शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
4
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
5
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
6
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
7
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
8
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
9
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
10
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
11
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
12
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
13
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
14
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
15
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
16
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
17
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
18
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
19
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
20
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन

ग्रामपंचायत भवनासाठी आता २० लाख

By admin | Updated: January 31, 2015 01:58 IST

जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासोबतच ग्रामीण भागातील रस्त्यांची सुधारणा, ग्रामपंचायत भवनासाठी २० लाखांपर्यंत वाढीव निधी तसेच सिंचनासह कृषी उत्पादन ..

वर्धा : जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासोबतच ग्रामीण भागातील रस्त्यांची सुधारणा, ग्रामपंचायत भवनासाठी २० लाखांपर्यंत वाढीव निधी तसेच सिंचनासह कृषी उत्पादन वाढीसाठी जिल्हा वार्षिक आराखड्यात विशेष प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी दिली. जिल्हा वार्षिक योजनेच्या २०१५-१६ करिता सर्वसाधारण योेजनेंतर्गत १४५ कोटी २० लक्ष ८५ हजार रुपयांच्या प्रारूप आराखड्याला मान्यता देण्यात आली. जिल्ह्याकरिता ८२ कोटी ६५ लक्ष रुपये खर्चाच्या प्रस्तावित आराखड्यापेक्षा ६२ कोटी ५५ लक्ष ८५ हजार रुपये अधिक खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. अनुसूचित जाती उपाय योजनेअंतर्गत ३५ कोटी ३२ लक्ष ७४ हजार खर्चाचा तर आदिवासी क्षेत्रबाह्य योजनेअंतर्गत २७ कोटी ३६ लक्ष ३६ हजार रुपये खर्चाच्या आराखड्याला पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आली.(जिल्हा प्रतिनिधी)ठाणेदाराच्या स्थानांतर रद्दसाठी पालकमंत्र्यांना ग्रामस्थांचे साकडे, हिंगणघाट आमदार व ग्रामस्थांमध्ये शाब्दिक चकमकगिरड येथील ठाणेदार चिंचोळकर यांचे पोलीस अधीक्षकांनी स्थानांतर केले. ही बाब गिरडवासीयांना चांगलीच खटकली. सदर स्थानांतर राजकीय दबावाखाली करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला. गावातून सुमारे ५० वर महिला पुरुषांचे शिष्टमंडळ सदर स्थानांतर रद्द करण्याच्या मागणीला घेऊन वर्धेत आले होते. या नागरिकांनी विश्राम भवनापुढे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना साकडे घालून स्थानांतर रद्द करण्याची मागणी रेटून धरली. यावर पालकमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालून योग्य तो निर्णय घेऊ असे सांगितले. तत्पूर्वी आमदार समीर कुणावार यांनी गावकऱ्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला; मात्र ग्रामस्थ आणि आमदारात शाब्दिक चकमक उडाली. यानंतर ना. मुनगंटीवार यांनी स्वत: गावकऱ्यांची बाजू समजून घेत त्यांचे समाधान केले.देवळीच्या क्रीडा अधिकाऱ्यावर कार्यवाहीचे निर्देश देवळी तालुका क्रीडा अधिकारी नेहमीच कार्यालयात गैरहजर राहतात. याबाबत अनेकदा कारणे दाखवा नोटीस बजावून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला; मात्र काहीच कार्यवाही झाली नसल्याची बाब पुढे आली. यावेळी पालकमंत्र्यांनी एकदा संधी द्या नंतर निलंबन करण्याच्या सूचना केल्यात. पीक विम्याचा प्रश्न शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची रक्कम अद्यापही मिळालेली नाही. हा विषय सभेत चांगलाच गाजला. सोबतच २०१३ मध्ये अतिवृष्टीने शेत जमीन खरडून गेली. याची भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही, याकडेही सभेत लक्ष वेधण्यात आले. चर्चेअंती पालकमंत्र्यांनी तात्काळ बैठक घेऊन विषय निकाली काढण्याच्या सूचना केल्यात.वर्धा शहरातील पाणी पुरवठावर्धा शहराला तब्बल पाच दिवसाआड पाणी पुरवठा होतो. ही योजनाच जिर्ण झाल्याची बाब पुढे आली. नव्या योजनेला १०० कोटींचा खर्च लागतो. मात्र पालिकेकडे तेवढा निधी नाही.