शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांनी केली ‘धाम’ची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 21:41 IST

खासदार रामदास तडस यांनी आर्वी व वर्धा विधानसभा क्षेत्राचा विशेष दौरा करून महाकाळी येथील धाम प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पात सध्या ६ दलघमी इतकाच उपयुक्त जलसाठा असून तो १५ जूनपर्यंत पुरेल असे त्यांच्या लक्षात आल्याने उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खासदार रामदास तडस यांनी आर्वी व वर्धा विधानसभा क्षेत्राचा विशेष दौरा करून महाकाळी येथील धाम प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पात सध्या ६ दलघमी इतकाच उपयुक्त जलसाठा असून तो १५ जूनपर्यंत पुरेल असे त्यांच्या लक्षात आल्याने उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. विशेष म्हणजे याच प्रकल्पातील सोडलेल्या पाण्याची उचल करून वर्धा शहर व वर्धा शहराशेजारील गावांमधील नागरिकांना पुरवठा केल्या जातो. शिवाय वर्धेकरांसाठी ‘धाम’ किती महत्त्वाचा आहे, याबाबचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर खासदारांनी धामची पाहणी केली.खा. तडस यांनी खरांगणा (मो.) परिसरातील धामनदीच्या पात्राची पाहणी केली असता पुलाच्या कामादरम्यान माती व मुरुम नदीपात्रामध्ये टाकल्या गेल्यामुळे नदीपात्रातील पाणी वर्धेच्या दिशेने जाण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. तसेच खरांगणा परिसरातील गावांमध्येही भीषण पाणी समस्या असल्याचे लक्षात आले. याकरिता उल्लेखनिय पुर्नजिवनाचे कार्य गरजेचे असल्याचे सांगितले. खा. तडस यांनी धाम प्रकल्पाचा मुख्य कालवा, पिपरी (मेघे) भागाची पाहणी केली. या कालव्याची परिस्थिती वाईट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर येळाकेळी येथील धाम नदीच्या पात्राची पाहणी करण्यात आली. नदी पात्राला झुडपांचा विळखा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शिवाय नदी पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने नदीपात्र अरुंद व उथळ झाल्याचे आढळले. तर नदी पात्रात सांडपाणी सोडल्या जात सोडल्या जात असल्याने नदी प्रदुषित होत असल्याचे दिसून आले. धाम मधून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची उचल वर्धा न.प., एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण, मध्य रेल्वे, आंजी ग्रा.पं. प्रशासन तसेच नदी तिरावर असलेली गावे करतात. यामुळे येथे उगम ते संगम पुर्नजिवन कार्य गरजेचे असल्याचे याप्रसंगी खा. तडस म्हणाले. त्यानंतर तळेगांव रघूजी या गावाला भेट देण्यात आली. तेथे कुठल्याही प्रकारच्या जलस्त्रोतातून पाणी उपलब्ध नाही असे लक्षात आले. तेव्हा ग्रा.पं.मध्ये ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून या गावाला टँकरने पाणी पुरवठा करण्याचे सांगण्यात आले. खरांगणा हेटी येथे दोन सिंमेट नाला बांधाची मागणी गावकºयांनी केली. त्यानंतर येळाकेळी धाम उन्नई प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. यावेळी वर्धेचे नगराध्यक्ष अतुल तराळे, न.प. उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, जलतज्ज्ञ माधव कोटस्थाने, राजू राठी, राजश्री राठी, नितीन अरबट, सरपंच रेखा वाघमारे, निलीमा अक्कलवार, नम्रता आंभोरे, तळेगाव रघुजीच्या सरपंच प्रभा कालोकार, उपसरपंच धनराज गहाट, वर्धा पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता रवींद्र डाफने आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस