शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

आता शेतकरी फिरतोय मजुरांच्या शोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2015 23:59 IST

शेतकरी हा ग्रामीण जीवनाचा केंद्रबिंदू मानले जाते. कारण शेती हाच ग्रामीण भागातील प्रमुख उद्योग आहे.

शेती मशागतीच्या कामांना वेग : यंदा शेतमजुरीत वाढ होण्याची शक्यताघोराड : शेतकरी हा ग्रामीण जीवनाचा केंद्रबिंदू मानले जाते. कारण शेती हाच ग्रामीण भागातील प्रमुख उद्योग आहे. त्यामुळे भारतासारख्या खेड्यांच्या देशामध्ये संपूर्ण देशाच्या आर्थिक स्वास्थाची जबाबदारी पर्यायाने या शेतकऱ्यांवर आहे. पण तोच शेतकरी आज मजुरांच्या टंचाईमुळे अडचणीत आला असल्याची स्थिती आहे. शेती मशागतीच्या कामांना प्रारंभ झाला तरी मजूर मिळेना अशी स्थिती परिसरातील गावात निर्माण झाली आहे.काम मिळावे, मजूरी करून पोटाची खळगी भरावी म्हणून दिवस उजाडल्या बरोबर पूर्वी मजूराला कामाचा शोध घ्यावा लागत होता. काम आहे का म्हणून मजूर आधी शेतकऱ्यांच्या दारात जावून विचारायचा पण आता शेतकऱ्यांनाच मजूरांच्या दारी, फिरण्याची वेळ आली आहे. शिवाय एवढं फिरूनही मजूर मिळत नाही अशी विदारक परिस्थिती ग्रामीण भागात निर्माण झाली आहे. वाजवीपेक्षा जास्त मजूरी देवून मजूर कामावर येतो. तरीही मनासारखे व चांगले काम होत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. शेती व्यवसाय व शेतीचे क्षेत्रफळ दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिसते. त्या तुलनेत लोकसंख्या मात्र सपाट्याने वाढत आहे. शेती कामे आणि लोकसंख्या अफाट यांच्या विचार केला तर मजूरांची कमतरता भासायलाच नको. परंतु परिस्थिती मात्र याउलट आहे. दिवसागणिक गावागावात मजूर मिळेनासा झाला आहे. सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यावर ही वेळ आल्याचे बोलले जात आहे. पूर्वी कामाच्या शोधात असलेला शेतमजूर शेतकऱ्यांला कामासाठी विनवणी करायचा, शेतकऱ्याने नाही म्हटल तर थोडतरी काम द्या अशी विणवणी केली जात. पण आता काही काम केले नाही तरी मजूराची चूल पेटायची राहणार नाही अशी स्थिती पालटली आहे. शेतकऱ्यांवर आता मजूरांच्या दारी फिरण्याची वेळ आली आहे. प्रत्येक गावात काही विशिष्ट लोकच शेतमजूरीचे काम करतात. परिसरातील चित्र पाहले असता ८० टक्के घरी फक्त महिला वर्गच मजुरीला जातात. यांत्रिकीकरणाच्या काळातही मजुरांची आवश्यकता भासते. तरीही मजूर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. यात मजुरांची वेळ कमी केली तरीही पैसे द्यावे लागत आहे. यंदाच्या नापिकीने शेती मशागतीचे कामे कशी करावी असा प्रश्न असताना शेतकऱ्यांना मजुराकरिता भटकंती करावी लागत असल्याने दुहेरी संकट आले आहे. घड्याळाचे काटे बघून काम होत असल्याने कामात लक्ष राहत नाही. शेतकऱ्यांना शेतमालाला खर्चापेक्षाही कमी भाव मिळत असल्याची स्थिती आहे. यातच यंदा मजुरीचे दर वाढण्याचे संकेत असल्याने शेतकऱ्यांपुढे नवी समस्या आली आहे.(वार्ताहर) ग्रामीण जीवनाचा केंद्रबिंदू हरवतोयशेतकऱ्यांना सततची नापिकी यासह मजुराच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. यातच मजुरीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. शेती मशागतीच्या कामांना प्रारंभ झाला तरी मजूर मिळेना अशी स्थिती परिसरातील गावात निर्माण झाली आहे.वाजवीपेक्षा जास्त मजूरी देवून मजूर कामावर येतो. तरीही मनासारखे व चांगले काम होत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.यांत्रिकीकरणाच्या काळात शेतीची काही कामे आजही मजुरांकरवी होत असतात. यात शेतकऱ्यांना फरपट होत आहे.