शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

उदंड जाहल्या इमारती, वाहनतळ मात्र नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 22:44 IST

शहरातील प्रमुख मार्गाच्या दुतर्फा मागील काही वर्षांत गगनचुंबी इमारती उभारल्या गेल्यात. मात्र, बहुतांश इमारतींमध्ये वाहनतळाची व्यवस्थाच नाही. परिणामी, सार्वजनिक व्यवस्थेवर ताण पडत आहे. यात कारवाई करताना वाहतूक पोलिसांची हतबलताही दिसून येत आहे.

ठळक मुद्देशहरातील चित्र : सार्वजनिक व्यवस्थेवर पडतोय ताण, पालिकेची नियोजनशून्यता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील प्रमुख मार्गाच्या दुतर्फा मागील काही वर्षांत गगनचुंबी इमारती उभारल्या गेल्यात. मात्र, बहुतांश इमारतींमध्ये वाहनतळाची व्यवस्थाच नाही. परिणामी, सार्वजनिक व्यवस्थेवर ताण पडत आहे. यात कारवाई करताना वाहतूक पोलिसांची हतबलताही दिसून येत आहे. याला पालिकेची नियोजनशून्यता कारणीभूत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.मागील काही वर्षांत शहराचा झपाट्याने विकास झाला. एकंदरीत विस्ताराने शहर बेढब झाले. शहरातील प्रमुख मार्गालगत अनेकांनी अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले. मात्र, वाहनतळाची कुठेही व्यवस्था करण्यात आली नाही. यामुळे बाजारपेठेत येणारे नागरिक वाट्टेल तेथे वाहने उभी करताना दिसून येतात. वाहनतळच नसल्याने वाहनधारक तरी काय करणार, चक्क अर्ध्या रस्त्यापर्यंत वाहने उभी केलेली आढळून येतात. यात अनेक वाहनचालकांना वाहतूक पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागते. यात कधीकाळी पोलिसांनाच त्यांचा रोष ओढवून घ्यावा लागतो. भरीस भर बाजारपेठेतील अनेक व्यावसायिक आपल्या दुकानातील साहित्य अर्ध्या ररस्त्यापर्यंत थाटतात. यामुळेदेखील वाहतुकीची दररोज कोंडी होताना दिसते. वर्ष, दोन वर्षांपूर्वी वाहतूक पोलिसांनी व्यावसायिकांवर न्यायालयीन दंडात्मक कारवाई केली होती. यानंतर रस्त्यावर साहित्य थाटण्याचा प्रकार थांबला होता. आता परत हा प्रकार सुरू झाला आहे. वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांवर कारवाई करण्यापूर्वी व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांतून होत आहे. पालिकेने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.बांधकामांना परवानगी कशी?कुठलेही बांधकाम करण्यापूर्वी नगरपालिकेतील नगररचना विभागात संबंधित बांधकामाच्या नकाशासह इतर कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. यानंतरच बांधकामाला रीतसर परवानगी मिळते. अनेकजण नकाशात वाहनतळाची सुविधा दाखवितात. प्रत्यक्षात बांधकामावेळी मात्र वाहनतळाचा समावेश नसतो. याची पालिकेतील नगररचना विभागातील अधिकाऱ्यांकडूनही खातरजमा केली जात नाही. बाजारपेठेतील रस्ते अगोदरच रुंद आहेत. या रस्त्यांवर वाहने बेशिस्तपणे उभी केलेली आढळून येतात. या सर्व बाबींचा ताण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर पडताना दिसतो. वाहनतळाविना होत असलेल्या बांधकामांना परवानगी मिळतेच कशी? असा प्रश्न शहरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.खासगी वाहनांचीही अवैध पार्किंगबाजारपेठेतील रस्ते अगोदरच अरुंद आहेत. यातच अनेक व्यावसायिक आपली चारचाकी वाहने रस्त्यावरच उभी करतात. यामुळेदेखील वाहतूक व्यवस्था कोलमडण्यास हातभार लागत आहे. याविषयी काही दिवसांपूर्वी तक्रारही करण्यात आली होती. मात्र, वाहतूक पोलिसांनी धनदांडग्यांवर कारवाईचे धाडस दाखविले नाही.

टॅग्स :Parkingपार्किंग