शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर सुरूच

By admin | Updated: July 11, 2016 01:58 IST

खेडी ओसाड पडत असून शहराकडे नागरिकांचे लोंढे वाढत आहे. जिल्ह्यात १ हजार ३७६ गावांची संख्या असून खेड्यात राहणाऱ्या नागरिकांची संख्या ८ लाख ७५ हजार २८४ एवढी आहे.

जागतिक लोकसंख्या दिन : जिल्ह्याचा जन्मदर १३.४३ टक्केश्रेया केने वर्धा खेडी ओसाड पडत असून शहराकडे नागरिकांचे लोंढे वाढत आहे. जिल्ह्यात १ हजार ३७६ गावांची संख्या असून खेड्यात राहणाऱ्या नागरिकांची संख्या ८ लाख ७५ हजार २८४ एवढी आहे. २००१ मध्ये झालेल्या जनगणनेत जिल्ह्यातील ग्रामीण भागात ९ लाख ११ हजार ६९५ नागरिक वास्तव्यास होते. तर शहरातील आकडेवारी पाहता २००१ मध्ये ३ लाख २५ हजार ६९५ वरून ४ लाख २० हजार ८७३ एवढी वाढ झाल्याचे आकडे सांगत आहेत. गावांची संख्याही १ हजार ३८२ वरून १ हजार ३७६ झाली आहे.ग्रामीण भागात शेती शिवाय दुसरा व्यवसाय नसल्याने रोजगाराची समस्या भेडसावते. शिवाय नैसर्गिक आपत्तीमुळे शेती व्यवसाय तोट्यात असल्याने रोजगाराच्या शोधार्थ अनेकांनी शहर गाठले. शासनाकडून ग्रामीण रोजगार योजना राबविली जाते. योजनेचा लाभ मिळत नसल्याची ओरड होते. शिवाय मजुरीकरिता बेरोजगारांना कार्यालयात हेलपाटा माराव्या लागत असल्याच्या तक्रारी आहेत. तुलनेने शहरात रोजगार उपलब्ध होत असल्याने शहरांचा आकार दिवसेंदिवस वाढतानाच दिसून येतो. क्षेत्रफळासोबत लोकसंख्येतही वाढत होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १२ लाख ९६ हजार १५७ आहे. यात ६ लाख ६५ हजार ९२५ इतके पुरूष तर ६ लाख ३० हजार २३२ महिलांची संख्या आहे. लोकसंख्येची घनता २०५ आहे. २००१ मध्ये लोकसंख्येची घनता १९६ इतकी होती. २०११ मध्ये लोकसंख्या वाढीच दर १४.४७ टक्के होता. २०१५ मध्ये हा दर १३.४३ टक्क्यांवर आला. असे असले तरी २००१ मध्ये केलेल्या जनगणनेतील आकडेवारी पाहता २०११ मध्ये जिल्ह्यातील लोकसंख्या वाढली आहे. शहरात राहणाऱ्या नागरिकांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसते.गावांची संख्या घटली२००१ पर्यंत जिल्ह्यातील गावांची संख्या १,३८२ होती. ती २०११ मध्ये १,३७६ पर्यंत आली आहे. जिल्ह्यात सहा नगरपालिका असून चार नगरपंचायत आहेत. या प्रत्येक शहरातील लोकसंख्येत गत १० वर्षात वाढ झाल्याचे दिसते.