शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

उभ्या पिकांवर निसर्गाची वक्रदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 23:49 IST

कधी नव्हे अशा भीषण जलसंकटाला यंदाच्या उन्हाळ्यात नागरिकांना सामोरे जावे लागले. पाणी समस्येच्या झळा नागरिक सोसत असतानाच हवामान खात्याने सुरुवातीला दमदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली. त्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.

ठळक मुद्देबळीराजाच्या नजरा आकाशाकडेपाण्याअभावी करपतेय अंकुरलेले पीक

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कधी नव्हे अशा भीषण जलसंकटाला यंदाच्या उन्हाळ्यात नागरिकांना सामोरे जावे लागले. पाणी समस्येच्या झळा नागरिक सोसत असतानाच हवामान खात्याने सुरुवातीला दमदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली. त्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. पण जून महिन्याच्या अखेरच्या दोन दिवसात प्रत्यक्षात वरुणराजा वर्धा जिल्ह्यात बरसला. जूनच्या अखेरच्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतजमीनही बºयापैकी भिजल्याने शेतकऱ्यांनी विविध पिकांची लागवड केली. शिवाय अंकुरून पिकाची वाढही बºयापैकी झाली. परंतु, सध्या पाऊसच बेपत्ता झाल्याने सुमारे १५ दिवसांची ही रोपटी करपत आहेत.यंदाच्या खरीप हंगामात वर्धा जिल्ह्यातील ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टर जमिनीवर विविध पिकांची लागवड होईल, असा अंदाज होता. परंतु, पाऊस लांबल्याने जुलैच्या दुसºया आठवड्यापर्यंत ३ लाख ३ हजार ७७६.७ हेक्टर शेतजमिनीवर विविध पिकांची लागवड झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. आतापर्यंत केवळ ७०.८७ टक्केच पेरणी झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, पावसाने दडी मारल्याने ३ लाख ३ हजार ७७६.७ हेक्टर शेतजमिनीवर अंकुरलेले हे पीक करपण्याच्या मार्गावर आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे असे शेतकरी अंकुरलेले पीक वाचविण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत. दमदार पावसाअभावी शेतातील विहिरींच्या पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ न झाल्याने सिंचनाची सोय असलेल्या शेतकºयांनाही उभे पीक जगविण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तर कोरडवाहू शेतकºयांची स्थिती अत्यंत हलाखीची आहे. पाऊस आला म्हणून पेरणी केली. पुढेही पावसाचा जोर कायम राहील अशी अपेक्षा होती. परंतु, पाऊसच बेपत्ता झाल्याने उगवलेले पीकही हातचे जाईल, असे सिंचनाची सोय नसलेले शेतकरी सांगतात. सध्या जिल्ह्यात ढगाळी वातावरण आहे;पण पाहिजे तसा पाऊस बरसत नसल्याने शेतकºयांसह नागरिकांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. येत्या काही दिवसात जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्यास संपूर्ण पीकच करपण्याची आणि खरीपात शेतजमिनी पडिक ठेवण्याची परिस्थिती शेतकºयांवर ओढावणार असल्याची शक्यता काही कृषी तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.ढगाळी वातावरण राहिल्यास रोपट्यांचे आयुष्य आठ दिवसांचेपाऊस बेपत्ता झाला असला तरी सध्या वर्धा जिल्ह्यात ढगाळी वातावरण कायम आहे. असेच वातावरण आणखी काही दिवस कायम राहिल्यास अंकुरलेले पीक जास्तीत जास्त आठ दिवस दमधरून राहिल. तर ऊन तापल्यास हे रोपटे अवघ्या तीन दिवसातच करपेल, असे कृषी तज्ज्ञांसह वयोवृद्ध शेतकºयांकडून सांगण्यात येते.ठिबक सिंचन पद्धत ठरेल फायद्याचीदमदार पाऊस अद्याप वर्धा जिल्ह्यात झाला नसल्याने भूगर्भातील पाणी पातळीतही पाहिजे त्या प्रमाणात वाढ झालेली नाही. ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे अशा शेतकºयांनी उपलब्ध कमी पाण्यात पीक जगविण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केल्यास ते फायद्याचे ठरेल, असे सांगण्यात येते.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस