शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

अनेक कर्जाच्या फाईली गहाळ

By admin | Updated: October 19, 2016 01:15 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेतील मोठ्या थकबाकीदारांवर कारवाईचे सोंग शासनाच्यावतीने सुरू आहे.

किसान अधिकार अभियानचा आरोप : जिल्हा बँकेतील प्रकारवर्धा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेतील मोठ्या थकबाकीदारांवर कारवाईचे सोंग शासनाच्यावतीने सुरू आहे. या बँकेतून अनेक मोठ्या थकबाकीदारांची कागदपत्रे गहाळ आहे. कर्जासंदर्भातील पुरावे मिटविण्याकरिता या फाईल्स गहाळ करण्यात आल्या असून होत असलेली कारवाई केवळ औपचारिकता असल्याचा आरोप किसान अधिकार अभियानने मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीतून केला आहे. सध्या जिल्हा बॅँकेवर प्राधिकृत समिती आहे. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून त्यांच्या व्यस्त कारभारामुळे त्यांना बँकेवर लक्ष देण्यास वेळ नसल्याचा आरोपही अभियानने केला आहे. जिल्हा उपनिबंधकांना जिल्ह्यातील नागरिक सहकारी बॅँका, पतसंस्था, कर्मचारी सहकारी पतसंस्था यांना हमी देऊन त्यांची खाती जिल्हा बॅँकेत वळती करण्यास वेळ नसून त्यांना केवळ सेवानिवृत्त गटसचिवांची ग्रॅच्युईटी व पगार याचीच काळजी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यामध्ये तालुका व जिल्हा देखरेख सहकारी संघ बंद करण्यात आलेले आहेत. राज्यातही असे संघ नाही; परंतु याला वर्धा अपवाद आहे. गटसचिव अनामत रक्कम दाखवून कर्जाच्या वसुलीमधून खर्च झाले म्हणून वसुल करून घेतात, कारण नसताना वर्धा जिल्हा देखरेख सहकारी संघात सेवानिवृत्त गटसचिवांना कामावर ठेवण्यात आले आल्याचा आरोपही तक्रारीतून करण्यात आला आहे.