शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

आर्वी नाका चौक नावापुरताच मोठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2015 02:21 IST

शहरात ऐतिहासिक महत्त्व आणि अनेक बिकट प्रसंग अनुभवलेला चौक म्हणून पाच रस्त्यांच्या आर्वी नाका चौकाची ओळख आहे.

वर्धा : शहरात ऐतिहासिक महत्त्व आणि अनेक बिकट प्रसंग अनुभवलेला चौक म्हणून पाच रस्त्यांच्या आर्वी नाका चौकाची ओळख आहे. १९७३ पासून १९९२-९३ पर्यंत जकात कर नाका, पोलीस चौकी, प्रवासी निवारा व आता आर्वी नाका चौक अशी स्थित्यंतरे पार केलेल्या आर्वी नाक्याने जुनी ओळख हरवली आहे. सध्या हा विस्तीर्ण चौक अतिक्रमण, अव्यवस्था, नियोजनाचा अभाव आणि रहदारीच्या गर्दीत गुदमरत असल्याचे दिसते. या चौकाचे सौंदर्यीकरण कधी होणार, हा प्रश्नच आहे.शहरातील महत्त्वाचा चौक म्हणून आर्वी नाक्याकडे पाहिले जाते. पूर्वी जकात कर वसूल केला जात असे. यासाठी म्हणून या चौकात नाका वसुलीसाठी छोटेखानी खोलीचे बांधकाम करण्यात आले होते. यातून जकात कर वसूल होत होता. १९९२-९३ मध्ये जकात कर वसुली बंद करण्यात आली. यामुळे ही खोली तशीच होती. १९९३-९४ मध्ये या चौकात पोलीस चौकीची निर्मिती करण्यात आली. जकात कर नाक्याच्या खोलीतूनच पोलीस चौकीचा कारभार चालविला जात होता. आर्वी नाका परिसरात पूर्वी शिख समाजाचे वास्तव्य होते. या चौकात चोरी, लुटमार, भांडणे नेहमीचीच झाली होती. यामुळे त्या काळी आर्वी नाका म्हटला की, कुणीही तिकडे जाण्यास धजावत नव्हते. शिवाय शहराची हद्दही संपत असल्याने तेथे पोलीस चौकी स्थापन करण्यात आली होती; पण पोलिसांचे तेथील वादांकडे लक्ष राहत नव्हते. यामुळे एक-दीड वर्षांतच चौकीही हटली. यानंतर २००१ ते २००३ या दरम्यानच्या काळात चौकात प्रवासी निवारा स्थापन करण्यात आला. सुमारे तीन-चार वर्षांच्या काळात म्हणजे २००५-०६ मध्ये तोही हटविण्यात आला. यानंतरही जकात कर नाल्याची खोली तशीच ठेवण्यात आली होती. २००३ नंतर या चौकाचे सौंदर्यीकरण व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुतळ्याचा ठराव पालिकेकडून घेण्यात आला. आर्वी नाका चौकाचे नामकरण करण्याचेही ठरविण्यात आले; पण माशी कुठे शिंकली, हे कळण्यास मार्ग नाही. आजही आर्वी नाका चौकाचे भकास व मागासलेपण सामान्यांना खटकल्याशिवाय राहत नाही. नियोजनाचा अभाव असल्याने सध्या या चौकात अव्यवस्था असून शहराचा आत्माच हरवल्याचे चित्र आहे.