शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

...चला राष्ट्रध्वजाचा सन्मान राखूया !!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशाच्या ध्वजाचा सन्मान करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. असे असले तरी राष्ट्रीय सणानंतर ध्वजांची अवहेलना होत असल्याचे सर्वश्रूत आहे. ध्वजाची अवहेलना टाळण्यास्तव अभियान राबविले जात आहे. वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेने यासाठी जनतेलाही, ‘चला राष्ट्रध्वजाचा सन्मान राखूया’, असे आवाहन केले जात आहे. या अभियानाबाबत माहिती देण्यासाठी ...

ठळक मुद्देवीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे अभियान : माहितीसाठी पोलीस निरीक्षकांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशाच्या ध्वजाचा सन्मान करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. असे असले तरी राष्ट्रीय सणानंतर ध्वजांची अवहेलना होत असल्याचे सर्वश्रूत आहे. ध्वजाची अवहेलना टाळण्यास्तव अभियान राबविले जात आहे. वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेने यासाठी जनतेलाही, ‘चला राष्ट्रध्वजाचा सन्मान राखूया’, असे आवाहन केले जात आहे. या अभियानाबाबत माहिती देण्यासाठी रामनगरचे पोलीस निरीक्षक विजय मगर यांना निवेदन देण्यात आले.भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्या शहिदांनी प्राणांची आहुती दिली, ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी हालअपेष्टा सहन केल्या त्यांच्या बलिदानाचे फलित म्हणजे राष्ट्रध्वज. भातराच्या स्वतंत्र्याचे प्रतिक म्हणजे राष्ट्रध्वज. जाती, धर्म, पंथपेक्षाही श्रेष्ठ असा हा राष्ट्रध्वज; पण या देशाचे व आमचेही दुर्भाग्य की, याच राष्ट्रध्वजाचा अवमान १५ आॅगस्ट व २६ जानेवारी रोजी होतो. कागदी व प्लास्टिकचे राष्ट्रध्वज रस्त्यावर पडून असतात. राष्ट्रध्वजासाठी अनेकांनी आपल्या आयुष्याची होळी केली, तेच राष्ट्रध्वज पडलेले पाहून मन खिन्न झाल्याशिवाय राहत नाही. देशातील सामान्यांनाही राष्ट्रध्वजाचे महत्त्व कळावे, हाच राष्ट्रध्वज सन्मान अभियान राबविण्याचा उद्देश आहे.शहिदांच्या प्राणांचे मोल देऊन आम्ही हा राष्ट्रध्वज फडकवला आहे. राष्ट्रध्वजाच्या रक्षणासाठी देशातील तरूणांनी सीमेवर रक्त सांडले. कित्येक सौभाग्यवतींनी कपाळाचे कुंकू हसत-हसत अर्पण केले. मातांनी तरूण पुत्र ध्वजाच्या तळपत्या तेजाला सहर्ष अर्पण केले. राष्ट्रध्वज हा कोणत्याही राष्ट्राचा प्राण असतो. तो प्राणपणानेच जपला पाहिजे. यासाठी व्हीबीव्हीपीचे १७० विद्यार्थ्यांचे पथक हा उपक्रम राबवित आहे. जिल्ह्यातील नागरिक, शिक्षक, विद्यार्थी, युवक-युवती, खळाडू व राजकीय पक्षातील पदाधिकाºयांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेने केले आहे.पोलीस निरीक्षकांना निवेदन देताना जिल्हाध्यक्ष निरज बुटे, अभियान समितीचे वैष्णवी डाफ, शंतनू भोयर, अजिंक्य मकेश्वर, दुष्यंत ठाकरे, धिरज चव्हाण, शिवम भोयर, हेरॉल्ड डिक्रुझ, लोकेश साहू, निखील ठाकरे, अमोल थोटे, आशू चेर, पलक रोहनकर, कृतिका भोयर, निशा कोटंबकर, रक्षंदा बानोकर यासह पदाधिकारी उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी केला ध्वज सांभाळा संकल्पनाचणगाव - इंडियन मिलिटरी स्कूल पुलगाव येथील विद्यार्थ्यांनी सहायक शिक्षक अतुल वाकडे यांच्या मार्गदर्शनात एक संकल्प केला. १५ आॅगस्ट व २६ जानेवारी या दिवशी असंख्य भारतीय नागरिक राष्ट्रभक्ती म्हणून ध्वज विकत घेतात. हे एक राष्ट्रप्रेमाचे प्रतिक आहे; पण दुसºया दिवशी हे छोटे ध्वज रस्त्यावर पडलेले दिसतात. कचरा कुंडीत दिसतात. असे होऊ नये म्हणून यावर्षी घेतलेले ध्वज सांभाळून ठेवण्याची तसेच ते इतरत्र पडू नये म्हणून महत्त्वाचा संकल्प केला. सर्व नागरिकांना प्रार्थना केली की, ध्वज सांभाळून ठेवा. रस्त्याच्या कडेला ध्वज दिसला तर तो उचला. त्याचा अपमान होऊ देऊ नका. ध्वज विकत घेणे, हे राष्ट्रप्रेम आहे; पण तो सांभाळून ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ध्वज सांभाळा, असा संदेश विद्यार्थ्यांनी दिला असून तसा संकल्प केला आहे.