शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

उदंड जाहल्या इमारती, वाहनतळ मात्र नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 22:44 IST

शहरातील प्रमुख मार्गाच्या दुतर्फा मागील काही वर्षांत गगनचुंबी इमारती उभारल्या गेल्यात. मात्र, बहुतांश इमारतींमध्ये वाहनतळाची व्यवस्थाच नाही. परिणामी, सार्वजनिक व्यवस्थेवर ताण पडत आहे. यात कारवाई करताना वाहतूक पोलिसांची हतबलताही दिसून येत आहे.

ठळक मुद्देशहरातील चित्र : सार्वजनिक व्यवस्थेवर पडतोय ताण, पालिकेची नियोजनशून्यता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील प्रमुख मार्गाच्या दुतर्फा मागील काही वर्षांत गगनचुंबी इमारती उभारल्या गेल्यात. मात्र, बहुतांश इमारतींमध्ये वाहनतळाची व्यवस्थाच नाही. परिणामी, सार्वजनिक व्यवस्थेवर ताण पडत आहे. यात कारवाई करताना वाहतूक पोलिसांची हतबलताही दिसून येत आहे. याला पालिकेची नियोजनशून्यता कारणीभूत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.मागील काही वर्षांत शहराचा झपाट्याने विकास झाला. एकंदरीत विस्ताराने शहर बेढब झाले. शहरातील प्रमुख मार्गालगत अनेकांनी अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले. मात्र, वाहनतळाची कुठेही व्यवस्था करण्यात आली नाही. यामुळे बाजारपेठेत येणारे नागरिक वाट्टेल तेथे वाहने उभी करताना दिसून येतात. वाहनतळच नसल्याने वाहनधारक तरी काय करणार, चक्क अर्ध्या रस्त्यापर्यंत वाहने उभी केलेली आढळून येतात. यात अनेक वाहनचालकांना वाहतूक पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागते. यात कधीकाळी पोलिसांनाच त्यांचा रोष ओढवून घ्यावा लागतो. भरीस भर बाजारपेठेतील अनेक व्यावसायिक आपल्या दुकानातील साहित्य अर्ध्या ररस्त्यापर्यंत थाटतात. यामुळेदेखील वाहतुकीची दररोज कोंडी होताना दिसते. वर्ष, दोन वर्षांपूर्वी वाहतूक पोलिसांनी व्यावसायिकांवर न्यायालयीन दंडात्मक कारवाई केली होती. यानंतर रस्त्यावर साहित्य थाटण्याचा प्रकार थांबला होता. आता परत हा प्रकार सुरू झाला आहे. वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांवर कारवाई करण्यापूर्वी व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांतून होत आहे. पालिकेने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.बांधकामांना परवानगी कशी?कुठलेही बांधकाम करण्यापूर्वी नगरपालिकेतील नगररचना विभागात संबंधित बांधकामाच्या नकाशासह इतर कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. यानंतरच बांधकामाला रीतसर परवानगी मिळते. अनेकजण नकाशात वाहनतळाची सुविधा दाखवितात. प्रत्यक्षात बांधकामावेळी मात्र वाहनतळाचा समावेश नसतो. याची पालिकेतील नगररचना विभागातील अधिकाऱ्यांकडूनही खातरजमा केली जात नाही. बाजारपेठेतील रस्ते अगोदरच रुंद आहेत. या रस्त्यांवर वाहने बेशिस्तपणे उभी केलेली आढळून येतात. या सर्व बाबींचा ताण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर पडताना दिसतो. वाहनतळाविना होत असलेल्या बांधकामांना परवानगी मिळतेच कशी? असा प्रश्न शहरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.खासगी वाहनांचीही अवैध पार्किंगबाजारपेठेतील रस्ते अगोदरच अरुंद आहेत. यातच अनेक व्यावसायिक आपली चारचाकी वाहने रस्त्यावरच उभी करतात. यामुळेदेखील वाहतूक व्यवस्था कोलमडण्यास हातभार लागत आहे. याविषयी काही दिवसांपूर्वी तक्रारही करण्यात आली होती. मात्र, वाहतूक पोलिसांनी धनदांडग्यांवर कारवाईचे धाडस दाखविले नाही.

टॅग्स :Parkingपार्किंग