शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

समृद्धी महामार्गाकरिता लॅन्ड पुलिंग योजना

By admin | Updated: July 16, 2016 02:21 IST

नागपूर ही राज्याची उपराजधानी असून, देशाचे मध्यवर्ती ठिकाण आहे. नागपूर, अमरावती, औरंगाबाद, ...

शैलेश नवाल : ग्रामीण भागातील आर्थिक विकासाचा दर उंचावणार वर्धा : नागपूर ही राज्याची उपराजधानी असून, देशाचे मध्यवर्ती ठिकाण आहे. नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक या महानगरामध्ये व लगतच्या परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणावर औद्योगिक व वाणिज्यक आस्थापना कार्यरत आहेत. नियोजित नागपूर, मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती मार्ग हा वर्धेतील सेलू, वर्धा व आर्वी तालुक्यातील काही गावांमधून जात आहे. यासाठी संपादित होणाऱ्या जमिनीचा लँड पुलिंग योजनेंतर्गत भूधारकांसाठी भागीदारी देय व अनुज्ञेय लाभ भूधारकास मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कळविले आहे. नियोजित द्रुतगती मार्ग व त्यावरील नवनगरांच्या आखणीमध्ये अंतर्भूत जमीन विना संघर्ष व सत्वर प्राप्त होण्यासाठी नवी मुंबई, आंतरराष्ट्रीय विमानतळ व आंध्रप्रदेशाच्या अमरावती या नूतन राजधानी क्षेत्राच्या लँड पुलिंग योजनेंतर्गत देय व अनुज्ञेय लाभ विचारात घेऊन नियोजित नव नगरामध्ये भूधारकांना संपादित जमिनीच्या मोबदल्यात जिरायत जमिनीकरिता २५ टक्के व बागायत जमिनीकरिता ३० टक्के या प्रमाणात बिनशेती विकसित जमिनी भूखंड देण्यात येईल. त्यामुळे भूधारकांना या बिनशेती विकसित जमीन भूखंडावर त्या नव नगरांच्या विकास आराखड्यानुसार अनुज्ञेय चटाई क्षेत्र निर्देशांकासह रहिवास वाणिज्यक वापर करता येईल. यामुळे नागरिकांनी अनेक फायदे होणार असल्याचे शासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. अधिनियम २०१३ प्रमाणे मोबदला भूधारकास विकसित बिनशेती भूखंड दिला जाणार आहे. या भूखंडाला १० वर्षानंतर त्यांच्या योग्य बाजारमुल्य भूधारकास प्राप्त होत नसेल तर त्या भूखंडासाठी आत्ताचा भूमी संपादक अधिनियम २०१३ प्रमाणे परिगणित भूधारकास मोबदला व त्यावर प्रतिवर्ष नऊ टक्के दराने सरळ व्याज दहा वर्षासाठी परिगणित करून देण्यात येत आहे. त्याच रकमेत असा भूखंड शासन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र शासनाने प्रधिकृत केलेले प्राधिकरण पुन्हा खरेदी करेल. द्रुतगती मार्ग व त्यावरील नव नगरांच्या आखाणीमध्ये अंतभूर्त जिल्हे, तालुक्यातील जमिनी प्रामुख्याने जिरायत, वरकस हलक्या व कोरडवाहून स्वरूपाच्या आहे. काही जमिनी बागायती स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे भूधारकांना जमिनीचा ताबा शासनाकडे वार्षिक अनुज्ञेय अनुदान प्रती वर्षी पुढील १० वर्षांकरिता जिरायत जमिनीकरिता प्रती हेक्टर ५० हजार रुपये व बागायत जमिनीकरिता प्रती हेक्टरी एक लाख रुपये देण्यात येणार आहे.