शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
4
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
5
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
6
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
7
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
8
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
9
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
10
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
11
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
12
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
13
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
14
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
15
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
16
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
17
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
19
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
20
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

पशुधन चालले कत्तलखान्याकडे

By admin | Updated: January 25, 2015 23:21 IST

जिल्ह्यात प्रसिद्ध येथील बैलबाजारातून हैदराबाद येथील कत्तलखान्याचे व्यापारी दलालाच्या माध्यमातून शेतीपयोगी व तरूण गोऱ्हे, गायी, म्हशींची सर्रास खरेदी करून कत्तलखान्यात पाठवितात़

समुद्रपूर : जिल्ह्यात प्रसिद्ध येथील बैलबाजारातून हैदराबाद येथील कत्तलखान्याचे व्यापारी दलालाच्या माध्यमातून शेतीपयोगी व तरूण गोऱ्हे, गायी, म्हशींची सर्रास खरेदी करून कत्तलखान्यात पाठवितात़ यामुळे परिसरातील पशुधन संपुष्टात येण्याची भीती वर्तविली जात आहे. परिसरातील शेतकऱ्यांना गुरे राखणे व वैरणाची सोय नसल्याने खर्च झेपत नाही़ यामुळे तालुक्यातील शेतकरी आपली जनावरे बैल बाजारात आणतात़ कसायाव्यतिरिक व्यापारी खरेदीदार राहत नसल्याने नाईलाज म्हणून कवडीमोल भावात ती विकतात़ यामुळे भविष्यात गावराण गायी, बैल संपुष्टात आल्यास पुढील पिढीला चित्रातूनच गावराण गाय दाखवावी लागेल, असे चित्र आहे़१९९४ मध्ये प्रीतीसुधा यांचे समुद्रपूरला आगमन झाले होते. त्यांनी गोमातेचे महत्त्व प्रवचनातून विषद केल्यानंतर प्रेरणा घेत पांडुरंग उजवणे, दिवंगत डॉ. सुधीर खेडूलकर व सहकाऱ्यांनी बाजारातून जनावरे कसायाला विकू नका, असे आवाहन केले होते़ यामुळे पाच वर्षे हा प्रकार बंद होता; पण तो पुन्हा सुरू झाला. समीर कुणावार व आश्रम दात्याच्या सहकार्याने महादेव चौधरी, दिवंगत तोताराम वानकर यांनी पुढाकार घेत गोरक्षण संस्था स्थापन केली. त्यात शेतकरी गायी कसायाला न विकता गौरक्षण संस्थेला देत होते़ ही संस्था तीन वर्षे चांगल्या प्रकारे चालली़ पूढे उत्पन्न शुन्य, वैरण खर्च, गुरे चारण्याची मजुरी वाढली. आश्रमदात्यांनी आर्थिक मदत बंद केल्याने ही संस्था कायमस्वरूपी बंद पडली़ यामुळे नष्ट होणारा गोवंश वाचविण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे़जिल्ह्यातील पशुधन संकटात आले आहे. समुद्रपूर मार्गे आंध्र प्रदेशात जनावरांची तस्करी होत आहे. वैरण टंचाईमुळे पशुधन विक्रीस काढल्या जात असल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देत चाराप्रश्न सोडविल्यास जनावरांना कत्तलखान्याकडे नेण्यापासून वाचविले जाऊ शकत असल्याचे बोलल्या जात आहे.(तालुका प्रतिनिधी)