शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

खीर शिजवून केले नोटबंदीचे वर्षश्राद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 00:35 IST

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी काँगे्रसद्वारे खीर शिजवून नोटबंदीचे वर्षश्राद्ध करीत निर्णयाचा निषेध नोंदविला.

ठळक मुद्देकाँग्रेसचे अनोखे आंदोलन : महागाई, गॅस सिलिंडरची दरवाढ व शेतकºयांच्या समस्यांकडे वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी काँगे्रसद्वारे खीर शिजवून नोटबंदीचे वर्षश्राद्ध करीत निर्णयाचा निषेध नोंदविला. यावेळी आंदोलकांनी वाढती महागाई, गॅस सिलिंडरची दरवाढ आणि शेतकºयांच्या विविध समस्यांकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. आंदोलन महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस, आ. रणजीत कांबळे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.केंद्रातील भाजपा सरकारने काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयाला एक वर्षाचा कालावधी लोटला; पण नोटबंदीचा सांगितलेला उद्देश पूर्ण होताना दिसत नाही. नोटबंदीचा निर्णय घेऊन सर्वसामान्य नागरिकांच्या केवळ अडचणीत वाढ करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. काँगे्रसद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी १ वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, आंदोलकांनी केंद्र व राज्य सरकारच्या जनसामान्य विरोधी धोरणांच्या निषेधार्थ खीर शिजविण्यात आली. याप्रसंगी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस, आ. रणजीत कांबळे यांच्यासह काही मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर आंदोलकांच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर केले. आंदोलनात महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष हेमलता मेघे, माजी जि.प. अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे, विजय जयस्वाल, देवळीचे नगरसेवक सुनील बासू, गौतम पोपटकर, सुरेश वैद्य, मनोज चौधरी, बाबू टोणपे, मनीष साहू, बालू महाजन, बाबाराव पाटील, शेखर शेंडे, इक्राम हुसेन यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.राज्य सरकार शेतकरी, सामान्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाहीविरोधात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकºयांच्या शेतमालाला योग्य भाव द्यावा, या मागणीसाठी विविध आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरले होते; पण सत्तेत आल्यावर त्यांच्यात काहीसा बदल झाला आहे. ते शेतकरी व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याकडे कानाडोळा करीत असून गंभीर नाहीत. नोटबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांनाच सर्वाधिक त्रास सहन करावा लागला. सध्या सोयाबीन व कपाशीला योग्य भाव देण्यात यावा, अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे; पण त्याकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत आहे. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ केली जात असल्याने गृहिणींना याचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. वाढती महागाईवर अंकूश लावण्यासाठी आणि शेतकºयांना दिलासा देण्यासाठी सरकारने तात्काळ योग्य पावले उचलावित, अशी मागणी यावेळी मनोगत व्यक्त करताना आ. रणजीत कांबळे यांनी केली.राष्ट्रवादी युवक काँगे्रसचे धरणे, मृतकांना श्रद्धांजलीनोटबंदीला ८ नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झाले. एक वर्षापूर्वी पंतप्रधानांनी रात्री नोटाबंदीचा निर्णय घेऊन ५०० व १००० रुपयांच्या चलनातील नोटा बाद केल्या. भ्रष्टाचाराला लगाम लागावा व काळा पैसा बाहेर यावा, नकली नोटा बाहेर याव्या, दहशतवाद्यांना पुरवठा होणारा पैसा थांबावा हा त्यामागील उद्देश होता; पण तो सफल झाला नाही. या निर्णयाविरूद्ध राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शिवाजी चौकात काळ्या फिती लावून निषेध केला. शिवाय जीव गमविलेल्या १२० जणांना रायुकाँने श्रद्धांजली अर्पण केली.नोटबंदीचा निर्णय सामान्यांचा जीव घेणारा ठरला. यामुळे बँक कर्मचाºयांचा बळी तर गेलाच; पण सामान्यांच्या आर्थिक परिस्थितीवर घाला घातला गेला. निर्णयाचा उद्देश सफल झाला नाही. उलट देशाच्या आर्थिक परिस्थितीवर विपरित परिणाम झाला. नोटबंदीमुळे सामान्य जनता देशोधडीला लागली. शेतकरी, कष्टकरी, कामगार, व्यापारी असे सर्व घटक अडचणीत आले. उद्योगधंदे बंद पडले असून युवकांना नोकरीस मुकावे लागले. परिणामी, बेरोजगारांचे प्रमाण वाढून निर्णयाने काहीही साध्य झाले नाही.देशाची अर्थव्यवस्था या निर्णयामुळे कमकुवत झाली. एक वर्ष पूर्ण होऊनही ती पूर्वपदावर आली नाही. नोटबंदीमुळे सरकार तोंडघशी पडले असून अपयश झाकण्यासाठी जाहिरातीच्या माध्यमातून यशस्वी झाल्याचा कांगावा करीत आहे, असे मत धरणे आंदोलनात महिला अध्यक्ष शरयू वांदिले, पं.स. सदस्य संदीप किटे, प्रफुल्ल मोरे, अंबादास वानखेडे, विनय डहाके, उत्कर्ष देशमुख, सोनल ठाकरे, राहुल घोडे यांनी व्यक्त केले. आंदोलनात संजय काकडे, विक्की खडसे, डॉ. कोल्हे, शारदा केने, विणा दाते, निखिल येलमुले, राहुल घोडे, वैेभव चन्ने, संदीप पाटील, नयन खंगार, अमित लुंगे, संकेत निस्ताने आदी सहभागी झाले होते.