शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षारोपणातून निसर्गासह माणुसकीला फुटणार नवी पालवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 21:22 IST

सिमेंटीकरणाच्या काळात विकासाच्या नावावर मोठ्या प्रमाणात निसर्ग भकास केल्या जात आहे. परिणामी निसर्गचक्रही बदलल्याने त्याचे परिणाम सजिव सृष्टीला भोगावे लागत आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळी हे ऋृतुनेही कालमान बदलले आहे. त्यासाठी आता निसर्गाला वाचविण्यासाठी आणि माणुसकीला नवी पालवी फोडण्यासाठी सर्वांनी अधिकाअधिक वृक्षाची लागवड करणे गरजेचे आहे. तेव्हा कुठे पुढच्या पिढीला सुंदरतेने नटलेली सृष्टी बघता येईल.

ठळक मुद्देआजपासून वनमहोत्सव : १ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत ३३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सिमेंटीकरणाच्या काळात विकासाच्या नावावर मोठ्या प्रमाणात निसर्ग भकास केल्या जात आहे. परिणामी निसर्गचक्रही बदलल्याने त्याचे परिणाम सजिव सृष्टीला भोगावे लागत आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळी हे ऋृतुनेही कालमान बदलले आहे. त्यासाठी आता निसर्गाला वाचविण्यासाठी आणि माणुसकीला नवी पालवी फोडण्यासाठी सर्वांनी अधिकाअधिक वृक्षाची लागवड करणे गरजेचे आहे. तेव्हा कुठे पुढच्या पिढीला सुंदरतेने नटलेली सृष्टी बघता येईल.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शासनाने १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत ३३ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याची सुरुवात सेलू तालुक्यातील जंगलापूर येथून होत आहे. झाड या ग्रहावरील सर्वात जूना जीव म्हणून ते आपल्याला आॅक्सिजन देतात, कार्बन संग्रह करतात. माती स्थिर करतात आणि जगातल्या सर्व जीवांना जीवन देतात. ते आपल्याला सर्व साधने आणि निवारासाठी सामग्री देखील प्रदान करतात. जीवनासाठी फक्त झाडे नाहीत, तर पृथ्वीवरील सर्वात दीर्घ जीवित प्रजाती म्हणून ते आपल्याला भूतकाळातील, वर्तमान आणि भविष्यामधील दुवा ठरते. वृक्ष भौतिक शोषक म्हणून कार्य करतात. धूळ पकडतात आणि हवेतून प्रदूषण शोषून घेतात. सौर किरणांपासून छाया प्रदान करतात आणि ध्वनी कमी करतात. झाडे आणि हिरव्या स्थानापासून दूर राहिल्याच्या काही मिनिटांमध्ये रक्तदाब कमी होतो. आपल्या हृदयाची गती कमी होते आणि आपला ताण कमी होते, असे संशोधनाने सिद्ध केल्याने वृक्ष हे आरोग्यदायी सुद्धा आहे. तसेच झाडे अनेक सुक्ष्म जीवांचा अधिवास म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. त्यामुळे वृक्षाचे रोपटे लावून चालणार नाही तर त्याच्या संगोपणाची जबाबदारीही प्रत्येकाला स्वीकारावी लागणार आहे.वृक्ष : अनेक मुल्यांचा आधारपर्यावरणीय मूल्य : आॅक्सिजन देऊन हवेची गुणवत्ता सुधारतात. जमिनीचे संरक्षण करतात. प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेदरम्यान झाडे कार्बन डायआॅक्साईड घेतात आणि आॅक्सिजन सोडतात. कृषी विभागानुसार, १ एकर जंगलात ६ टन कार्बन डायआॅक्साईड शोषून घेते आणि ४ टन आॅक्सिजन बाहेर टाकते जे १८ लोकांची आॅक्सिजनची वार्षिक गरज पूर्ण करण्यासाठी पुरेसे आहे.सामाजिक मूल्य : झाडे प्रत्येक समुदायाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. झाडे शहरी वस्त्यांमध्ये नैसर्गिक घटक आणि वन्यजीव वस्तीत आणून आपल्या आयुष्यातील गुणवत्ता वाढवतात. सूर्यावरील प्रकाश टाळण्यासाठी शहरांमध्ये वृक्षांची लागवड केल्यास ताप व व्यावसायिक इमारतीमुळे निर्माण होणाऱ्या उष्णता लहरींचा प्रभाव कमी होतो.वैयक्तिक व आध्यात्मिक मूल्य : झाड हे मनमोहक, सुंदर व भव्य आहेत. वेगवेगळ्या प्रजाती, आकार, स्वरूप, सुगंध, पोत आणि तेजस्वी रंगांची असंख्य निरंतर विविधता प्रदर्शित करतात. ऋतुबदलाप्रमाणे प्रत्येक झाड वेगळे दिसतात.व्यावहारिक व व्यावसायिक मूल्य : वृक्षांनी आपल्याला स्वत:चे आयुष्य समर्थित केलेले असते. स्वयंपाकासाठी सरपणाचाच वापर होतो. बांधकाम, क्रीडा उपकरण व अनेक घरगुती वस्तू तयार करण्यासाठी लाकडाचा वापर होतो. तसेच सर्व झाडे ही रसायने आणि औषधे याचा स्रोत आहेत.