शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

पशुधन चालले कत्तलखान्याकडे

By admin | Updated: January 25, 2015 23:21 IST

जिल्ह्यात प्रसिद्ध येथील बैलबाजारातून हैदराबाद येथील कत्तलखान्याचे व्यापारी दलालाच्या माध्यमातून शेतीपयोगी व तरूण गोऱ्हे, गायी, म्हशींची सर्रास खरेदी करून कत्तलखान्यात पाठवितात़

समुद्रपूर : जिल्ह्यात प्रसिद्ध येथील बैलबाजारातून हैदराबाद येथील कत्तलखान्याचे व्यापारी दलालाच्या माध्यमातून शेतीपयोगी व तरूण गोऱ्हे, गायी, म्हशींची सर्रास खरेदी करून कत्तलखान्यात पाठवितात़ यामुळे परिसरातील पशुधन संपुष्टात येण्याची भीती वर्तविली जात आहे. परिसरातील शेतकऱ्यांना गुरे राखणे व वैरणाची सोय नसल्याने खर्च झेपत नाही़ यामुळे तालुक्यातील शेतकरी आपली जनावरे बैल बाजारात आणतात़ कसायाव्यतिरिक व्यापारी खरेदीदार राहत नसल्याने नाईलाज म्हणून कवडीमोल भावात ती विकतात़ यामुळे भविष्यात गावराण गायी, बैल संपुष्टात आल्यास पुढील पिढीला चित्रातूनच गावराण गाय दाखवावी लागेल, असे चित्र आहे़१९९४ मध्ये प्रीतीसुधा यांचे समुद्रपूरला आगमन झाले होते. त्यांनी गोमातेचे महत्त्व प्रवचनातून विषद केल्यानंतर प्रेरणा घेत पांडुरंग उजवणे, दिवंगत डॉ. सुधीर खेडूलकर व सहकाऱ्यांनी बाजारातून जनावरे कसायाला विकू नका, असे आवाहन केले होते़ यामुळे पाच वर्षे हा प्रकार बंद होता; पण तो पुन्हा सुरू झाला. समीर कुणावार व आश्रम दात्याच्या सहकार्याने महादेव चौधरी, दिवंगत तोताराम वानकर यांनी पुढाकार घेत गोरक्षण संस्था स्थापन केली. त्यात शेतकरी गायी कसायाला न विकता गौरक्षण संस्थेला देत होते़ ही संस्था तीन वर्षे चांगल्या प्रकारे चालली़ पूढे उत्पन्न शुन्य, वैरण खर्च, गुरे चारण्याची मजुरी वाढली. आश्रमदात्यांनी आर्थिक मदत बंद केल्याने ही संस्था कायमस्वरूपी बंद पडली़ यामुळे नष्ट होणारा गोवंश वाचविण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे़जिल्ह्यातील पशुधन संकटात आले आहे. समुद्रपूर मार्गे आंध्र प्रदेशात जनावरांची तस्करी होत आहे. वैरण टंचाईमुळे पशुधन विक्रीस काढल्या जात असल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देत चाराप्रश्न सोडविल्यास जनावरांना कत्तलखान्याकडे नेण्यापासून वाचविले जाऊ शकत असल्याचे बोलल्या जात आहे.(तालुका प्रतिनिधी)