शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

समृद्धी महामार्गाकरिता लॅन्ड पुलिंग योजना

By admin | Updated: July 16, 2016 02:21 IST

नागपूर ही राज्याची उपराजधानी असून, देशाचे मध्यवर्ती ठिकाण आहे. नागपूर, अमरावती, औरंगाबाद, ...

शैलेश नवाल : ग्रामीण भागातील आर्थिक विकासाचा दर उंचावणार वर्धा : नागपूर ही राज्याची उपराजधानी असून, देशाचे मध्यवर्ती ठिकाण आहे. नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक या महानगरामध्ये व लगतच्या परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणावर औद्योगिक व वाणिज्यक आस्थापना कार्यरत आहेत. नियोजित नागपूर, मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती मार्ग हा वर्धेतील सेलू, वर्धा व आर्वी तालुक्यातील काही गावांमधून जात आहे. यासाठी संपादित होणाऱ्या जमिनीचा लँड पुलिंग योजनेंतर्गत भूधारकांसाठी भागीदारी देय व अनुज्ञेय लाभ भूधारकास मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कळविले आहे. नियोजित द्रुतगती मार्ग व त्यावरील नवनगरांच्या आखणीमध्ये अंतर्भूत जमीन विना संघर्ष व सत्वर प्राप्त होण्यासाठी नवी मुंबई, आंतरराष्ट्रीय विमानतळ व आंध्रप्रदेशाच्या अमरावती या नूतन राजधानी क्षेत्राच्या लँड पुलिंग योजनेंतर्गत देय व अनुज्ञेय लाभ विचारात घेऊन नियोजित नव नगरामध्ये भूधारकांना संपादित जमिनीच्या मोबदल्यात जिरायत जमिनीकरिता २५ टक्के व बागायत जमिनीकरिता ३० टक्के या प्रमाणात बिनशेती विकसित जमिनी भूखंड देण्यात येईल. त्यामुळे भूधारकांना या बिनशेती विकसित जमीन भूखंडावर त्या नव नगरांच्या विकास आराखड्यानुसार अनुज्ञेय चटाई क्षेत्र निर्देशांकासह रहिवास वाणिज्यक वापर करता येईल. यामुळे नागरिकांनी अनेक फायदे होणार असल्याचे शासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. अधिनियम २०१३ प्रमाणे मोबदला भूधारकास विकसित बिनशेती भूखंड दिला जाणार आहे. या भूखंडाला १० वर्षानंतर त्यांच्या योग्य बाजारमुल्य भूधारकास प्राप्त होत नसेल तर त्या भूखंडासाठी आत्ताचा भूमी संपादक अधिनियम २०१३ प्रमाणे परिगणित भूधारकास मोबदला व त्यावर प्रतिवर्ष नऊ टक्के दराने सरळ व्याज दहा वर्षासाठी परिगणित करून देण्यात येत आहे. त्याच रकमेत असा भूखंड शासन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र शासनाने प्रधिकृत केलेले प्राधिकरण पुन्हा खरेदी करेल. द्रुतगती मार्ग व त्यावरील नव नगरांच्या आखाणीमध्ये अंतभूर्त जिल्हे, तालुक्यातील जमिनी प्रामुख्याने जिरायत, वरकस हलक्या व कोरडवाहून स्वरूपाच्या आहे. काही जमिनी बागायती स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे भूधारकांना जमिनीचा ताबा शासनाकडे वार्षिक अनुज्ञेय अनुदान प्रती वर्षी पुढील १० वर्षांकरिता जिरायत जमिनीकरिता प्रती हेक्टर ५० हजार रुपये व बागायत जमिनीकरिता प्रती हेक्टरी एक लाख रुपये देण्यात येणार आहे.