शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

उभ्या पिकांवर निसर्गाची वक्रदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 23:49 IST

कधी नव्हे अशा भीषण जलसंकटाला यंदाच्या उन्हाळ्यात नागरिकांना सामोरे जावे लागले. पाणी समस्येच्या झळा नागरिक सोसत असतानाच हवामान खात्याने सुरुवातीला दमदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली. त्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.

ठळक मुद्देबळीराजाच्या नजरा आकाशाकडेपाण्याअभावी करपतेय अंकुरलेले पीक

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कधी नव्हे अशा भीषण जलसंकटाला यंदाच्या उन्हाळ्यात नागरिकांना सामोरे जावे लागले. पाणी समस्येच्या झळा नागरिक सोसत असतानाच हवामान खात्याने सुरुवातीला दमदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली. त्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. पण जून महिन्याच्या अखेरच्या दोन दिवसात प्रत्यक्षात वरुणराजा वर्धा जिल्ह्यात बरसला. जूनच्या अखेरच्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतजमीनही बºयापैकी भिजल्याने शेतकऱ्यांनी विविध पिकांची लागवड केली. शिवाय अंकुरून पिकाची वाढही बºयापैकी झाली. परंतु, सध्या पाऊसच बेपत्ता झाल्याने सुमारे १५ दिवसांची ही रोपटी करपत आहेत.यंदाच्या खरीप हंगामात वर्धा जिल्ह्यातील ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टर जमिनीवर विविध पिकांची लागवड होईल, असा अंदाज होता. परंतु, पाऊस लांबल्याने जुलैच्या दुसºया आठवड्यापर्यंत ३ लाख ३ हजार ७७६.७ हेक्टर शेतजमिनीवर विविध पिकांची लागवड झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. आतापर्यंत केवळ ७०.८७ टक्केच पेरणी झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, पावसाने दडी मारल्याने ३ लाख ३ हजार ७७६.७ हेक्टर शेतजमिनीवर अंकुरलेले हे पीक करपण्याच्या मार्गावर आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे असे शेतकरी अंकुरलेले पीक वाचविण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत. दमदार पावसाअभावी शेतातील विहिरींच्या पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ न झाल्याने सिंचनाची सोय असलेल्या शेतकºयांनाही उभे पीक जगविण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तर कोरडवाहू शेतकºयांची स्थिती अत्यंत हलाखीची आहे. पाऊस आला म्हणून पेरणी केली. पुढेही पावसाचा जोर कायम राहील अशी अपेक्षा होती. परंतु, पाऊसच बेपत्ता झाल्याने उगवलेले पीकही हातचे जाईल, असे सिंचनाची सोय नसलेले शेतकरी सांगतात. सध्या जिल्ह्यात ढगाळी वातावरण आहे;पण पाहिजे तसा पाऊस बरसत नसल्याने शेतकºयांसह नागरिकांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. येत्या काही दिवसात जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्यास संपूर्ण पीकच करपण्याची आणि खरीपात शेतजमिनी पडिक ठेवण्याची परिस्थिती शेतकºयांवर ओढावणार असल्याची शक्यता काही कृषी तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.ढगाळी वातावरण राहिल्यास रोपट्यांचे आयुष्य आठ दिवसांचेपाऊस बेपत्ता झाला असला तरी सध्या वर्धा जिल्ह्यात ढगाळी वातावरण कायम आहे. असेच वातावरण आणखी काही दिवस कायम राहिल्यास अंकुरलेले पीक जास्तीत जास्त आठ दिवस दमधरून राहिल. तर ऊन तापल्यास हे रोपटे अवघ्या तीन दिवसातच करपेल, असे कृषी तज्ज्ञांसह वयोवृद्ध शेतकºयांकडून सांगण्यात येते.ठिबक सिंचन पद्धत ठरेल फायद्याचीदमदार पाऊस अद्याप वर्धा जिल्ह्यात झाला नसल्याने भूगर्भातील पाणी पातळीतही पाहिजे त्या प्रमाणात वाढ झालेली नाही. ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे अशा शेतकºयांनी उपलब्ध कमी पाण्यात पीक जगविण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केल्यास ते फायद्याचे ठरेल, असे सांगण्यात येते.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस