शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

आता शेतकरी फिरतोय मजुरांच्या शोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2015 23:59 IST

शेतकरी हा ग्रामीण जीवनाचा केंद्रबिंदू मानले जाते. कारण शेती हाच ग्रामीण भागातील प्रमुख उद्योग आहे.

शेती मशागतीच्या कामांना वेग : यंदा शेतमजुरीत वाढ होण्याची शक्यताघोराड : शेतकरी हा ग्रामीण जीवनाचा केंद्रबिंदू मानले जाते. कारण शेती हाच ग्रामीण भागातील प्रमुख उद्योग आहे. त्यामुळे भारतासारख्या खेड्यांच्या देशामध्ये संपूर्ण देशाच्या आर्थिक स्वास्थाची जबाबदारी पर्यायाने या शेतकऱ्यांवर आहे. पण तोच शेतकरी आज मजुरांच्या टंचाईमुळे अडचणीत आला असल्याची स्थिती आहे. शेती मशागतीच्या कामांना प्रारंभ झाला तरी मजूर मिळेना अशी स्थिती परिसरातील गावात निर्माण झाली आहे.काम मिळावे, मजूरी करून पोटाची खळगी भरावी म्हणून दिवस उजाडल्या बरोबर पूर्वी मजूराला कामाचा शोध घ्यावा लागत होता. काम आहे का म्हणून मजूर आधी शेतकऱ्यांच्या दारात जावून विचारायचा पण आता शेतकऱ्यांनाच मजूरांच्या दारी, फिरण्याची वेळ आली आहे. शिवाय एवढं फिरूनही मजूर मिळत नाही अशी विदारक परिस्थिती ग्रामीण भागात निर्माण झाली आहे. वाजवीपेक्षा जास्त मजूरी देवून मजूर कामावर येतो. तरीही मनासारखे व चांगले काम होत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. शेती व्यवसाय व शेतीचे क्षेत्रफळ दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिसते. त्या तुलनेत लोकसंख्या मात्र सपाट्याने वाढत आहे. शेती कामे आणि लोकसंख्या अफाट यांच्या विचार केला तर मजूरांची कमतरता भासायलाच नको. परंतु परिस्थिती मात्र याउलट आहे. दिवसागणिक गावागावात मजूर मिळेनासा झाला आहे. सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यावर ही वेळ आल्याचे बोलले जात आहे. पूर्वी कामाच्या शोधात असलेला शेतमजूर शेतकऱ्यांला कामासाठी विनवणी करायचा, शेतकऱ्याने नाही म्हटल तर थोडतरी काम द्या अशी विणवणी केली जात. पण आता काही काम केले नाही तरी मजूराची चूल पेटायची राहणार नाही अशी स्थिती पालटली आहे. शेतकऱ्यांवर आता मजूरांच्या दारी फिरण्याची वेळ आली आहे. प्रत्येक गावात काही विशिष्ट लोकच शेतमजूरीचे काम करतात. परिसरातील चित्र पाहले असता ८० टक्के घरी फक्त महिला वर्गच मजुरीला जातात. यांत्रिकीकरणाच्या काळातही मजुरांची आवश्यकता भासते. तरीही मजूर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. यात मजुरांची वेळ कमी केली तरीही पैसे द्यावे लागत आहे. यंदाच्या नापिकीने शेती मशागतीचे कामे कशी करावी असा प्रश्न असताना शेतकऱ्यांना मजुराकरिता भटकंती करावी लागत असल्याने दुहेरी संकट आले आहे. घड्याळाचे काटे बघून काम होत असल्याने कामात लक्ष राहत नाही. शेतकऱ्यांना शेतमालाला खर्चापेक्षाही कमी भाव मिळत असल्याची स्थिती आहे. यातच यंदा मजुरीचे दर वाढण्याचे संकेत असल्याने शेतकऱ्यांपुढे नवी समस्या आली आहे.(वार्ताहर) ग्रामीण जीवनाचा केंद्रबिंदू हरवतोयशेतकऱ्यांना सततची नापिकी यासह मजुराच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. यातच मजुरीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. शेती मशागतीच्या कामांना प्रारंभ झाला तरी मजूर मिळेना अशी स्थिती परिसरातील गावात निर्माण झाली आहे.वाजवीपेक्षा जास्त मजूरी देवून मजूर कामावर येतो. तरीही मनासारखे व चांगले काम होत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.यांत्रिकीकरणाच्या काळात शेतीची काही कामे आजही मजुरांकरवी होत असतात. यात शेतकऱ्यांना फरपट होत आहे.