शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
5
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
6
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
7
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
8
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
9
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
10
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
11
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
12
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
13
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
14
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
15
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
16
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
17
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
18
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
19
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
20
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान

ग्रामीण रस्त्यांवर सर्वाधिक खर्च

By admin | Updated: July 26, 2014 02:37 IST

प्रत्येक आमदारांना वर्षाला कोटी दोन रुपये आमदार

ंंआमदारांचे रिपोर्ट कार्ड : सर्वाधिक कामे रणजित कांबळे यांच्या निधीतूनराजेश भोजेकर वर्धाप्रत्येक आमदारांना वर्षाला कोटी दोन रुपये आमदार निधी म्हणून प्राप्त होतो. आपल्या मतदार संघातील महत्त्वपूर्ण कामे या निधीतून करावयाची असतात. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात आमदार निधीतून झालेल्या विकास कामांवर दृष्टी फिरविल्यास सर्वाधिक कामे ग्रामीण भागातील मतदारांवर डोळा ठेवून केली जात असल्याचे लक्षात येते. यामध्ये अप्रोच आणि अंतर्गत रस्त्यांचा समावेश आहे. मागील तीन महिन्यात सुरू असलेल्या कामांचा धडाका बघता ना. रणजित कांबळे हे कामांच्या संख्येत तर आ. सुरेश देशमुख हे निधी खर्चाच्या बाबतीत आघाडीवर आहे. ना. कांबळे यांनी १ कोटी ५३ लाख रुपये किमतीची ६८ कामे हाती गेतली आहे, तर आ. देशमुख यांनी ५९ कामे हाती घेतली असून या कामांची किमत १ कोटी ९९ लाख ९७ हजार रुपये इतकी आहे.यापाठोपाठ आर्वीचे आमदार दादाराव केचे यांचा क्रमांक लागतो. त्यांनी १ कोटी ८९ लाख ७६ हजार रुपये किंमतीची ६३ कामे सुरू केलेली आहे. शेवटचा क्रमांक हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचे आ. अशोक शिंदे यांचा लागतो. आ. शिंदे यांनी १ कोटी ६४ लाख २२ हजार रुपये किमतीची ५२ कामे हाती घेतली आहे. यामध्ये सरासरी ७० टक्के पुल, नाल्या बांधकाम, सामाजिक सभागृह, समाज मंदिर, स्मशानभूमी अंतर्गत रस्ते बांधकामांचा समावेश आहे. २० टक्के विंधन विहिरींची कामे, तर १० टक्केमध्ये शाळांना संगणक, वाचनालयाला साहित्य पुरविणे या कामांचा समावेश आहे. देवळी विधानसभा मतदार संघात सर्वाधिक कामे रस्ते व पुल बांधकामाची सुरू आहे. या क्षेत्राचे लोकप्रतिनिधी ना. कांबळे यांनी गावांवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. ग्रामीण भागातील रस्ते, पुल, रपटे, अंतर्गत रस्त्यांची कामे त्यांनी मोठ्या प्रमाणावर हाती घेतली आहे. वर्धा विधानसभा मतदार संघात आ. देशमुख यांनी हाती घेतलेली सुमारे ८५ टक्के कामे ही गावांतील हद्दीतील अंतर्गत रस्त्यांची आहे. १० टक्के निधी उर्वरित कामांवर खर्च होत होत आहे. आर्वी मतदार संघात सर्वाधिक निधी हा ग्रामीण भागातील रस्ते बांधकामावर खर्च करण्यात येत आहे. आ. केचे यांनी मागील तीन महिन्यात हाती घेतलेल्या कामांमध्ये गावांच्या अप्रोच रस्त्यांचा समावेश अधिक आहे. या पाठोपाठ समाज मंदिर, लहानसहान पुल व रपटे बांधकाम यासारखी कामे हाती घेतली आहे. हिंगणघाट विधानसभा मतदार संघातही आ. शिंदे यांनी बांधकामावर विशेष भर दिला आहे. यामध्ये ७५ टक्के निधी हा रस्ते, लहानसहान पुल व इतर बांधकामावर खर्च केला जात आहे. १५ टक्के निधी हा शाळांना संगणक, सार्वजनिक सभागृह, समाज मंदिर सारख्या कामांवर खर्च करण्यात येत आहे. उर्वरित निधी इतर कामांवर खर्च केल्या जात आहे. ग्रामपंचायतीही झाल्या आमदारांवर निर्भरग्रामपंचायतींकडे अपुरा निधी असल्यामुळे अंतर्गत रस्त्यांचेही बांधकाम करता येणे शक्य नाही. ग्रामसभेच्या ठरावावर वरिष्ठ पातळीवर कार्यवाही होत नाही. ठरावामध्ये अनेक विकास कामे गावकऱ्यांकडून सुचविली जातात. मात्र ती केवळ कागदावरच राहतात. या ठरावामंध्ये वरिष्ठ पातळी खोडतोडीचे प्रमाणही वाढले आहे. एकीकडे ग्रामसभेला शासनाने अधिक महत्त्व दिले असतानाही प्रत्यक्षात मात्र तसे होताना दिसत नाही. यामुळे विद्यमान ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांना निष्क्रीयतेचा ठपका ठेवला जातो. हा ठपका पुसून काढण्यासाठी सरपंच आणि उपसरपंचाच्या आमदारांकडे वाऱ्या सुरु होतात. आमदारही आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमदार फंडातून गावातील विकास कामांना महत्त्व दिले जात आहे. अलीकडे ग्रामपंचायती पूर्णत: आमदार निधीवर निर्भर झाल्याचे दिसून येते.