शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

आठ महिन्यांत पोलिओ संशयित नऊ प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 06:00 IST

भारताला २०११ मध्ये पोलिओमुक्त घोषित करण्यात आले. असे असले तरी २०१३ मध्ये बीड जिल्ह्यात पोलिओचा एक रुग्ण आढळला. त्यानंतर पुन्हा एकदा आरोग्य विभागाने नव्या जोमाने प्रयत्न करून पोलिओला हद्दपार केले.

ठळक मुद्देनमुने ‘निगेटिव्ह’: राबविली जातेय विशेष लसीकरण मोहीम

महेश सायखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पोलिओमुक्त देश म्हणून भारताला जाहीर करण्यात आले असले तरी पोलिओ या आजाराची लागण कुणाला होऊ नये यासाठी आरोग्य विभागाकडून दक्षता घेतली जात आहे. शिवाय विशेष लसीकरण मोहीम राबविली जाते. मागील आठ महिन्यांच्या कालावधीत पोलिओ संशयित नऊ केसेस जिल्ह्यात आढळले. या नऊ रुग्णांचे शौच नमुने गोळा करून ते तपासणीसाठी पाठविण्यात आले. हे सर्व नमुने ‘निगेटिव्ह’ असल्याचे पुढे आले आहे.भारताला २०११ मध्ये पोलिओमुक्त घोषित करण्यात आले. असे असले तरी २०१३ मध्ये बीड जिल्ह्यात पोलिओचा एक रुग्ण आढळला. त्यानंतर पुन्हा एकदा आरोग्य विभागाने नव्या जोमाने प्रयत्न करून पोलिओला हद्दपार केले. १५ वर्षाखालील बालकांना अर्धांगवायूचा झटका आल्याव व प्रकृती खालवल्यास त्याच्या शौचाचे नमुने घेत ते तपासणीसाठी पाठविले जातात. जानेवारी २०१९ ते आतापर्यंत वर्धा जिल्ह्यातून एकूण नऊ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. ही नमुने तपासणीत ‘निगेटिव्ह’ असल्याचे पुढे आले असल्याचे सांगण्यात आले.खासगी रुग्णालयांना माहिती देणे बंधनकारकपोलिओ संशयित रुग्ण एखाद्या खासगी रुग्णालयात दाखल झाल्यावर शासकीय यंत्रणेला त्याची माहिती वेळीच व तातडीने मिळत नव्हती. ही बाब पुढे आल्यावर आरोग्य यंत्रणेकडून खासगी रुग्णालयांनी ही माहिती देण्याच्या अनुषंगाने बंधनकारक करण्यात आले आहे.वर्षातून दोनवेळा राबविली जाते मोहीमपाकिस्तान, अफगानिस्तान व बांगलादेश येथे आजही मोठ्या प्रमाणात पोलिओचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे त्याचा प्रसार भारतात होऊ नये म्हणून वर्षातून किमान दोन वेळा देशात लसीकरण मोहीम राबविण्यात येते. विषेश म्हणजे २०१३ नंतर भारतात पोलिओचा एकही रुग्ण आढळलेला नाही.० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना देतात पोलिओची प्रतिबंधक लसपोलिओमुक्त भारत हा उद्देश कें्रदस्थानी ठेऊन वर्धा जिल्ह्यासह संपूर्ण भारतात राष्ट्रीय स्तरावर जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाते. या मोहिमेंतर्गत ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओची प्रतिबंधक लस तोंडावाटे दिली जाते. प्रत्येक बालकाला पोलिओची लस द्याच, असे आवाहन चित्रपट जगतातील महानायक अभिताभ बच्चन हे करतात.आठवडाभराचा लागतो वेळ१४ दिवसात संशयिताचा शौच नमुना घेऊन तो तपासणीकरिता मुंबई येथे पाठविला जातो. अहवाल ‘पॉझिटिव्ह’ असल्यास त्या जिल्ह्याच्या आरोग्य विभागाला तातडीने माहिती दिली जाते. तर इतर वेळी अहवाल मिळण्यास किमान आठवड्याभराचा कालावधी लागत असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.भारत देश २०११ मध्ये पोलिओमुक्त घोषित करण्यात आला आहे. २०१८ मध्ये पाकिस्तान मध्ये १२ तर अफगानिस्तान मध्ये २१ पोलिओच्या केसेस पुढे आल्या. तसेच २०१९ मध्ये पाकिस्तानात ५३ तर अफगानिस्तानात १३ केसेस आढळल्या आहेत. कुठल्याही परिस्थितीत पोलिओचा प्रसार होऊ नये यासाठी वरिष्ठांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन लसीकरण मोहीम यशस्वी करण्यात आली. शिवाय पुढेही यशस्वी करण्यात येईल. पाठविण्यात आलेले नऊ नमुने निगेटिव्ह आले आहेत.- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

टॅग्स :Healthआरोग्य