शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

मोबाईल धारकांच्या खिशाला झळ

By admin | Updated: October 29, 2014 22:55 IST

सध्या संपूर्ण नागरिकांना मोबाईल हा जीव की प्राण झाला आहे़ याचाच फायदा सिमकार्ड कंपन्यांनी घेतला असून अतिरिक्त सेवांचा भार ग्राहकांवर लादला जात आहे़ यामुळे ग्राहकांच्या खिशाला झळ पोहोचत

गिरड : सध्या संपूर्ण नागरिकांना मोबाईल हा जीव की प्राण झाला आहे़ याचाच फायदा सिमकार्ड कंपन्यांनी घेतला असून अतिरिक्त सेवांचा भार ग्राहकांवर लादला जात आहे़ यामुळे ग्राहकांच्या खिशाला झळ पोहोचत असल्याचे दिसून येत आहे़ ट्रायने याकडे लक्ष देत सिमकार्ड कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांद्वारे करण्यात येत आहे़ मोबाईल धारकांना सेवा देणाऱ्या सिमकार्ड कंपन्यांनी विविध योजनांची प्रलोभने देत ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याचा प्रकार सुरू केला आहे़ एखाद्या योजनेच्या लोभाला पडून ग्राहक सेवा घेतात; पण जेव्हा बिल द्यावे लागते, तेव्हा कपाळावर हात ठेवतात़ मोबाईल सेवा पुरविणाऱ्या काही कंपन्या ग्राहकांच्या मोबाईलवर आपल्या मर्जीने अनेक सुविधा सुरू करीत आहे. ग्राहकांची परवानगी न घेता आपल्याकडील उपलब्ध सेवा बहाल करतात. यात डायलटोन, भजन, राशी-भविष्य, संगीत, क्रिकेट स्कोअर, इंटरनेट आदींचा समावेश आहे़ या सुविधा ग्राहकांना पूर्वसूचना न देताच सुरू केल्या जात आहेत़ यामुळे मोबाईल धारकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे़ याबाबत ग्राहक सेवा केंद्रातून समाधानकारक उत्तरेही मिळत नसल्याने ग्राहकांद्वारे संताप व्यक्त केला जात आहे़ हा प्रकार जबरदस्तीचा असून कपात केलेली रक्कमही ग्राहकांना परत केली जात नाही़ एक-दोन दिवसांनी पैसे जमा होतील, असे सांगितले जाते; मात्र तसे घडताना दिसत नाही़ ग्रामीण भागात भारत संचार निगमची सेवा उत्तम असल्याने ग्राहकसंख्या अधिक आहे; पण या कंपनीच्या अतिरिक्त सेवा ग्राहकांच्या चुकीने एकदा सुरू झाल्या की, त्या बंद करण्याचा कुठलाही मार्ग ग्राहकांना उपलब्ध होत नाही. अखेर ग्राहकांना ते सिमकार्ड रद्द करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो़ असाच प्रकार अन्य खासगी सिमकार्ड कंपन्यांकडूनही केला जात असल्याचा आरोप ग्राहकांकडून केला जात आहे़ ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याच्या या प्रकारावर कुणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येते़ शहरी भागातील नागरिक असे कॉल वा मॅसेज आले तर ते उचलत नाहीत; पण ग्रामीण भागात याबाबत जागृती नसते़ यामुळे ग्रामस्थांच्या मोबाईलवरच या सेवांचा अधिक भार पडत असल्याचे दिसून येत आहे़ यावर नियंत्रणासाठी असलेल्या ट्रायचेही दुर्लक्ष होत असल्याने ग्राहकांना मात्र मनस्ता सहन करावा लागतो़(वार्ताहर)