शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संपाला अत्यल्प प्रतिसाद

By admin | Updated: June 2, 2017 01:59 IST

शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांकरिता राज्यात गुरुवारपासून शेतकऱ्यांनी संप पुकारला. या संपात वर्धेतील

शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीचा खोडा : भाजी बाजारात स्थिती सामान्यलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांकरिता राज्यात गुरुवारपासून शेतकऱ्यांनी संप पुकारला. या संपात वर्धेतील शेतकरी सहभागी होतील असे वाटत असताना शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीमुळे या संपाला विशेष प्रतिसाद नसल्याचे दिसून आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दूध ओतल्याशिवाय दुसरे कोणतेही आंदोलन झाले नाही. तर हिंगणघाट येथे शेतकरी संघटनेच्यावतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना तर आष्टीत तहसीलदारांना स्वाभिमानी संघटनेच्यावतीने या संपात सहभागी होत असल्याचे निवदेन सादर केले. वर्धेत भाजी बाजारात सर्वच व्यवहार सुरळीत होते. राज्यातील शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे. यात सर्वच जिल्ह्यातील शेतकरी सहभागी होतील असे वाटत होते. मात्र शेतकरी आत्महत्यांनी ढवळून निघालेल्या या जिल्ह्यात या संपाचा विशेष परिणाम झाला नसल्याचे दिसून आले आहे. सकाळी भाजी बाजारात या संपाचा परिणात दिसेल असे वाटत असताना सर्वच स्थिती सर्वसामान्य होती. येथे नित्याप्रमाणे सर्व व्यवहार सुरू होत. शेतातून काढण्यात आलेला शेतमाल घरीच सडविणार काय, असे म्हणत बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांचा शेतमाल बाजारात आणला होता. आर्थिक अडचणीचा फटका या शेतकऱ्यांना बसत असल्याने या संपाला त्यांच्याकडून नकार देण्यात आल्याचे देण्यात येत असल्याचे एकंदरीत चित्रावरून दिसून आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओतले १५५ लिटर दूध या संपादरम्यान जिल्ह्यात आंदोलन म्हणून केवळ काही दूध उत्पादकांनी त्यांच्या दुधाची विक्री न करता ते दूध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओतले. या आंदोलनादरम्यान तब्बल १५५ लिटर दूध ओतण्यात आले. या आंदोलनात तळेगाव (टालाटुले) येथील डॉ. यशवंत सुरकार यांनी ६० लिटर दूध फेकले. तर भुगाव येथील निवृत्ती शेवड यांनी ५०, प्रितम नाखले यांनी ३०, दिनेश शास्त्रकार यांनी १५ लिटर दूध कार्यालयासमोर ओतले. शेतकऱ्यांनी सात दिवस संप पुकारल्याने या संपाच्या दिवसात दररोज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येत दूध ओतणार असल्याची माहिती यावेळी शेतकऱ्यांनी दिली. शिवाय शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास यंदाच्या हंगामात शेतीही पडिक ठेणार असल्याचे निवृत्ती शेवडे यावेळी म्हणाले. या आंदोलनात आपचे पप्पी साहू, प्रमोद भोमले सहभागी झाले होते. आंदोलनानंतर विविध मागण्यांचे एक निवदेन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. हिंगणघाट येथे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन राज्यातील शेतकऱ्यांनी आजपासून संप पुकारला आहे. या संपात आपण सहभागी असल्याचे म्हणत शेतकरी संघटना व किसान क्रांतीच्या शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या निवदेनातून विविध मागण्या मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्याची शिफारस त्यांनी केली. शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन पड्या भावात विकावे लागत आहे. शिवाय तुरीचा एफएक्यू घसरत आहे. यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला खर्चावर ५० टक्के लाभ देत दर ठरविण्यात यावे, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, कृषी पंपाच्या देयकातून मुक्ती करावी, शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे, दुधाला ५० रुपये लिटरचा दर द्यावा, हमीभाव कमिटीच्या शिफारशीनुसार हमीभाव जाहीर करावा, आदी मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. निवेदन देतेवेळी शेतकरी संघटनेचे मधुसूदन हरणे, माजी आमदार सरोज काशिकर, प्रा. मधुकर झोटींग, विशाल गौळकार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदनआष्टी तालुक्यातील ग्रामीण भागातील खडकी नरसापूर, वाघोली, सिरसोली येथील शेतकरी गुरुवारपासून संपावर जाणार असल्याचे निवदेन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हा प्रमुख आशिष वाघ यांनी तहसीलदार गजभिये यांना सादर केले. यावेळी तालुका प्रमुख पवन नागपुरे, सागर निमजे, अंकुश ढवले, वैभव सोळंके, संदीप गाडगे, सुधीर पाथरे, ज्ञानेश्वर खैरकार उपस्थित होते.