शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

शासनाविरुद्ध मिसाबंदीतील व्यक्ती जाणार न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 16:31 IST

महाराष्ट्रातील लोकतंत्र सेनानींकरिता तत्कालीन भाजप सरकारने सन्माननिधी म्हणून मानधन सुरू केले होते. मात्र, विद्यमान सरकारने गेल्या चार महिन्यांपासून या लोकतंत्र सेनानींना (मिसाबंदी) मानधन दिले नसल्यामुळे वृद्धापकाळात त्यांना जगणे कठीण झाले आहे.

ठळक मुद्देचार महिन्यांपासून मानधन थकलेवृद्धापकाळात होतेय ससेहोलपट

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा: महाराष्ट्रातील लोकतंत्र सेनानींकरिता तत्कालीन भाजप सरकारने सन्माननिधी म्हणून मानधन सुरू केले होते. मात्र, विद्यमान सरकारने गेल्या चार महिन्यांपासून या लोकतंत्र सेनानींना (मिसाबंदी) मानधन दिले नसल्यामुळे वृद्धापकाळात त्यांना जगणे कठीण झाले आहे. याबाबत पाठपुरावा करूनही सरकारला जाग येत नसल्याने आता शासनाविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.राज्यामध्ये ३ हजार २१२ लोकतंत्र सेनानी आहेत. त्यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी पुढील परिणामांची चिंता न करता तुरुंगवास भोगला. या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, संसार उद्ध्वस्त झालेत. त्यामुळे १९७७ ला पुन्हा देशात लोकशाही लागू झाली. अशा या मिसाबंदीना भाजप शासनाने मासिक १० हजार रुपये तर विधवांना ५ हजार रुपये असा सन्मानिधी देण्यास सुरुवात केली होती. सध्या हे लोकतंत्र सेनानी ६५ ते ९२ वर्षे वयोगटातील असून त्यापैकी अनेकांना मधुमेह, अर्धांगवायू, उच्चदाब, हृदविकार, मुत्राशय आदी आजाराने ग्रासले आहे. त्यांना औषधोपचाराकरिता पैशांची गरज असून राज्य शासनाने गेल्या जानेवारी महिन्यापासून त्यांना सन्माननिधी दिलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर अक्षरश: भीक मागून जगण्याची वेळ आली आहे. या चार महिन्यांच्या कालावधीत काहींनी जगाचाही निरोप घेतला आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ त्यांना सन्मानिधी द्यावा, अशी मागणी होत आहे.केंद्र, राज्य सरकारकडूनही अपेक्षा भंगमहाआघाडी सरकारच्या स्थापनेनंतर अखिल भारतीय लोकतंत्र सेनानी संयुक्त संघर्ष समितीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी लोकतंत्र सेनानींना नियमित सन्माननिधी देण्याचे आश्वासन दिले होते. महाआघाडी सरकार स्थापनेनंतर लोकतंत्र सेनानीना जानेवारीपर्यंतचा सन्माननिधी देण्यात आला. पण, त्यानंतर चार महिन्यांपासून हा निधी मिळालाच नाही. केंद्र सरकारकडूनही काही तरी पदरात पडेल, अशी अपेक्षा होती. त्यावरही पाणी फेरल्याने आता लोकतंत्र सेनानींचा सन्मान रोखणाऱ्या शासनाविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करण्याची भूमिका लोकतंत्र सेनानी संघाचे विजय फलके यांनी घेतली आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय