शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

व्यापाऱ्यांकडून कापूस उत्पादकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 23:58 IST

कापसाची पिके ५० टक्क्यांच्या आसपास असतानाही कापसाच्या भावात मंदीचे कारण पुढे करीत खासगी व्यापारी कापूस उत्पादकांकडून अक्षरश: आर्थिक लूट केली जात आहे. रोहणा बाजारात कापसाचे भाव ५३०० रुपयांपर्यंत खाली आले असून हा भाव शासनाच्या हमीभावापेक्षा १५० रूपयांनी कमी आहे.

ठळक मुद्देशासकीय खरेदी सुरू करण्याची मागणी : हमीभावापेक्षा कमी दराने करू नये खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : कापसाची पिके ५० टक्क्यांच्या आसपास असतानाही कापसाच्या भावात मंदीचे कारण पुढे करीत खासगी व्यापारी कापूस उत्पादकांकडून अक्षरश: आर्थिक लूट केली जात आहे.रोहणा बाजारात कापसाचे भाव ५३०० रुपयांपर्यंत खाली आले असून हा भाव शासनाच्या हमीभावापेक्षा १५० रूपयांनी कमी आहे. आता व्यापाºयांनी शेतमाल हमीभावापेक्षा कमी भावाने खरेदी करण्याचा गुन्हा केला असून शासन यांच्यावर कारवाई करणार काय, असा प्रश्न शेतकऱ्यांतून विचारला जात आहे.अर्थशास्त्राच्या नियमानुसार उत्पादन चांगले झाले, बाजारात आवक वाढली तर वस्तूचे भाव पडतात व उत्पादन घटले, आवक कमी झाली तर वस्तूंचे भाव वाढतात. पण, हा नियम इतर पक्क्या वस्तूंना लागू पडत असला तरी शेतमालाला तो बरेचदा लागू पडत नाही, असा विपरीत अनुभव यावर्षी कापूस उत्पादकांना येत आहे. यावर्षी अत्यल्प पाऊस, आॅक्टोबर महिन्यात प्रचंड उष्णतामान व आता १० सेल्सियसपर्यंतची थंडी यामुळे डिसेंबरच्या शेवटी कापूस उलंगवाडीला आला. तज्ञांचे काहीही मत असले तरी कापसाचे उत्पन्न ५० टक्क्यांच्यावर नाही. एप्रिल-मे पर्यंत कापूस देणारी पऱ्हाटीची झाडे डिसेंबरच्या अखेरीस वाळलेली आहेत. बाजारात कापसाची आवक घटली आहे. कापूस खरेदीदार जिनिंग नियमीतपणे चालू राहावे म्हणून कापसाची वाट पाहत आहेत. एवढे असले तरी सुरुवातीला ५९०० रुपयांपर्यंत असलेला भाव रोहणा बाजारात आता ५३०० पर्यंत खाली आला. रोजची गरज व वेचणीची मजुरी देण्याच्या आवश्यकतेपोटी शेतकºयांना मिळेल त्या भावाने कापूस विकावाच लागतो. कापसाला मार्च, एप्रिल महिन्यात सहा हजार रुपये भाव मिळण्याचे संकेत असून आज मिळेल त्या भावाने शेतकºयांना कापूस विकावा लागत आहे. सुरुवातीला कापसाला हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत असल्याने शासनाला कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्याची गरज पडली नाही. पण आता बाजारातील भाव हमी भावाच्या खाली गेल्यावर शासनाने आपली खरेदी केंद्रे सुरू करून शेतकऱ्यांना हमीभावाचे संरक्षण देणे गरजेचे आहे. पण, त्यादृष्टीने शासनाची कोणतीच हालचाल नाही. निदान तालुका पातळीवर एका खरेदी केंद्राची व्यवस्था ठेवली असती तर व्यापार हाच कापूस हमीभावापेक्षा किमान २५ रू. अधिक देऊन खरेदी करत होते. पण शासनाची ती तयारी नसल्याने खासगी व्यापारी कापूस उत्पादकांची आर्थिक लूट करीत आहे. शासनाने खरेदी केंद्रे सुरू करावीत, शेतमाल हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करू नये, अशी शेतकºयांची मागणी आहे.कापसाला कवडीमोल भाव, तूर पीकही वाळलेचिकणी (जामणी)- चार-पाच दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकºयांच्या शेतात असलेला कापूस ओला झाला. यामुळे कापसाची प्रत घसरली व काही प्रमाणात कापूसही खराब झाला. यामुळे आता निघत असलेला कापूस व्यापारी कवडीमोल भावात मागत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.हल्ली चांगल्या प्रतीचा कापसाला ५ हजार ७००-८०० भाव आहे, तर अवकाळी पावसाने ओला झालेल्या कापसाचे भाव पाच हजार रूपयांपर्यंत असल्याचे शेतकऱ्यांकडून समजते. अवकाळी पावसामुळे भिजलेल्या कापसालासुध्दा योग्य भाव मिळावा, अशी मागणी चिकणी, जामणी, पढेगाव, निमगाव व परिसरातील शेतकरी करीत आहे. ढगाळी वातावरण व तुरळक पावसाने तूर व चणा पिकांवर अळ्यांनी हल्ला चढविला. तर काही शेतातील तूर पीक शेंगा पूर्णत: भरण्यापूर्वी वाळत आहेत. शेंगांतील दाने बारीक होत असल्याने पिकांत घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :cottonकापूस