शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

३० कर्मचाऱ्यांची कृषी केंद्रांवर करडी नजर

By admin | Updated: June 24, 2016 02:11 IST

जिल्ह्यात मान्सूनचे आगमण झाले. ज्या भागात पावसाने हजेरी लावली त्या भागात शेतकऱ्यांनी पेरणीचे नियोजन केले.

जिल्ह्यात नऊ पथके : ८७५ कृषी केंद्र परवानाधारक; काळ्याबाजारावर लक्ष वर्धा : जिल्ह्यात मान्सूनचे आगमण झाले. ज्या भागात पावसाने हजेरी लावली त्या भागात शेतकऱ्यांनी पेरणीचे नियोजन केले. याकरिता बाजारात बियाण्यांची खरेदी करण्याकरिता शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे. या दिवसात कृषी केंद्र चालकांकडून बियाण्यांचा काळाबाजार होण्याची शक्यता आहे. हा काळाबाजार रोखण्याकरिता कृषी विभागाच्यावतीने एकूण नऊ पथके तयार केली आहेत. या पथकात एकूण ३० कर्मचारी असून त्यांचे लक्ष कृषी केंद्रात होत असलेल्या काळाबाजारावर राहणार आहे.अशातच शासकीय बियाणे पुरविणारी कंपनी म्हणून नोंद असलेल्या महाबीजने जिल्ह्यात बियाणे पुरविण्याकरिता असमर्थता दाखविली आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढण्याचे संकेत असताना कृषी विभागाच्यावतीने त्यांना सोयाबीनच्या २५ हजार क्विंटल बियण्यांची मागणी केली होती. मात्र त्यांच्याकडून केवळ आठ हजार क्विंटल बियाणे पुरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना खासगी कंपनीच्या बियाण्यांवरच अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. हंगामाच्या तोंडावर बाजारात बियाणे खरेदीकरिता शेतकऱ्यांची गर्दी होणे स्वाभाविक असताना त्यांची लुट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांकडून प्रत्येक हंगामात एखाद्या विशिष्ट वाणाच्या बियाण्यांची मागणी होते. याचाच लाभ उचलत कृषी केंद्र चालकांकडून त्याची लुट होण्याची शक्यता आहे. शिवाय खतांची लिकींग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर आळा घालण्याकरिता कृषी विभागाकडून विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. बियाण्यांचा होणारा काळाबाजार, खतांची लिंकींग रोखण्याकरिता कृषी विभागाकडून एकूण नऊ पथके तयार तयार करण्यात आली आहेत. यात आठ तालुका स्तरावर तर एक जिल्हास्तरावर कार्यरत राहणार आहे. या पथकात एकूण ३० कर्मचाऱ्यांचा समावेश असून त्यांची नजर जिल्ह्यातील ८७५ कृषी केंद्रावर राहणार आहे. कोणत्याही कृषी केंद्रचालकाकडून बियाणे किंवा खतासंदर्भात शेतकऱ्यांची लूट होत असल्यास त्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.(प्रतिनिधी) गत हंगामात केले होते १७ परवाने निलंबितजिल्ह्यात कार्यरत या पथकाने केलेल्या कारवाईत गत हंगामात १७ परवाने निलंबित करण्यात आले होते. यात खतांचा व्यवसाय करणारे सहा, बियाणे विक्रीचे सहा आणि किटकनाशक विक्री करणाऱ्या पाच व्यावसायिकांचा समावेश आहे. अद्यापही त्यांना नुतनीकरण करणे शक्य झाले नाही. ६९ परवाने रद्दची कारवाई बियाणे व खत विक्री करताना गडबड केलेल्या एकूण ६९ व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्यात आले होते. यात बियाणे विक्रीची २५, खत विक्रीची २० तर किटकनाशक विक्री करणाऱ्या २४ व्यावसायिकांचा समावेश आहे. त्यांना अद्यापही खतांची विक्री करण्याची मुभा देण्यात आली नसल्याची माहिती आहे.