शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वन्यजीव संवर्धनातून रोजगाराच्या अनेक संधी

By admin | Updated: April 23, 2016 02:13 IST

देशात सर्वात लहान व्याघ्र संवर्धन प्रकल्प हा बोर आहे. या अभयारण्याच्या बफर झोन क्षेत्रात १२० स्क्वेअर कि़मी. वरून दुप्पट वाढ होण्याची संधी आहे.

किशोर रिठे : बोर व्याघ्र प्रकल्पात राष्ट्रीय जनसंपर्क परिषदवर्धा : देशात सर्वात लहान व्याघ्र संवर्धन प्रकल्प हा बोर आहे. या अभयारण्याच्या बफर झोन क्षेत्रात १२० स्क्वेअर कि़मी. वरून दुप्पट वाढ होण्याची संधी आहे. त्यामुळे या क्षेत्रात येणाऱ्या ४४ गावांसमोरील प्रश्न दूर होण्यासाठी मदतच होणार आहे. तसेच वन्य जीव संवर्धनाच्या माध्यमातून हजारो नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे मत मत वन्यजीव अभ्यासह किशोर रिठे यांनी व्यक्त केले. पब्लिक रिलेशन्स सोसायटी आॅफ इंडिया वर्धा चॅप्टरच्यावतीने राष्ट्रीय जनसंपर्क परिषदेचे आयोजन बोर व्याघ्र प्रकल्प संकुलात गुरुवारी करण्यात आले होते. ‘एक राष्ट्र एक स्वर विश्वासाचा सेतू जनसंपर्क’ या विषयावर आधारित या परिषदेत ‘वन पर्यटन आणि जनसंपर्क’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी ‘बोर’ चे विभागीय वनाधिकारी एस.बी. भलावी, प्रकल्पाचे सहायक वनरक्षक उत्तम सावंत, वन परिक्षेत्र अधिकारी रूपाली भिंगारे-सावंत, चॅप्टरचे अध्यक्ष प्रा. अनिल कुमार राय, मुंबई विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी लिलाधर बन्सोड, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी विलास नांदूरकर, जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्थेचे विनेश काकडे आदींची उपस्थित होती. प्रा. अनिल कुमार राय यांनी ‘एक राष्ट्र एक स्वर : विश्वासाचा सेतू जनसंपर्क’ यावर मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी जनसंपर्काचे महत्व, जनसंपर्क संघटनेची स्थापना, मॅकब्राईड आयोग आदी विषयांतून देशात एकता टिकविण्यासाठी सामुहिक जबाबदारी सर्वांवर असल्याचे सांगितले. देशात विविधतेत एकता असून एक राष्ट्र, एक स्वर हीच आपली शक्ती असल्याचे स्पष्ट केले.भलावी यांनी बोर व्याघ्र प्रकल्पाबाबत माहिती देऊन येथील आजूबाजूंच्या गावांच्या सहकार्यातूनच विकास साध्य होणार असल्याचे सांगितले. प्रकल्पाच्या आजूबाजंूच्या गावांमध्ये ९५ टक्के एलपीजी गॅसची जोडणी देऊन होणारी वृक्ष कत्तल, चुलीपासून होणारे प्रदूषण, त्यापासून होणारा आजार यावर नियंत्रण होण्यास मदत झाली असल्याचे सांगितले. बोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटनात दिवसेंदिवस वाढ होत असून गावकऱ्यांनी पर्यटन विकासात सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते जनसंपर्क क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बनसोड, नांदूरकर यांचा सत्कार करण्यात आला. संमेलनात उपस्थितांना द्वितीय व तृतीय सत्रात सावंत आणि काकडे यांनी विचार व्यक्त केले. यावेळी रातवा या वन्य संवर्धनावर आधारित संकेतस्थळाचे आणि परिषदेच्या विशेषांकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी पीआरएसआय वर्धा चॅप्टरचे सचिव बी.एस. मिरगे, संजय इंगळे तिगावकर, संदीप घनोकार, इब्राहिम बक्ष, रोश लेहकपुरे, श्याम टरके, सचिन घोडे, प्रा. राजेंद्र मुढे, नंदकुमार वानखेडे, प्रवीण गावंडे, अभिजित बोडखे, आदींसह हिंदी विद्यापीठाचे विद्यार्थी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)नवमाध्यमांचा वापर करावा - अनिल गडेकरसमारोपीय सत्रात जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर म्हणाले, नवमाध्यमांचा वापर प्रभावीपणे शासनाच्या जनसंपर्क विभागामार्फत करण्यात येत आहे. जनसंपर्क अधिकारी यांनीही काळाची गरज ओळखून फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉट्स अ‍ॅपचा वापर करणे गरज बनल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, यशवंत दाते स्मृती संस्थेचे प्रदीप दाते, पक्षी अभ्यासक किशोर वानखडे यांचीही उपस्थिती होती. सहभागींना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.