शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

वीज भारनियमनाने रात्र शेतातच..!

By admin | Updated: November 8, 2014 22:43 IST

परिसरात वीज वितरण कंपनीने भरदिवसा भारनियमन आणि रात्रीचा वीजपुरवठा देणे सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीला घरी झोपण्याऐवजी शेतात काडीकचऱ्यात पिकांना ओलीत

रोहणा : परिसरात वीज वितरण कंपनीने भरदिवसा भारनियमन आणि रात्रीचा वीजपुरवठा देणे सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीला घरी झोपण्याऐवजी शेतात काडीकचऱ्यात पिकांना ओलीत करण्यासाठी जावे लागत आहे. रात्रीचे ओलीत करण्यासाठी मजूरवर्गही मिळत नसल्याने शेतमालकाला स्वत: रात्रीच्यावेळी ओलीत करण्याची वेळ आली आहे. सविस्तर वृत्त असे की, दोन महिन्याआधी रोहणा परिसरात सोमवार, मंगळवार आणि बुधवार या तीन दिवशी रात्री पावणे बारा ते सकाळी पावणे दहा या वेळात तर गुरुवार ते रविवार या चार दिवशी सकाळी पावणे दहा ते सायंकाळी पावणे सहापर्यंत विद्युत पुरवठा केल्या जात होता. त्यामुळे आठवड्यातील चार दिवस दिवसा तर तीन दिवस सकाळी शेतकरी ओलीत करु शकत होते. दरम्यान वीजवितरण कंपनीने बळीराजाला ओलिताची फार गरज असताना भारनियमन दोन तासांनी वाढविण्याचा निर्णय घेतला. सदर निर्णयाची अंमलबजावणी करताना शेतकऱ्यांना दिवसा अधिकाधिक पुरवठा देण्याऐवजी दिवसाचा वेळ भारनियमनात समाविष्ट करून सोमवार ते बुधवार रात्री पावणे बारा ते सकाळी पावणे आठ यावेळात तर गुरुवार ते रविवारी सकाळी पावणे अकरा ते सायंकाळी पावणेसहा यावेळात विद्युत पुरवठा देणे सुरू केले. त्यामुळे सोम, मंगळ व बुधवार सकाळी पावणे आठ लाच लाईन जात असल्याने हे तीन दिवस ओलीत करणे शक्य होत नाही.याविरूद्ध शेतकऱ्यांनी ओरड केली असता स्थानिक कनिष्ठ अभियंत्याने हा बदल दोन तीन दिवसांसाठीच आहे. लवकरच जुन्याप्रमाणेच विद्युत पुरवठा करण्यात येणार असल्याची थाप मारून शेतकऱ्यांच्या विरोधाची धार कमी केली. पण दोन महिन्याचा काळ उलटला तरी वाढीव भारनियमन कमी करण्यात आले नाही. तसेच सोमवार ते बुधवारला रात्री पावणे बाराऐवजी पावणे दोनला विद्युत पुरवठा सुरू करुन सकाळी पावणे दहापर्यंत विद्युत पुरवठा चालू ठेवला तरी दोन तासांचे वाढीव भारनियमन होते व सकाळी दोन ते तीन तास शेतकरी ओलीतही करू शकतो. पण हा पर्याय देखील कंपनीने स्वीकारला नाही.कंपनीची मानसिकता शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी सुखाने घरी झोपू द्याची नसल्याने अनेक शेतमालकांना आठवड्यातील तीन दिवस रात्रीला ओलीत करावे लागते. शेतात अंधार असतो. जमिनीला भेगा पडल्याने या भेगात सरपटणारे प्राणी असतात. पिकात गवत वाढलेले असते अशावेळी जमिनीतील भेगात पाणी जाताच सरपटणारे प्राणी बाहेर येतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना उत्पन्न होवो अथवा न होवो आम्हाला वाढीव मजुरी द्या अशा मजुरांच्या मानसिकतेमुळे रात्रीला ओलीतासाठी मजूर मिळत नाही. अशा बिकट परिस्थितीत स्वत: शेतमालकाला रात्रीच्या वेळी ओलीतासाठी शेतावर जाण्या शिवाय पर्याय उरला नाही. मान्सून परतीचा पाऊस न आल्याने खरीपातील कापूस, तूर व रब्बीतील गहू व चणा या पिकांना ओलिताची खूप गरज आहे. पण चारही बाजूने आर्थिक कोंडीत सापडलेल्या बळीराजाला विद्युत वितरण कंपनीने कोंडीत पकडण्याच्या मानसिकतेमुळे शेतकरी वैतागला आहे. शेतात सरपटणाऱ्या प्राण्यांशिवाय जंगली श्वापदांचा हैदोसही होत असल्याने जीवितास धोका वाढला आहे. या कारणाने शेतात जागली करण्यासाठी शेतकऱ्यांना मचान बांधून त्यावर रात्र काढावी लागून ओलित करावे लागत आहे. वीजवितरणने शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा व्यवस्थित केल्यास त्यांना रात्रभर शेतात जागली करण्याची वेळ येणार नाही. परंतु वितरणच्या अशा धोरणामुळे शेतकरी पुरता वैतागला आहे. आधीच उत्पादनाची हमी नसल्याने शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेत भारनियमन कमी करण्याची मागणी आहे.(वार्ताहर)