शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

खरीप हंगाम अर्ध्यावर; पण राज्य सहकारी बँकेकडून कर्जवाटप नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 12:38 IST

खरीप हंगाम अर्ध्यावर आला तरीही राज्य सहकारी बँकेला कर्ज वाटपाचा मुहूर्त सापडला नसल्याने पीककर्जाकरिता शेतकऱ्यांची फरफट सुरूच आहे.

ठळक मुद्देशासन आदेश ठरतोय दिवास्वप्नचपीककर्जाकरिता शेतकऱ्यांची फरफट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांच्या हितासाठी बुलढाणा, वर्धा आणि नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये राज्य सहकारी बँकेने बीसी मॉडेल सुरू करुन शेतकऱ्यांना तत्काळ कर्जपुरवठा सुरू करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. परंतु, आता खरीप हंगाम अर्ध्यावर आला तरीही राज्य सहकारी बँकेला कर्ज वाटपाचा मुहूर्त सापडला नसल्याने पीककर्जाकरिता शेतकऱ्यांची फरफट सुरूच आहे.बुलढाणा, वर्धा आणि नागपूर या अडचणीत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये बीसी मॉडेल सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सहकारी बँकेने दोन दिवसंत नाबार्डकडे पाठवावा. नाबार्डने शेतकऱ्यांच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घेऊन या प्रस्तावाला तत्काळ मंजुरी द्यावी. या तिन्ही बँकांनी शेतकऱ्यांना तत्काळ कर्जपुरवठा सुरू करता यावा यासाठी अडचणीवर मार्ग काढून राज्य सहकारी बँक आणि नाबार्ड यांच्याशी समन्वय साधावा, अशाही सूचना मुख्यमंत्र्यांनी बँकाच्या अडचणीसंदर्भातील बैठकीत दिल्या होत्या. पण, आता अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लोटला तरीही राज्य सहकारी बँकांच्या शाखाही सुरू झाल्या नाहीत. वर्ध्यातही अद्याप राज्य सहकारी बँकेचे काम पूर्णत्वास गेले नसल्याने कर्जवाटप सुरू झाले नाही. परिणामी, सहकारी बँकेतून कर्जवाटप हे शेतकऱ्यांसाठी दिवास्वप्नच ठरल्याची ओरड होत आहे.

जिल्ह्यात केवळ २५ टक्केच कर्जवाटपशेतकऱ्यांच्या हंगामापूर्वी पीककर्ज उपलब्ध करून देणे गरजेचे असताना वर्धा जिल्ह्यात खरीप हंगाम अर्ध्यावर आला तरीही राष्ट्रीयीकृत बँकेने अद्याप शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून दिले नसल्याने शेतकऱ्यांना सावकराच्या दारात उभे राहावे लागले. आतापर्यंत राष्ट्रीयीकृत बँकेकडून जिल्ह्यात केवळ २५ टक्केच पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे ही टक्केवारी या दुष्काळी परिस्थितीत भुवया उंचावणारी ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना राज्य सहकारी बँकेमुळे दिलासा मिळण्याची शक्यता होती. पण, आता ही आशाही धूसर झाल्याचे चिन्ह आहे.

जिल्हा प्रशासनाचा कारवाईकडे कानाडोळाशेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय असताना राष्ट्रीयकृत बँकांनी तत्काळ कर्ज उपलब्ध करुन द्यावे. ज्या बँका शासनाच्या योजनांना मदत करणार नाही त्या बँकांना शासनही मदत करणार नाही. कर्जपुरवठा करत नसेल त्या बँकातील शासकीय खाते गोठवा, असे आदेश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महिनाभरापूर्वी झालेल्या पहिल्या आढावा बैठकीत दिल्या होत्या. परंतु, अद्याप जिल्हा प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली झाल्या नसल्यामुळे शेतकऱ्यांची फरपट तर बँकांची मुजोरी कायम आहे.

टॅग्स :agricultureशेती