शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातून कोटंबा, बाजारवाडा ठरलेय सुंदर ग्राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 05:00 IST

जिल्हा परिषदेच्या सभागृहात महात्मा गांधी स्वच्छग्राम स्पर्धा, आर. आर. पाटील सुंदर ग्राम स्पर्धा आणि आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्याला जिल्हा परिषदच्या अध्यक्षा सरिता विजय गाखरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, उपाध्यक्ष वैशाली येरावार, सभापती मृणाल माटे, सरस्वती मडावी, माधव चंदनखेडे, जिल्हा परिषद सदस्य धनराज तेलंग, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, वित्त व लेखा अधिकारी सदाशिव शेळके यांची उपस्थिती होती. 

ठळक मुद्देदोन्ही ग्रामपंचायतींना मिळाला प्रत्येकी २० लाखांचा पुरस्कार : जिल्हा परिषदेच्या सभागृहात रंगलाय वितरण सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गावातील स्वच्छता व्यवस्थापन, दायित्व, अपारंपारिक उर्जा, पर्यावरण, पादर्शकता आणि तंत्रज्ञानाचा वापर करुन स्मार्ट गाव बनविणाऱ्या ग्रामपंचायतींना आर.आर.पाटील (आबा) सुंदर ग्राम पुरस्काराने सन्मानित केले जाते. या स्पर्धेत तालुकास्तरावर बाजी मारुन जिल्हा स्तरावर पोहोचलेल्या ग्रामपंचायतीला ४० लाखांचा पुरस्कार दिला जातो. २०१९-२० चा जिल्हास्तरीय आर. आर. पाटील (आबा) सुंदर ग्राम पुरस्कार सेलू तालुक्यातील कोटंबा आणि आर्वी तालुक्यातील बाजारवाडा ग्रामपंचायतीने पटकाविला असून दोन्ही ग्रामपंचायतीला २०-२० लाखांचा पुरस्कार विभागून देण्यात आला.जिल्हा परिषदेच्या सभागृहात महात्मा गांधी स्वच्छग्राम स्पर्धा, आर. आर. पाटील सुंदर ग्राम स्पर्धा आणि आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्याला जिल्हा परिषदच्या अध्यक्षा सरिता विजय गाखरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, उपाध्यक्ष वैशाली येरावार, सभापती मृणाल माटे, सरस्वती मडावी, माधव चंदनखेडे, जिल्हा परिषद सदस्य धनराज तेलंग, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, वित्त व लेखा अधिकारी सदाशिव शेळके यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या ग्रामपंचायतच्या सरपंच आणि ग्रामसेवकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन अविनाश गोहाड यांनी केले तर आभार सेलूचे सहायक गटविकास अधिकारी शालीग्राम पडघन यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक व सदस्य उपस्थित होते. 

तालुकास्तरीय सुंदर ग्रामला मिळाला दहा लाखांचा पुरस्कारआर.आर. पाटील सुंदर ग्राम स्पर्धेत जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतीने भाग घेतला होता. यामध्ये तालुक्यातून प्रथम आलेल्या ग्रामपंचायतींना दहा लाखांचा पुरस्कार देण्यात आला. यात वर्धा तालुक्यातील महाकाळ, देवळीतील इंझाळा, समुद्रपुरातील पाठर, हिंगणघाटातील सावली (वाघ), आर्वीतील बाजारवाडा, सेलुतील कोटंबा, आष्टीतील नवीन आष्टी तर कारंजातील पांजरा (गोंडी) या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. यातील जिल्हास्तरावर प्रथम आलेल्या ग्रामपंचायतीला ४० लाखांचा पुरस्कार आहे. याकरिता कोटंबा आणि बाजारवाडा या दोन्ही ग्रामपंचायती पात्र ठरल्यात.

जिल्हा स्वच्छ ग्राम स्पर्धेत रसुलाबाद ग्रामपंचायत प्रथमराष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त यावर्षी महात्मा गांधी स्वच्छ ग्राम स्पर्धा राबविण्यात आली. या स्पर्धेकरिता प्रत्येक तालुक्यातील एक ग्रामपंचायत निवडण्यात आली असून त्या ग्रामपंचायतीला एक लाखाचा पुरस्कार देण्यात आला. यात तालुकास्तरावर आर्वी तालुक्यातील रसुलाबाद, आष्टीतील आनंदवाडी, देवळीतील कोळोणा (घोडे), हिंगणघाटमधील मुरपाड (मनोरा), कारंजातील पांजरा (गोंडी), सेलूतील धानोली (मेघे), समुद्रपुरातील पाठर आणि वर्धा तालुक्यातील महाकाळ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यापैकी रसुलाबाद ग्रामपंचायत ही जिल्ह्यातून प्रथम, आनंदवाडी द्वितीय तर महाकाळ ग्रामपंचायत तृतीय स्थानी आहे. या तिन्ही ग्रामपंचायतींना अनुक्रमे पाच लाख, तीन लाख व दोन लाखांचा पुरस्कार देण्यात आला.  

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत