शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

३० कर्मचाऱ्यांची कृषी केंद्रांवर करडी नजर

By admin | Updated: June 24, 2016 02:11 IST

जिल्ह्यात मान्सूनचे आगमण झाले. ज्या भागात पावसाने हजेरी लावली त्या भागात शेतकऱ्यांनी पेरणीचे नियोजन केले.

जिल्ह्यात नऊ पथके : ८७५ कृषी केंद्र परवानाधारक; काळ्याबाजारावर लक्ष वर्धा : जिल्ह्यात मान्सूनचे आगमण झाले. ज्या भागात पावसाने हजेरी लावली त्या भागात शेतकऱ्यांनी पेरणीचे नियोजन केले. याकरिता बाजारात बियाण्यांची खरेदी करण्याकरिता शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे. या दिवसात कृषी केंद्र चालकांकडून बियाण्यांचा काळाबाजार होण्याची शक्यता आहे. हा काळाबाजार रोखण्याकरिता कृषी विभागाच्यावतीने एकूण नऊ पथके तयार केली आहेत. या पथकात एकूण ३० कर्मचारी असून त्यांचे लक्ष कृषी केंद्रात होत असलेल्या काळाबाजारावर राहणार आहे.अशातच शासकीय बियाणे पुरविणारी कंपनी म्हणून नोंद असलेल्या महाबीजने जिल्ह्यात बियाणे पुरविण्याकरिता असमर्थता दाखविली आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढण्याचे संकेत असताना कृषी विभागाच्यावतीने त्यांना सोयाबीनच्या २५ हजार क्विंटल बियण्यांची मागणी केली होती. मात्र त्यांच्याकडून केवळ आठ हजार क्विंटल बियाणे पुरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना खासगी कंपनीच्या बियाण्यांवरच अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. हंगामाच्या तोंडावर बाजारात बियाणे खरेदीकरिता शेतकऱ्यांची गर्दी होणे स्वाभाविक असताना त्यांची लुट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांकडून प्रत्येक हंगामात एखाद्या विशिष्ट वाणाच्या बियाण्यांची मागणी होते. याचाच लाभ उचलत कृषी केंद्र चालकांकडून त्याची लुट होण्याची शक्यता आहे. शिवाय खतांची लिकींग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर आळा घालण्याकरिता कृषी विभागाकडून विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. बियाण्यांचा होणारा काळाबाजार, खतांची लिंकींग रोखण्याकरिता कृषी विभागाकडून एकूण नऊ पथके तयार तयार करण्यात आली आहेत. यात आठ तालुका स्तरावर तर एक जिल्हास्तरावर कार्यरत राहणार आहे. या पथकात एकूण ३० कर्मचाऱ्यांचा समावेश असून त्यांची नजर जिल्ह्यातील ८७५ कृषी केंद्रावर राहणार आहे. कोणत्याही कृषी केंद्रचालकाकडून बियाणे किंवा खतासंदर्भात शेतकऱ्यांची लूट होत असल्यास त्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.(प्रतिनिधी) गत हंगामात केले होते १७ परवाने निलंबितजिल्ह्यात कार्यरत या पथकाने केलेल्या कारवाईत गत हंगामात १७ परवाने निलंबित करण्यात आले होते. यात खतांचा व्यवसाय करणारे सहा, बियाणे विक्रीचे सहा आणि किटकनाशक विक्री करणाऱ्या पाच व्यावसायिकांचा समावेश आहे. अद्यापही त्यांना नुतनीकरण करणे शक्य झाले नाही. ६९ परवाने रद्दची कारवाई बियाणे व खत विक्री करताना गडबड केलेल्या एकूण ६९ व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्यात आले होते. यात बियाणे विक्रीची २५, खत विक्रीची २० तर किटकनाशक विक्री करणाऱ्या २४ व्यावसायिकांचा समावेश आहे. त्यांना अद्यापही खतांची विक्री करण्याची मुभा देण्यात आली नसल्याची माहिती आहे.