शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
3
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
4
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
5
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
6
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
7
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
8
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
9
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
10
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
11
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
12
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
13
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
14
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
15
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
16
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
17
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
18
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
19
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर

उभ्या पिकांवर निसर्गाची वक्रदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 23:49 IST

कधी नव्हे अशा भीषण जलसंकटाला यंदाच्या उन्हाळ्यात नागरिकांना सामोरे जावे लागले. पाणी समस्येच्या झळा नागरिक सोसत असतानाच हवामान खात्याने सुरुवातीला दमदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली. त्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.

ठळक मुद्देबळीराजाच्या नजरा आकाशाकडेपाण्याअभावी करपतेय अंकुरलेले पीक

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कधी नव्हे अशा भीषण जलसंकटाला यंदाच्या उन्हाळ्यात नागरिकांना सामोरे जावे लागले. पाणी समस्येच्या झळा नागरिक सोसत असतानाच हवामान खात्याने सुरुवातीला दमदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली. त्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. पण जून महिन्याच्या अखेरच्या दोन दिवसात प्रत्यक्षात वरुणराजा वर्धा जिल्ह्यात बरसला. जूनच्या अखेरच्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतजमीनही बºयापैकी भिजल्याने शेतकऱ्यांनी विविध पिकांची लागवड केली. शिवाय अंकुरून पिकाची वाढही बºयापैकी झाली. परंतु, सध्या पाऊसच बेपत्ता झाल्याने सुमारे १५ दिवसांची ही रोपटी करपत आहेत.यंदाच्या खरीप हंगामात वर्धा जिल्ह्यातील ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टर जमिनीवर विविध पिकांची लागवड होईल, असा अंदाज होता. परंतु, पाऊस लांबल्याने जुलैच्या दुसºया आठवड्यापर्यंत ३ लाख ३ हजार ७७६.७ हेक्टर शेतजमिनीवर विविध पिकांची लागवड झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. आतापर्यंत केवळ ७०.८७ टक्केच पेरणी झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, पावसाने दडी मारल्याने ३ लाख ३ हजार ७७६.७ हेक्टर शेतजमिनीवर अंकुरलेले हे पीक करपण्याच्या मार्गावर आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे असे शेतकरी अंकुरलेले पीक वाचविण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत. दमदार पावसाअभावी शेतातील विहिरींच्या पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ न झाल्याने सिंचनाची सोय असलेल्या शेतकºयांनाही उभे पीक जगविण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तर कोरडवाहू शेतकºयांची स्थिती अत्यंत हलाखीची आहे. पाऊस आला म्हणून पेरणी केली. पुढेही पावसाचा जोर कायम राहील अशी अपेक्षा होती. परंतु, पाऊसच बेपत्ता झाल्याने उगवलेले पीकही हातचे जाईल, असे सिंचनाची सोय नसलेले शेतकरी सांगतात. सध्या जिल्ह्यात ढगाळी वातावरण आहे;पण पाहिजे तसा पाऊस बरसत नसल्याने शेतकºयांसह नागरिकांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. येत्या काही दिवसात जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्यास संपूर्ण पीकच करपण्याची आणि खरीपात शेतजमिनी पडिक ठेवण्याची परिस्थिती शेतकºयांवर ओढावणार असल्याची शक्यता काही कृषी तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.ढगाळी वातावरण राहिल्यास रोपट्यांचे आयुष्य आठ दिवसांचेपाऊस बेपत्ता झाला असला तरी सध्या वर्धा जिल्ह्यात ढगाळी वातावरण कायम आहे. असेच वातावरण आणखी काही दिवस कायम राहिल्यास अंकुरलेले पीक जास्तीत जास्त आठ दिवस दमधरून राहिल. तर ऊन तापल्यास हे रोपटे अवघ्या तीन दिवसातच करपेल, असे कृषी तज्ज्ञांसह वयोवृद्ध शेतकºयांकडून सांगण्यात येते.ठिबक सिंचन पद्धत ठरेल फायद्याचीदमदार पाऊस अद्याप वर्धा जिल्ह्यात झाला नसल्याने भूगर्भातील पाणी पातळीतही पाहिजे त्या प्रमाणात वाढ झालेली नाही. ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे अशा शेतकºयांनी उपलब्ध कमी पाण्यात पीक जगविण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केल्यास ते फायद्याचे ठरेल, असे सांगण्यात येते.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस