शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
4
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
5
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
6
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
7
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
8
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
9
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
10
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
11
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
12
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
13
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
14
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
15
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
16
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
17
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
18
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
19
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
20
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक

कारयात्रेतून ‘सडक सुरक्षा, जीवन रक्षा’चा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 22:27 IST

सडक सुरक्षा, जीवन रक्षा हा संदेश देणारी दिल्लीच्या राजघाट येथून निघालेली कार यात्रा रविवारी पूणे होत रात्री उशीरा सेवाग्राम येथे दाखल झाली. सोमवारी सकाळी या कार यात्रेतील सहभागी मान्यवरांनी येथील गांधी आश्रमाची पाहणी करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन केले. त्यानंतर दुपारी ही कार रॅली यात्रा जबलपूरच्या दिशेने रवाना झाली.

ठळक मुद्देबापूकुटीत राष्ट्रपित्याला अभिवादन : बापूंच्या १५० व्या जयंतीनिमित्त दिल्ली ते बांगलादेश प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : सडक सुरक्षा, जीवन रक्षा हा संदेश देणारी दिल्लीच्या राजघाट येथून निघालेली कार यात्रा रविवारी पूणे होत रात्री उशीरा सेवाग्राम येथे दाखल झाली. सोमवारी सकाळी या कार यात्रेतील सहभागी मान्यवरांनी येथील गांधी आश्रमाची पाहणी करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन केले. त्यानंतर दुपारी ही कार रॅली यात्रा जबलपूरच्या दिशेने रवाना झाली.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून ही विशेष कार यात्रा काढण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पूणे येथून ही कार यात्रा वर्धेत रविवारी उशीरा दाखल झाली. यात्रेकरूंनी सोमवारी सकाळी बापूकूटीत नतमस्तक होऊन राष्ट्रपित्याला अभिवादन केले. त्यानंतर ही कार यात्रा जबलपूरच्या दिशेने रवाना झाली. भारत सरकारच्या पुढाकाराने कलिंगा मोटर स्पोर्टस् क्लब भुवनेश्वर उडिसा यांच्या सहकार्याने ही कार यात्रा आयोजित करण्यात आली आहे. रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने यात्रेकरू नागरिकांना ‘सडक सुरक्षा, जीवन रक्षा’चा संदेश देत आहेत.आठ महिलांचा समावेशया कार यात्रेत वेगवेळ्या विभागाचे लोक व नागरिक सहभागी झाले आहेत. इतकेच नव्हे तर आठ महिलांसह २२ पुरुषांचा त्यात समावेश असून गांधीजींचे सचिव म्हणून काम केलेले ९७ वर्षीय व्ही. लल्यानम् ही दिल्ली ते पुणेपर्यंत यात्रेत सहभागी झाले होते.वाहतूक नियमांचे पटवून देत आहेत महत्त्वरस्ता सुरक्षा सप्ताह अभियाना अंतर्गत ही यात्रा काढण्यात आली आहे. यात्रेची सुरूवात दिल्लीच्या राजघाट येथून झाली असून यात्रेतील सहभागी मान्यवर नागरिकांना वाहन चालविताना वाहतूक नियम पाळणे कसे फायद्याचे ठरते हे पटवून देत आहेत. शिवाय जीव लाखमोलाचा आहे, याचे भान ठेऊन वाहनचालकांनी वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नये, हेही ते पटवून देत आहेत.३,००० कि.मी. प्रवास पूर्णदिल्ली ते सेवाग्राम असा तीन हजार कि़मी.चा प्रवास या यात्रेकरूंनी आतापर्यंत पूर्ण केला आहे. सोमवारी ही यात्रा जबलपूरच्या दिशेने रवाना झाली असून ती मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, ऊत्तराखंड, बंगाल होत बांग्लादेश येथे जाणार आहे. त्यानंतर आगरा, म्यानमार येथे पोहोचेल. २५ फेबु्रवारीला या कार यात्रेचा समारोप होणार आहे.भारत सरकारच्या अभियान अंतर्गत ही यात्रा आहे. सडक सुरक्षा जनजागृती आणि गांधीजींचा विचारांचा प्रचार करण्याचे काम या अभियानातून आम्ही करीत आहो. ही कार यात्रा ७,२५० कि.मी.ची असून सर्वत्र च़ागला प्रतिसाद मिळत आहे.- लाजप्रत प्रसाद, यात्रेतील सहभागी सदस्य.