शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

काटोलकरला अटक करणारच!

By admin | Updated: October 12, 2015 02:20 IST

येथील जिल्हा परिषदेत झालेल्या कथित विशेष शिक्षक भरती प्रक्रीयेत भ्रष्टाचाराचा आरोप असलेला शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकरला जामीन देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला.

ठाणेदारांची माहिती : शिक्षक पदभरती घोटाळा प्रकरणवर्धा : येथील जिल्हा परिषदेत झालेल्या कथित विशेष शिक्षक भरती प्रक्रीयेत भ्रष्टाचाराचा आरोप असलेला शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकरला जामीन देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. यामुळे आता त्याला अटक होणे अटळ आहे. मात्र वर्धा शहर पोलिसांकडून त्याच्या अटकेसंदर्भात हयगय होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे सदर प्रकरणात शहर पोलीस मॅनेज झाल्याची चर्चा जि.प.च्या आवारात जोर धरत आहे. मात्र काटोलकरला अटक करणारच असे शहर पोलिसांकडून सांगण्यात आले आहे जिल्हा परिषदेत सर्व शिक्षा अभियानात झालेल्या विशेष शिक्षक भरती प्रक्रीयेत शिक्षणाधिकाऱ्याने उत्तर पत्रिका बदलविल्याची तक्रार जि.प. मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांनी शहर पोलिसात केली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकरने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासंदर्भात अर्ज दाखल केला होता. तो न्यायालयाने फेटाळला. यामुळे त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका दाखल केली. तिथेही जामीन मिळणार नसल्याचे दिसून आल्याने त्याने गुरुवारी याचिका मागे घेतली. यामुळे आता काटोलकर याची अटक अटळ आहे.तपासाकरिता जिल्हा न्यायालयात त्याची याचिका रद्द करण्याची मागणी करणारे वर्धा पोलीस आता मात्र त्याच्या अटकेसंदर्भात गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे पोलीस काटोलकरच्या प्रकरणात मॅनेज झाल्याची चर्चा जि.प.च्या आवारात आहे. या संदर्भात शहर ठाण्याचे निरीक्षक बुराडे यांना विचारले असता त्यांनी सध्या शहरात नवरात्रोत्सवाचा बंदोबस्त असल्यामुळे याकडे विशेष लक्ष नाही. अशातही थांगपत्ता लागताच त्याला अटक करण्यात येईल, असे ते म्हणाले. काटोलकरला पोलीस केव्हा अटक करतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)