शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

आर्वी नाका चौक नावापुरताच मोठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2015 02:21 IST

शहरात ऐतिहासिक महत्त्व आणि अनेक बिकट प्रसंग अनुभवलेला चौक म्हणून पाच रस्त्यांच्या आर्वी नाका चौकाची ओळख आहे.

वर्धा : शहरात ऐतिहासिक महत्त्व आणि अनेक बिकट प्रसंग अनुभवलेला चौक म्हणून पाच रस्त्यांच्या आर्वी नाका चौकाची ओळख आहे. १९७३ पासून १९९२-९३ पर्यंत जकात कर नाका, पोलीस चौकी, प्रवासी निवारा व आता आर्वी नाका चौक अशी स्थित्यंतरे पार केलेल्या आर्वी नाक्याने जुनी ओळख हरवली आहे. सध्या हा विस्तीर्ण चौक अतिक्रमण, अव्यवस्था, नियोजनाचा अभाव आणि रहदारीच्या गर्दीत गुदमरत असल्याचे दिसते. या चौकाचे सौंदर्यीकरण कधी होणार, हा प्रश्नच आहे.शहरातील महत्त्वाचा चौक म्हणून आर्वी नाक्याकडे पाहिले जाते. पूर्वी जकात कर वसूल केला जात असे. यासाठी म्हणून या चौकात नाका वसुलीसाठी छोटेखानी खोलीचे बांधकाम करण्यात आले होते. यातून जकात कर वसूल होत होता. १९९२-९३ मध्ये जकात कर वसुली बंद करण्यात आली. यामुळे ही खोली तशीच होती. १९९३-९४ मध्ये या चौकात पोलीस चौकीची निर्मिती करण्यात आली. जकात कर नाक्याच्या खोलीतूनच पोलीस चौकीचा कारभार चालविला जात होता. आर्वी नाका परिसरात पूर्वी शिख समाजाचे वास्तव्य होते. या चौकात चोरी, लुटमार, भांडणे नेहमीचीच झाली होती. यामुळे त्या काळी आर्वी नाका म्हटला की, कुणीही तिकडे जाण्यास धजावत नव्हते. शिवाय शहराची हद्दही संपत असल्याने तेथे पोलीस चौकी स्थापन करण्यात आली होती; पण पोलिसांचे तेथील वादांकडे लक्ष राहत नव्हते. यामुळे एक-दीड वर्षांतच चौकीही हटली. यानंतर २००१ ते २००३ या दरम्यानच्या काळात चौकात प्रवासी निवारा स्थापन करण्यात आला. सुमारे तीन-चार वर्षांच्या काळात म्हणजे २००५-०६ मध्ये तोही हटविण्यात आला. यानंतरही जकात कर नाल्याची खोली तशीच ठेवण्यात आली होती. २००३ नंतर या चौकाचे सौंदर्यीकरण व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुतळ्याचा ठराव पालिकेकडून घेण्यात आला. आर्वी नाका चौकाचे नामकरण करण्याचेही ठरविण्यात आले; पण माशी कुठे शिंकली, हे कळण्यास मार्ग नाही. आजही आर्वी नाका चौकाचे भकास व मागासलेपण सामान्यांना खटकल्याशिवाय राहत नाही. नियोजनाचा अभाव असल्याने सध्या या चौकात अव्यवस्था असून शहराचा आत्माच हरवल्याचे चित्र आहे.