शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कारयात्रेतून ‘सडक सुरक्षा, जीवन रक्षा’चा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 22:27 IST

सडक सुरक्षा, जीवन रक्षा हा संदेश देणारी दिल्लीच्या राजघाट येथून निघालेली कार यात्रा रविवारी पूणे होत रात्री उशीरा सेवाग्राम येथे दाखल झाली. सोमवारी सकाळी या कार यात्रेतील सहभागी मान्यवरांनी येथील गांधी आश्रमाची पाहणी करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन केले. त्यानंतर दुपारी ही कार रॅली यात्रा जबलपूरच्या दिशेने रवाना झाली.

ठळक मुद्देबापूकुटीत राष्ट्रपित्याला अभिवादन : बापूंच्या १५० व्या जयंतीनिमित्त दिल्ली ते बांगलादेश प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : सडक सुरक्षा, जीवन रक्षा हा संदेश देणारी दिल्लीच्या राजघाट येथून निघालेली कार यात्रा रविवारी पूणे होत रात्री उशीरा सेवाग्राम येथे दाखल झाली. सोमवारी सकाळी या कार यात्रेतील सहभागी मान्यवरांनी येथील गांधी आश्रमाची पाहणी करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन केले. त्यानंतर दुपारी ही कार रॅली यात्रा जबलपूरच्या दिशेने रवाना झाली.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून ही विशेष कार यात्रा काढण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पूणे येथून ही कार यात्रा वर्धेत रविवारी उशीरा दाखल झाली. यात्रेकरूंनी सोमवारी सकाळी बापूकूटीत नतमस्तक होऊन राष्ट्रपित्याला अभिवादन केले. त्यानंतर ही कार यात्रा जबलपूरच्या दिशेने रवाना झाली. भारत सरकारच्या पुढाकाराने कलिंगा मोटर स्पोर्टस् क्लब भुवनेश्वर उडिसा यांच्या सहकार्याने ही कार यात्रा आयोजित करण्यात आली आहे. रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने यात्रेकरू नागरिकांना ‘सडक सुरक्षा, जीवन रक्षा’चा संदेश देत आहेत.आठ महिलांचा समावेशया कार यात्रेत वेगवेळ्या विभागाचे लोक व नागरिक सहभागी झाले आहेत. इतकेच नव्हे तर आठ महिलांसह २२ पुरुषांचा त्यात समावेश असून गांधीजींचे सचिव म्हणून काम केलेले ९७ वर्षीय व्ही. लल्यानम् ही दिल्ली ते पुणेपर्यंत यात्रेत सहभागी झाले होते.वाहतूक नियमांचे पटवून देत आहेत महत्त्वरस्ता सुरक्षा सप्ताह अभियाना अंतर्गत ही यात्रा काढण्यात आली आहे. यात्रेची सुरूवात दिल्लीच्या राजघाट येथून झाली असून यात्रेतील सहभागी मान्यवर नागरिकांना वाहन चालविताना वाहतूक नियम पाळणे कसे फायद्याचे ठरते हे पटवून देत आहेत. शिवाय जीव लाखमोलाचा आहे, याचे भान ठेऊन वाहनचालकांनी वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नये, हेही ते पटवून देत आहेत.३,००० कि.मी. प्रवास पूर्णदिल्ली ते सेवाग्राम असा तीन हजार कि़मी.चा प्रवास या यात्रेकरूंनी आतापर्यंत पूर्ण केला आहे. सोमवारी ही यात्रा जबलपूरच्या दिशेने रवाना झाली असून ती मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, ऊत्तराखंड, बंगाल होत बांग्लादेश येथे जाणार आहे. त्यानंतर आगरा, म्यानमार येथे पोहोचेल. २५ फेबु्रवारीला या कार यात्रेचा समारोप होणार आहे.भारत सरकारच्या अभियान अंतर्गत ही यात्रा आहे. सडक सुरक्षा जनजागृती आणि गांधीजींचा विचारांचा प्रचार करण्याचे काम या अभियानातून आम्ही करीत आहो. ही कार यात्रा ७,२५० कि.मी.ची असून सर्वत्र च़ागला प्रतिसाद मिळत आहे.- लाजप्रत प्रसाद, यात्रेतील सहभागी सदस्य.