शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्गठनाच्या नावावर शेतकऱ्यांची थट्टा

By admin | Updated: June 24, 2016 02:13 IST

पावसाच्या सरी आल्या आणि शेतकरी लगबगीने कामाला लागला. काहींनी कपाशीची तर अनेकांनी सोयाबीनची तजवीज केली.

बँकांची मनमानी: लाखोंच्या शेतीमालकाला अपमानास्पद वागणूकसेलू : पावसाच्या सरी आल्या आणि शेतकरी लगबगीने कामाला लागला. काहींनी कपाशीची तर अनेकांनी सोयाबीनची तजवीज केली. ज्यांची आर्थिक क्षमता नाही व कृषी केंद्र चालक उधार देत नाही, त्यांनी बँकेत चकरा मारणे सुरूच आहे. त्यांच्या कर्जाचे पुनर्गठन नाकारून त्यांच्यावर बँकेचे अधिकारी खेकसावून धावत आहेत. शासनाच्या घोषणा ऐकायला गोड असल्या तरी कृतीत मात्र अतिशय कडू असल्याचे दिसत आहे. बँकेचे अधिकारी फक्त मागील वर्षीचे कर्ज थकीत आहे, त्यांचेच पुनर्गठन करून देत आहेत. इतरांशी बँक धड बोलालाही तयार नाही. बँकांच्या या व्यवहारामुळे शेतकऱ्यांची ऐन हंगामात घुमसट सुरू झाली आहे. गाठीला काहीच नसल्याने पेरण्या कशा कराव्या, या संकटात शेतकरी सापडला आहे. सततच्या नापिकीने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती एकदम खालावली आहे. उत्पन्न व खर्चाचा मेळ लागत नसल्याने कोणतेही कार्य शेवटास जात नाही. कर्जाचा डोंगर मात्र वाढत आहे. बँकेतून कर्जाचे पुनर्गठन होईल, या आशेवर शेतकरी आवश्यक कागदपत्रे घेवून बँकेत गेल्यावर तेथील अधिकारी व कर्मचारी त्यांच्याकडे ढुंकूनही पहायला तयार नाही, याचा अनुभव त्यांना आला. लाखो रुपये किंमतीची जमीन असताना बँकेत हजाराचीही पत नसल्याचे शेतकऱ्यांना वाटत आहे. शेतकऱ्यांना राष्ट्रीयत बँका अंगावर खेकसत अक्षरशा हातधरून बाहेर काढण्याची भाषा करीत असल्याचे डोळ्यात पाणी आणून शेतकरी सांगत आहेत. कर्जपुनर्गठन फक्त मागील वर्षी थकीत खातेदारांचेच केल्या जात आहे. इतरांना वरिष्ठ स्तरावरून आदेश नसल्याचे सांगितल्या जाते. वर्धा जिल्ह्यातील काही ठिकाणच्या राष्ट्रीयकृत बँकेकडून थकीत कर्जदारांचे ही कर्ज पुनर्गठीत करून त्याला कर्ज दिल्या जात आहे; मात्र सेलूच्या बँका कानावर हात ठेवत आमचा वेळ वाया घालवू नका, असे सांगत अक्षरश: शेतकऱ्यांना अपमानीत करून परत करीत आहेत.अखेर गहाणाचाच आधार शेतकऱ्यांकडे सोन्याचे दागिने आहे. त्यांनी ते गहाण करून शेतीची तयारी केली मात्र ज्यांच्याकडे ती व्यवस्थत्त नाही त्यांना कृषी केंद्र चालक उधार देत नाही. सावकार दारात उभा करीत नाही व बँका ता खेकसावून धावत असल्याने शेतकरी अडचणीत आहे. ‘त्या’ आठकोटींची प्रतीक्षा कायमच परिसरातील ४०० शेतकऱ्यांचे आठ कोटी श्रीकृष्ण जिनिंगचा संचालक सुनील टालाटुले याच्याकडे आहे. कापूस विकून त्यांना हक्काचे पैसे मिळाले नाही. महाराष्ट्र राज्य पणन मंडळ बाजार समितीला बिनव्याजी कर्ज देणार होते. ती रक्कम मिळाली नसल्याने शेतकऱ्यांचा जीव ऐन हंगामात टांगणीला लागला आहे.