शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
4
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
5
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
6
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
7
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
8
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
9
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
10
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
11
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
12
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
13
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
14
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
15
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
16
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
17
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
18
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
19
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
20
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

खासदारांनी केली ‘धाम’ची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 21:41 IST

खासदार रामदास तडस यांनी आर्वी व वर्धा विधानसभा क्षेत्राचा विशेष दौरा करून महाकाळी येथील धाम प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पात सध्या ६ दलघमी इतकाच उपयुक्त जलसाठा असून तो १५ जूनपर्यंत पुरेल असे त्यांच्या लक्षात आल्याने उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खासदार रामदास तडस यांनी आर्वी व वर्धा विधानसभा क्षेत्राचा विशेष दौरा करून महाकाळी येथील धाम प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पात सध्या ६ दलघमी इतकाच उपयुक्त जलसाठा असून तो १५ जूनपर्यंत पुरेल असे त्यांच्या लक्षात आल्याने उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. विशेष म्हणजे याच प्रकल्पातील सोडलेल्या पाण्याची उचल करून वर्धा शहर व वर्धा शहराशेजारील गावांमधील नागरिकांना पुरवठा केल्या जातो. शिवाय वर्धेकरांसाठी ‘धाम’ किती महत्त्वाचा आहे, याबाबचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर खासदारांनी धामची पाहणी केली.खा. तडस यांनी खरांगणा (मो.) परिसरातील धामनदीच्या पात्राची पाहणी केली असता पुलाच्या कामादरम्यान माती व मुरुम नदीपात्रामध्ये टाकल्या गेल्यामुळे नदीपात्रातील पाणी वर्धेच्या दिशेने जाण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. तसेच खरांगणा परिसरातील गावांमध्येही भीषण पाणी समस्या असल्याचे लक्षात आले. याकरिता उल्लेखनिय पुर्नजिवनाचे कार्य गरजेचे असल्याचे सांगितले. खा. तडस यांनी धाम प्रकल्पाचा मुख्य कालवा, पिपरी (मेघे) भागाची पाहणी केली. या कालव्याची परिस्थिती वाईट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर येळाकेळी येथील धाम नदीच्या पात्राची पाहणी करण्यात आली. नदी पात्राला झुडपांचा विळखा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शिवाय नदी पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने नदीपात्र अरुंद व उथळ झाल्याचे आढळले. तर नदी पात्रात सांडपाणी सोडल्या जात सोडल्या जात असल्याने नदी प्रदुषित होत असल्याचे दिसून आले. धाम मधून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची उचल वर्धा न.प., एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण, मध्य रेल्वे, आंजी ग्रा.पं. प्रशासन तसेच नदी तिरावर असलेली गावे करतात. यामुळे येथे उगम ते संगम पुर्नजिवन कार्य गरजेचे असल्याचे याप्रसंगी खा. तडस म्हणाले. त्यानंतर तळेगांव रघूजी या गावाला भेट देण्यात आली. तेथे कुठल्याही प्रकारच्या जलस्त्रोतातून पाणी उपलब्ध नाही असे लक्षात आले. तेव्हा ग्रा.पं.मध्ये ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून या गावाला टँकरने पाणी पुरवठा करण्याचे सांगण्यात आले. खरांगणा हेटी येथे दोन सिंमेट नाला बांधाची मागणी गावकºयांनी केली. त्यानंतर येळाकेळी धाम उन्नई प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. यावेळी वर्धेचे नगराध्यक्ष अतुल तराळे, न.प. उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, जलतज्ज्ञ माधव कोटस्थाने, राजू राठी, राजश्री राठी, नितीन अरबट, सरपंच रेखा वाघमारे, निलीमा अक्कलवार, नम्रता आंभोरे, तळेगाव रघुजीच्या सरपंच प्रभा कालोकार, उपसरपंच धनराज गहाट, वर्धा पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता रवींद्र डाफने आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस