शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

खरीप हंगाम अर्ध्यावर; पण राज्य सहकारी बँकेकडून कर्जवाटप नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 12:38 IST

खरीप हंगाम अर्ध्यावर आला तरीही राज्य सहकारी बँकेला कर्ज वाटपाचा मुहूर्त सापडला नसल्याने पीककर्जाकरिता शेतकऱ्यांची फरफट सुरूच आहे.

ठळक मुद्देशासन आदेश ठरतोय दिवास्वप्नचपीककर्जाकरिता शेतकऱ्यांची फरफट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांच्या हितासाठी बुलढाणा, वर्धा आणि नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये राज्य सहकारी बँकेने बीसी मॉडेल सुरू करुन शेतकऱ्यांना तत्काळ कर्जपुरवठा सुरू करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. परंतु, आता खरीप हंगाम अर्ध्यावर आला तरीही राज्य सहकारी बँकेला कर्ज वाटपाचा मुहूर्त सापडला नसल्याने पीककर्जाकरिता शेतकऱ्यांची फरफट सुरूच आहे.बुलढाणा, वर्धा आणि नागपूर या अडचणीत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये बीसी मॉडेल सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सहकारी बँकेने दोन दिवसंत नाबार्डकडे पाठवावा. नाबार्डने शेतकऱ्यांच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घेऊन या प्रस्तावाला तत्काळ मंजुरी द्यावी. या तिन्ही बँकांनी शेतकऱ्यांना तत्काळ कर्जपुरवठा सुरू करता यावा यासाठी अडचणीवर मार्ग काढून राज्य सहकारी बँक आणि नाबार्ड यांच्याशी समन्वय साधावा, अशाही सूचना मुख्यमंत्र्यांनी बँकाच्या अडचणीसंदर्भातील बैठकीत दिल्या होत्या. पण, आता अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लोटला तरीही राज्य सहकारी बँकांच्या शाखाही सुरू झाल्या नाहीत. वर्ध्यातही अद्याप राज्य सहकारी बँकेचे काम पूर्णत्वास गेले नसल्याने कर्जवाटप सुरू झाले नाही. परिणामी, सहकारी बँकेतून कर्जवाटप हे शेतकऱ्यांसाठी दिवास्वप्नच ठरल्याची ओरड होत आहे.

जिल्ह्यात केवळ २५ टक्केच कर्जवाटपशेतकऱ्यांच्या हंगामापूर्वी पीककर्ज उपलब्ध करून देणे गरजेचे असताना वर्धा जिल्ह्यात खरीप हंगाम अर्ध्यावर आला तरीही राष्ट्रीयीकृत बँकेने अद्याप शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून दिले नसल्याने शेतकऱ्यांना सावकराच्या दारात उभे राहावे लागले. आतापर्यंत राष्ट्रीयीकृत बँकेकडून जिल्ह्यात केवळ २५ टक्केच पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे ही टक्केवारी या दुष्काळी परिस्थितीत भुवया उंचावणारी ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना राज्य सहकारी बँकेमुळे दिलासा मिळण्याची शक्यता होती. पण, आता ही आशाही धूसर झाल्याचे चिन्ह आहे.

जिल्हा प्रशासनाचा कारवाईकडे कानाडोळाशेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय असताना राष्ट्रीयकृत बँकांनी तत्काळ कर्ज उपलब्ध करुन द्यावे. ज्या बँका शासनाच्या योजनांना मदत करणार नाही त्या बँकांना शासनही मदत करणार नाही. कर्जपुरवठा करत नसेल त्या बँकातील शासकीय खाते गोठवा, असे आदेश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महिनाभरापूर्वी झालेल्या पहिल्या आढावा बैठकीत दिल्या होत्या. परंतु, अद्याप जिल्हा प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली झाल्या नसल्यामुळे शेतकऱ्यांची फरपट तर बँकांची मुजोरी कायम आहे.

टॅग्स :agricultureशेती