शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
5
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
6
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
7
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
8
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
9
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
10
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
11
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
12
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
13
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
14
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
15
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
16
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
17
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
18
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
19
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
20
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"

खरीप हंगाम अर्ध्यावर; पण राज्य सहकारी बँकेकडून कर्जवाटप नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 12:38 IST

खरीप हंगाम अर्ध्यावर आला तरीही राज्य सहकारी बँकेला कर्ज वाटपाचा मुहूर्त सापडला नसल्याने पीककर्जाकरिता शेतकऱ्यांची फरफट सुरूच आहे.

ठळक मुद्देशासन आदेश ठरतोय दिवास्वप्नचपीककर्जाकरिता शेतकऱ्यांची फरफट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांच्या हितासाठी बुलढाणा, वर्धा आणि नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये राज्य सहकारी बँकेने बीसी मॉडेल सुरू करुन शेतकऱ्यांना तत्काळ कर्जपुरवठा सुरू करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. परंतु, आता खरीप हंगाम अर्ध्यावर आला तरीही राज्य सहकारी बँकेला कर्ज वाटपाचा मुहूर्त सापडला नसल्याने पीककर्जाकरिता शेतकऱ्यांची फरफट सुरूच आहे.बुलढाणा, वर्धा आणि नागपूर या अडचणीत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये बीसी मॉडेल सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सहकारी बँकेने दोन दिवसंत नाबार्डकडे पाठवावा. नाबार्डने शेतकऱ्यांच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घेऊन या प्रस्तावाला तत्काळ मंजुरी द्यावी. या तिन्ही बँकांनी शेतकऱ्यांना तत्काळ कर्जपुरवठा सुरू करता यावा यासाठी अडचणीवर मार्ग काढून राज्य सहकारी बँक आणि नाबार्ड यांच्याशी समन्वय साधावा, अशाही सूचना मुख्यमंत्र्यांनी बँकाच्या अडचणीसंदर्भातील बैठकीत दिल्या होत्या. पण, आता अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लोटला तरीही राज्य सहकारी बँकांच्या शाखाही सुरू झाल्या नाहीत. वर्ध्यातही अद्याप राज्य सहकारी बँकेचे काम पूर्णत्वास गेले नसल्याने कर्जवाटप सुरू झाले नाही. परिणामी, सहकारी बँकेतून कर्जवाटप हे शेतकऱ्यांसाठी दिवास्वप्नच ठरल्याची ओरड होत आहे.

जिल्ह्यात केवळ २५ टक्केच कर्जवाटपशेतकऱ्यांच्या हंगामापूर्वी पीककर्ज उपलब्ध करून देणे गरजेचे असताना वर्धा जिल्ह्यात खरीप हंगाम अर्ध्यावर आला तरीही राष्ट्रीयीकृत बँकेने अद्याप शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून दिले नसल्याने शेतकऱ्यांना सावकराच्या दारात उभे राहावे लागले. आतापर्यंत राष्ट्रीयीकृत बँकेकडून जिल्ह्यात केवळ २५ टक्केच पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे ही टक्केवारी या दुष्काळी परिस्थितीत भुवया उंचावणारी ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना राज्य सहकारी बँकेमुळे दिलासा मिळण्याची शक्यता होती. पण, आता ही आशाही धूसर झाल्याचे चिन्ह आहे.

जिल्हा प्रशासनाचा कारवाईकडे कानाडोळाशेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय असताना राष्ट्रीयकृत बँकांनी तत्काळ कर्ज उपलब्ध करुन द्यावे. ज्या बँका शासनाच्या योजनांना मदत करणार नाही त्या बँकांना शासनही मदत करणार नाही. कर्जपुरवठा करत नसेल त्या बँकातील शासकीय खाते गोठवा, असे आदेश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महिनाभरापूर्वी झालेल्या पहिल्या आढावा बैठकीत दिल्या होत्या. परंतु, अद्याप जिल्हा प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली झाल्या नसल्यामुळे शेतकऱ्यांची फरपट तर बँकांची मुजोरी कायम आहे.

टॅग्स :agricultureशेती