शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

उदंड जाहल्या इमारती, वाहनतळ मात्र नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 22:44 IST

शहरातील प्रमुख मार्गाच्या दुतर्फा मागील काही वर्षांत गगनचुंबी इमारती उभारल्या गेल्यात. मात्र, बहुतांश इमारतींमध्ये वाहनतळाची व्यवस्थाच नाही. परिणामी, सार्वजनिक व्यवस्थेवर ताण पडत आहे. यात कारवाई करताना वाहतूक पोलिसांची हतबलताही दिसून येत आहे.

ठळक मुद्देशहरातील चित्र : सार्वजनिक व्यवस्थेवर पडतोय ताण, पालिकेची नियोजनशून्यता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील प्रमुख मार्गाच्या दुतर्फा मागील काही वर्षांत गगनचुंबी इमारती उभारल्या गेल्यात. मात्र, बहुतांश इमारतींमध्ये वाहनतळाची व्यवस्थाच नाही. परिणामी, सार्वजनिक व्यवस्थेवर ताण पडत आहे. यात कारवाई करताना वाहतूक पोलिसांची हतबलताही दिसून येत आहे. याला पालिकेची नियोजनशून्यता कारणीभूत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.मागील काही वर्षांत शहराचा झपाट्याने विकास झाला. एकंदरीत विस्ताराने शहर बेढब झाले. शहरातील प्रमुख मार्गालगत अनेकांनी अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले. मात्र, वाहनतळाची कुठेही व्यवस्था करण्यात आली नाही. यामुळे बाजारपेठेत येणारे नागरिक वाट्टेल तेथे वाहने उभी करताना दिसून येतात. वाहनतळच नसल्याने वाहनधारक तरी काय करणार, चक्क अर्ध्या रस्त्यापर्यंत वाहने उभी केलेली आढळून येतात. यात अनेक वाहनचालकांना वाहतूक पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागते. यात कधीकाळी पोलिसांनाच त्यांचा रोष ओढवून घ्यावा लागतो. भरीस भर बाजारपेठेतील अनेक व्यावसायिक आपल्या दुकानातील साहित्य अर्ध्या ररस्त्यापर्यंत थाटतात. यामुळेदेखील वाहतुकीची दररोज कोंडी होताना दिसते. वर्ष, दोन वर्षांपूर्वी वाहतूक पोलिसांनी व्यावसायिकांवर न्यायालयीन दंडात्मक कारवाई केली होती. यानंतर रस्त्यावर साहित्य थाटण्याचा प्रकार थांबला होता. आता परत हा प्रकार सुरू झाला आहे. वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांवर कारवाई करण्यापूर्वी व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांतून होत आहे. पालिकेने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.बांधकामांना परवानगी कशी?कुठलेही बांधकाम करण्यापूर्वी नगरपालिकेतील नगररचना विभागात संबंधित बांधकामाच्या नकाशासह इतर कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. यानंतरच बांधकामाला रीतसर परवानगी मिळते. अनेकजण नकाशात वाहनतळाची सुविधा दाखवितात. प्रत्यक्षात बांधकामावेळी मात्र वाहनतळाचा समावेश नसतो. याची पालिकेतील नगररचना विभागातील अधिकाऱ्यांकडूनही खातरजमा केली जात नाही. बाजारपेठेतील रस्ते अगोदरच रुंद आहेत. या रस्त्यांवर वाहने बेशिस्तपणे उभी केलेली आढळून येतात. या सर्व बाबींचा ताण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर पडताना दिसतो. वाहनतळाविना होत असलेल्या बांधकामांना परवानगी मिळतेच कशी? असा प्रश्न शहरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.खासगी वाहनांचीही अवैध पार्किंगबाजारपेठेतील रस्ते अगोदरच अरुंद आहेत. यातच अनेक व्यावसायिक आपली चारचाकी वाहने रस्त्यावरच उभी करतात. यामुळेदेखील वाहतूक व्यवस्था कोलमडण्यास हातभार लागत आहे. याविषयी काही दिवसांपूर्वी तक्रारही करण्यात आली होती. मात्र, वाहतूक पोलिसांनी धनदांडग्यांवर कारवाईचे धाडस दाखविले नाही.

टॅग्स :Parkingपार्किंग