शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' माशांना वाचवण्यासाठी बांगलादेशनं उतरवलं सैन्य दल; बंगालच्या खाडीत पाठवल्या १७ युद्धनौका
2
‘कोस्टल’वर थेट १४० चा हायस्पीड: ...तर मग गुन्हाच होईल दाखल; वाहतूक पोलिसांकडून दिवसाला ५०० ई-चालानची कारवाई
3
FD करुन तुम्ही कधीही श्रीमंत होणार नाही? CA ने दिला इशारा, म्हणाले खऱ्या कमाईसाठी गुंतवणूक धोरण बदला
4
Video - अरे बापरे! ऑर्डर केला iPhone 16; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत अजब भानगड
5
Tata Capital IPO: प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर
6
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
7
"प्यार मे सौदेबाजी...", अरबाज खान दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर मलायका अरोराची क्रिप्टिक पोस्ट
8
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
9
Kantara Chapter 1: साऊथने पुन्हा एकदा करून दाखवलं! फक्त ४ दिवसांत 'कांतारा'ने कमावले ३०० कोटी
10
पतीच्या मृत्यूनंतर पुन्हा जोडीदाराची इच्छा पडली महागात; मॅट्रिमोनियल साइटवरून शिक्षिकेला कोट्यवधींचा गंडा!
11
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
12
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
13
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
14
Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा
15
Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत
16
पती अन् दोन मुलांना सोडून शेजाऱ्यासोबत सुरू होतं अफेअर; 'ओयो'मध्ये प्रियकर गर्लफ्रेंडसोबत दिसला अन्...
17
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
18
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
19
उत्खनन क्षेत्रात छत्तीसगडची ऐतिहासिक झेप; खनिज महसूल २५ वर्षांत ३४ पटीने वाढला!
20
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा

ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर सुरूच

By admin | Updated: July 11, 2016 01:58 IST

खेडी ओसाड पडत असून शहराकडे नागरिकांचे लोंढे वाढत आहे. जिल्ह्यात १ हजार ३७६ गावांची संख्या असून खेड्यात राहणाऱ्या नागरिकांची संख्या ८ लाख ७५ हजार २८४ एवढी आहे.

जागतिक लोकसंख्या दिन : जिल्ह्याचा जन्मदर १३.४३ टक्केश्रेया केने वर्धा खेडी ओसाड पडत असून शहराकडे नागरिकांचे लोंढे वाढत आहे. जिल्ह्यात १ हजार ३७६ गावांची संख्या असून खेड्यात राहणाऱ्या नागरिकांची संख्या ८ लाख ७५ हजार २८४ एवढी आहे. २००१ मध्ये झालेल्या जनगणनेत जिल्ह्यातील ग्रामीण भागात ९ लाख ११ हजार ६९५ नागरिक वास्तव्यास होते. तर शहरातील आकडेवारी पाहता २००१ मध्ये ३ लाख २५ हजार ६९५ वरून ४ लाख २० हजार ८७३ एवढी वाढ झाल्याचे आकडे सांगत आहेत. गावांची संख्याही १ हजार ३८२ वरून १ हजार ३७६ झाली आहे.ग्रामीण भागात शेती शिवाय दुसरा व्यवसाय नसल्याने रोजगाराची समस्या भेडसावते. शिवाय नैसर्गिक आपत्तीमुळे शेती व्यवसाय तोट्यात असल्याने रोजगाराच्या शोधार्थ अनेकांनी शहर गाठले. शासनाकडून ग्रामीण रोजगार योजना राबविली जाते. योजनेचा लाभ मिळत नसल्याची ओरड होते. शिवाय मजुरीकरिता बेरोजगारांना कार्यालयात हेलपाटा माराव्या लागत असल्याच्या तक्रारी आहेत. तुलनेने शहरात रोजगार उपलब्ध होत असल्याने शहरांचा आकार दिवसेंदिवस वाढतानाच दिसून येतो. क्षेत्रफळासोबत लोकसंख्येतही वाढत होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १२ लाख ९६ हजार १५७ आहे. यात ६ लाख ६५ हजार ९२५ इतके पुरूष तर ६ लाख ३० हजार २३२ महिलांची संख्या आहे. लोकसंख्येची घनता २०५ आहे. २००१ मध्ये लोकसंख्येची घनता १९६ इतकी होती. २०११ मध्ये लोकसंख्या वाढीच दर १४.४७ टक्के होता. २०१५ मध्ये हा दर १३.४३ टक्क्यांवर आला. असे असले तरी २००१ मध्ये केलेल्या जनगणनेतील आकडेवारी पाहता २०११ मध्ये जिल्ह्यातील लोकसंख्या वाढली आहे. शहरात राहणाऱ्या नागरिकांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसते.गावांची संख्या घटली२००१ पर्यंत जिल्ह्यातील गावांची संख्या १,३८२ होती. ती २०११ मध्ये १,३७६ पर्यंत आली आहे. जिल्ह्यात सहा नगरपालिका असून चार नगरपंचायत आहेत. या प्रत्येक शहरातील लोकसंख्येत गत १० वर्षात वाढ झाल्याचे दिसते.