शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

३० कर्मचाऱ्यांची कृषी केंद्रांवर करडी नजर

By admin | Updated: June 24, 2016 02:11 IST

जिल्ह्यात मान्सूनचे आगमण झाले. ज्या भागात पावसाने हजेरी लावली त्या भागात शेतकऱ्यांनी पेरणीचे नियोजन केले.

जिल्ह्यात नऊ पथके : ८७५ कृषी केंद्र परवानाधारक; काळ्याबाजारावर लक्ष वर्धा : जिल्ह्यात मान्सूनचे आगमण झाले. ज्या भागात पावसाने हजेरी लावली त्या भागात शेतकऱ्यांनी पेरणीचे नियोजन केले. याकरिता बाजारात बियाण्यांची खरेदी करण्याकरिता शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे. या दिवसात कृषी केंद्र चालकांकडून बियाण्यांचा काळाबाजार होण्याची शक्यता आहे. हा काळाबाजार रोखण्याकरिता कृषी विभागाच्यावतीने एकूण नऊ पथके तयार केली आहेत. या पथकात एकूण ३० कर्मचारी असून त्यांचे लक्ष कृषी केंद्रात होत असलेल्या काळाबाजारावर राहणार आहे.अशातच शासकीय बियाणे पुरविणारी कंपनी म्हणून नोंद असलेल्या महाबीजने जिल्ह्यात बियाणे पुरविण्याकरिता असमर्थता दाखविली आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढण्याचे संकेत असताना कृषी विभागाच्यावतीने त्यांना सोयाबीनच्या २५ हजार क्विंटल बियण्यांची मागणी केली होती. मात्र त्यांच्याकडून केवळ आठ हजार क्विंटल बियाणे पुरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना खासगी कंपनीच्या बियाण्यांवरच अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. हंगामाच्या तोंडावर बाजारात बियाणे खरेदीकरिता शेतकऱ्यांची गर्दी होणे स्वाभाविक असताना त्यांची लुट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांकडून प्रत्येक हंगामात एखाद्या विशिष्ट वाणाच्या बियाण्यांची मागणी होते. याचाच लाभ उचलत कृषी केंद्र चालकांकडून त्याची लुट होण्याची शक्यता आहे. शिवाय खतांची लिकींग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर आळा घालण्याकरिता कृषी विभागाकडून विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. बियाण्यांचा होणारा काळाबाजार, खतांची लिंकींग रोखण्याकरिता कृषी विभागाकडून एकूण नऊ पथके तयार तयार करण्यात आली आहेत. यात आठ तालुका स्तरावर तर एक जिल्हास्तरावर कार्यरत राहणार आहे. या पथकात एकूण ३० कर्मचाऱ्यांचा समावेश असून त्यांची नजर जिल्ह्यातील ८७५ कृषी केंद्रावर राहणार आहे. कोणत्याही कृषी केंद्रचालकाकडून बियाणे किंवा खतासंदर्भात शेतकऱ्यांची लूट होत असल्यास त्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.(प्रतिनिधी) गत हंगामात केले होते १७ परवाने निलंबितजिल्ह्यात कार्यरत या पथकाने केलेल्या कारवाईत गत हंगामात १७ परवाने निलंबित करण्यात आले होते. यात खतांचा व्यवसाय करणारे सहा, बियाणे विक्रीचे सहा आणि किटकनाशक विक्री करणाऱ्या पाच व्यावसायिकांचा समावेश आहे. अद्यापही त्यांना नुतनीकरण करणे शक्य झाले नाही. ६९ परवाने रद्दची कारवाई बियाणे व खत विक्री करताना गडबड केलेल्या एकूण ६९ व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्यात आले होते. यात बियाणे विक्रीची २५, खत विक्रीची २० तर किटकनाशक विक्री करणाऱ्या २४ व्यावसायिकांचा समावेश आहे. त्यांना अद्यापही खतांची विक्री करण्याची मुभा देण्यात आली नसल्याची माहिती आहे.