शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

कर्जमाफीची फुंकर नको वीज, पाणी द्या-वाघोडावासी

By admin | Updated: July 21, 2015 02:50 IST

कर्जमाफीसाठी गाव विकायला काढल्यामुळे एका रात्रीतून शासन-प्रशासनासह राज्यभरातील जनतेचे लक्ष वेधलेल्या

वर्धा : कर्जमाफीसाठी गाव विकायला काढल्यामुळे एका रात्रीतून शासन-प्रशासनासह राज्यभरातील जनतेचे लक्ष वेधलेल्या वाघोडावासीयांनी खा. रामदास तडस यांच्याशी सोमवारी झालेल्या सुसंवादानंतर आपली भूमिका मवाळ केली आहे. कर्जमाफीची फुंकर घालण्यापेक्षा वीज आणि पाणी देऊन कायमस्वरुपी तोडगा काढा, असा सूर यावेळी आवळला. खा. तडस यांनीही लगतच्या खैरी कार प्रकल्पाचे पाणी आणि आठ दिवसांत वीज पुरवठ्यासाठी आवश्यक कामे पूर्णत्वास नेण्याचा शब्द दिला.वाघोडा येथे खा. रामदास तडस यांनी भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा केली. तब्बल तीन तास ही चर्चा चालली. खा. तडस यांनी गावकऱ्यांना मोकळ्या मनाने आपल्या भूमिका मांडण्याचा सल्ला देतानाच कर्जमुक्ती पाहिजे वा कायम स्वरुपी तोडगा निघाला पाहिजे, असा सवाल केला. तेव्हा गावकऱ्यांनी तात्पूरती कर्जमाफी देऊन जखमेवर फुंकर घालण्यापेक्षा लगतच्या खैरी कार प्रकल्पाचे पाणी शेतीला मिळावे, तसेच शेतीतील कृषी पंपासाठी वीज पुरवठा करण्याची मागणी केली. या गोष्टींची पूर्तता झाल्यास गावातील शेतकऱ्यांच्या समस्या सुटतील, असा सूर गावकऱ्यांनी यावेळी काढला. तसेच शेतात टॉवर उभारले जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांना केवळ ५० हजार रुपये देऊन बोळवण केली जात आहे. तेव्हा योग्य तो मोबदला मिळवून दिल्यास शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याचे समाधान होईल. तसेच वन्य जिवांचा त्रास थांबविण्यासाठी तारेचे कुंपण द्यावे, याकडेही गावकऱ्यांनी लक्ष वेधले. यावेळी खा. तडस गावकऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले, येथील शेतीला खैरी कार प्रकल्पाच्या पाण्याचा प्रश्न अल्पकाळात मार्गी लावणार असल्याचे सांगतानाच संबंधित अधिकाऱ्यांना आठ दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे सांत्वन४जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू आहे. दोन दिवसात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. खा. रामदास तडस हे वाघोडा येथे जाण्यापूर्वी त्यांना शेतकरी आत्महत्येची वार्ता कळताच त्यांनी रुपचंद डोंहरे या शेतकऱ्याच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. आजनगाव येथे जलयुक्त शिवार अभियानाची पाहणी४तत्पूर्वी खा. रामदास तडस यांनी आंजनगाव येथील जलयुक्त शिवार अभियानातील कामांचीही पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासोबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, उपविभागीय कृषी अधिकारी अरुण मलसाने, तालुका कृषी अधिकारी महंत तसेच स्थानिक अधिकारी व गावकरी उपस्थित होते.