्मचारी आवश्यक असताना येथे फक्त अकरा कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये जुने आठ कर्मचारी व रोजमजुरी प्रमाणे काम करणारे नवीन तीन कर्मचारी अशी संख्या आहे. नगरपंचायतीला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळण्यास आठ महिन्यांचा कालावधी लागला. आता आकृतीबंधानुसार पूर्ण कर्मचारी उपलब्ध होण्यास आणखी किती कालावधी लागेल असा प्रश्न नागरिक उपस्थित करतात. तालुक्याचे स्थळ असल्याने मागील काही वर्षामध्ये शहराच्या लोकवस्तीत बरीच वाढ झाली आहे. त्यामुळे नागरी सेवा व सुविधांबाबतची मागणी वाढली आहे. त्यामुळे येथे आकृतीबंधानुसार कर्मचारी उपलब्ध करुन देणे गरजेचे ठरत आहे. शहरातील विविध वॉर्डात अस्वच्छता आढळते. जनावरांच्या कोंडवाड्याकडे लक्ष द्यायला कर्मचारी नाही. पाणीपुरवठा वेळेत सुरू होत नाही. यासोबतच नागरिकांची कार्यालयीन कामेही प्रभावित होत आहे. आकृतीबंधानुसार कर्मचारी उपलब्ध असल्यास नागरिकांच्या समस्या वेळेत निकाली निघु शकतात. (शहर प्रतिनिधी)