शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

‘मिशन ग्रीन’ संकल्पनेला लागले ग्रहण

By admin | Updated: June 29, 2017 00:35 IST

ग्रीन बेल्ट निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले होते.

खड्ड्यांमध्ये केवळ काड्याच : संरक्षक कठडे बेपत्ता, जिवंत रोपे नगण्य लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणघाट : ग्रीन बेल्ट निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले होते. या वृक्षांचे संगोपन होणे गरजेचे होते; पण तसे झाले नाही. परिणामी, खड्ड्यांमध्ये रोपांच्या नावावर केवळ काड्याच शिल्लक आहेत. शिवाय संरक्षक कठडेही बेपत्ता झाले आहेत. यामुळे ‘मिशन ग्रीन’ संकल्पनेचाच फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूने वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन आणि संवर्धन करण्याच्या प्रयत्नांचे तीनतेरा वाजले आहे. वृक्षांचे अनेक संरक्षक कठडे मोठ्या प्रमाणात तुटले आहेत. त्यातील बरीच रोपे मृतप्राय अवस्थेत आहे. काही ठिकाणी केवळ खड्डे तर काही ठिकाणी काड्याच शिल्लक आहेत. जिवंत रोपाची संख्या रोडावली असून ५० ते ६० संरक्षक कठडेच आता व्यवस्थित असल्याचे निदर्शनास येते. यामुळे ‘मिशन ग्रीन’ संकल्पनेला ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर हिंगणघाट ते वडनेर दरम्यान दुतर्फा वृक्षारोपण करून हिरवा पट्टा निर्माण करण्याची शासकीय योजना तयार करण्यात आली होती. त्यानुसार महामार्गाला हिरवेगार करण्याच्या प्रयत्नांत १० हजार वृक्ष रस्त्याच्या दुतर्फा लावून त्यांचे संगोपन, संवर्धन करण्याचे काम निवीदा काढत कंत्राटदाराकडून करून घेण्यात आले. बांबूपासून बनविलेले संरक्षक कठडे रोपांना लावण्यात आले; पण काही दिवसांपूर्वी आलेल्या पावसाने आणि वादळी वाऱ्याने अनेक कठड्यांनी आपली जागाच बदलली आहे. अनेक कठडे तर तत्पूर्वीच तुटले असून वृक्षांना संरक्षण देण्याची जबाबदारी असलेल्या कठड्यांचीच स्थिती चिंताजनक झाली आहे. यामुळे ते वृक्ष संगोपन, संरक्षण करतील काय, हा प्रश्नच आहे. तुटलेल्या कठड्यांमुळे वृक्षसंगोपनात आणखी अडचणी वाढल्या आहे. अनेक वृक्षांची पूढे वाढ होऊ शकली नाही. अनेक रोपे गुरांनी फस्त केले आहेत. शिवाय कोमेजलेल्या रोपांची संख्याही मोठी आहे. रोपांसाठी केलेल्या खड्ड्यांमध्ये आता केवळ काड्याच शिल्लक असल्याचे दिसते. दहा किमीच्या हरित पट्ट्यातील सुमारे ३० वृक्षांवर याचा परिणाम झाला आहे. यामुळे शासनाचा निधी व्यर्थ तर जात नाही नाही, असा सवालही उपस्थित केला जात आहे. दरवर्षी शासनाद्वारे वृक्षारोपणावर भर दिला जातो; पण वृक्ष जगण्याचे अत्यल्प असल्याने खर्च व्यर्थ ठरत असल्याचे दिसून येते. शासनाच्या उद्देशालाच तिलांजली राष्ट्रीय महामार्ग, महामार्ग, राज्य मार्ग, ग्रामीण रस्ते अशा बऱ्याच प्रकारच्या रस्त्यांची निर्मिती सर्वत्र होत आहे. यात सर्वत्र डांबर आणि सिमेंटचे जंगल पसरत आहे. परिणामी, पर्यावरणालाही धोका निर्माण होत आहे. हा प्रकार टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर ग्रीन बेल्ट तयार करण्याच्या उद्देशाने शासनाने वृक्षारोपण मोहीम हाती घेतली. यात रोपांची लागवड करण्यात येते; पण वृक्षांचे संवर्धन होत नसल्याने मूळ उद्देशाला तिलांजलीच मिळत आहे.