शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

व्यापाऱ्यांकडून कापूस उत्पादकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 23:58 IST

कापसाची पिके ५० टक्क्यांच्या आसपास असतानाही कापसाच्या भावात मंदीचे कारण पुढे करीत खासगी व्यापारी कापूस उत्पादकांकडून अक्षरश: आर्थिक लूट केली जात आहे. रोहणा बाजारात कापसाचे भाव ५३०० रुपयांपर्यंत खाली आले असून हा भाव शासनाच्या हमीभावापेक्षा १५० रूपयांनी कमी आहे.

ठळक मुद्देशासकीय खरेदी सुरू करण्याची मागणी : हमीभावापेक्षा कमी दराने करू नये खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : कापसाची पिके ५० टक्क्यांच्या आसपास असतानाही कापसाच्या भावात मंदीचे कारण पुढे करीत खासगी व्यापारी कापूस उत्पादकांकडून अक्षरश: आर्थिक लूट केली जात आहे.रोहणा बाजारात कापसाचे भाव ५३०० रुपयांपर्यंत खाली आले असून हा भाव शासनाच्या हमीभावापेक्षा १५० रूपयांनी कमी आहे. आता व्यापाºयांनी शेतमाल हमीभावापेक्षा कमी भावाने खरेदी करण्याचा गुन्हा केला असून शासन यांच्यावर कारवाई करणार काय, असा प्रश्न शेतकऱ्यांतून विचारला जात आहे.अर्थशास्त्राच्या नियमानुसार उत्पादन चांगले झाले, बाजारात आवक वाढली तर वस्तूचे भाव पडतात व उत्पादन घटले, आवक कमी झाली तर वस्तूंचे भाव वाढतात. पण, हा नियम इतर पक्क्या वस्तूंना लागू पडत असला तरी शेतमालाला तो बरेचदा लागू पडत नाही, असा विपरीत अनुभव यावर्षी कापूस उत्पादकांना येत आहे. यावर्षी अत्यल्प पाऊस, आॅक्टोबर महिन्यात प्रचंड उष्णतामान व आता १० सेल्सियसपर्यंतची थंडी यामुळे डिसेंबरच्या शेवटी कापूस उलंगवाडीला आला. तज्ञांचे काहीही मत असले तरी कापसाचे उत्पन्न ५० टक्क्यांच्यावर नाही. एप्रिल-मे पर्यंत कापूस देणारी पऱ्हाटीची झाडे डिसेंबरच्या अखेरीस वाळलेली आहेत. बाजारात कापसाची आवक घटली आहे. कापूस खरेदीदार जिनिंग नियमीतपणे चालू राहावे म्हणून कापसाची वाट पाहत आहेत. एवढे असले तरी सुरुवातीला ५९०० रुपयांपर्यंत असलेला भाव रोहणा बाजारात आता ५३०० पर्यंत खाली आला. रोजची गरज व वेचणीची मजुरी देण्याच्या आवश्यकतेपोटी शेतकºयांना मिळेल त्या भावाने कापूस विकावाच लागतो. कापसाला मार्च, एप्रिल महिन्यात सहा हजार रुपये भाव मिळण्याचे संकेत असून आज मिळेल त्या भावाने शेतकºयांना कापूस विकावा लागत आहे. सुरुवातीला कापसाला हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत असल्याने शासनाला कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्याची गरज पडली नाही. पण आता बाजारातील भाव हमी भावाच्या खाली गेल्यावर शासनाने आपली खरेदी केंद्रे सुरू करून शेतकऱ्यांना हमीभावाचे संरक्षण देणे गरजेचे आहे. पण, त्यादृष्टीने शासनाची कोणतीच हालचाल नाही. निदान तालुका पातळीवर एका खरेदी केंद्राची व्यवस्था ठेवली असती तर व्यापार हाच कापूस हमीभावापेक्षा किमान २५ रू. अधिक देऊन खरेदी करत होते. पण शासनाची ती तयारी नसल्याने खासगी व्यापारी कापूस उत्पादकांची आर्थिक लूट करीत आहे. शासनाने खरेदी केंद्रे सुरू करावीत, शेतमाल हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करू नये, अशी शेतकºयांची मागणी आहे.कापसाला कवडीमोल भाव, तूर पीकही वाळलेचिकणी (जामणी)- चार-पाच दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकºयांच्या शेतात असलेला कापूस ओला झाला. यामुळे कापसाची प्रत घसरली व काही प्रमाणात कापूसही खराब झाला. यामुळे आता निघत असलेला कापूस व्यापारी कवडीमोल भावात मागत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.हल्ली चांगल्या प्रतीचा कापसाला ५ हजार ७००-८०० भाव आहे, तर अवकाळी पावसाने ओला झालेल्या कापसाचे भाव पाच हजार रूपयांपर्यंत असल्याचे शेतकऱ्यांकडून समजते. अवकाळी पावसामुळे भिजलेल्या कापसालासुध्दा योग्य भाव मिळावा, अशी मागणी चिकणी, जामणी, पढेगाव, निमगाव व परिसरातील शेतकरी करीत आहे. ढगाळी वातावरण व तुरळक पावसाने तूर व चणा पिकांवर अळ्यांनी हल्ला चढविला. तर काही शेतातील तूर पीक शेंगा पूर्णत: भरण्यापूर्वी वाळत आहेत. शेंगांतील दाने बारीक होत असल्याने पिकांत घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :cottonकापूस