शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

पुनर्गठनाच्या नावावर शेतकऱ्यांची थट्टा

By admin | Updated: June 24, 2016 02:13 IST

पावसाच्या सरी आल्या आणि शेतकरी लगबगीने कामाला लागला. काहींनी कपाशीची तर अनेकांनी सोयाबीनची तजवीज केली.

बँकांची मनमानी: लाखोंच्या शेतीमालकाला अपमानास्पद वागणूकसेलू : पावसाच्या सरी आल्या आणि शेतकरी लगबगीने कामाला लागला. काहींनी कपाशीची तर अनेकांनी सोयाबीनची तजवीज केली. ज्यांची आर्थिक क्षमता नाही व कृषी केंद्र चालक उधार देत नाही, त्यांनी बँकेत चकरा मारणे सुरूच आहे. त्यांच्या कर्जाचे पुनर्गठन नाकारून त्यांच्यावर बँकेचे अधिकारी खेकसावून धावत आहेत. शासनाच्या घोषणा ऐकायला गोड असल्या तरी कृतीत मात्र अतिशय कडू असल्याचे दिसत आहे. बँकेचे अधिकारी फक्त मागील वर्षीचे कर्ज थकीत आहे, त्यांचेच पुनर्गठन करून देत आहेत. इतरांशी बँक धड बोलालाही तयार नाही. बँकांच्या या व्यवहारामुळे शेतकऱ्यांची ऐन हंगामात घुमसट सुरू झाली आहे. गाठीला काहीच नसल्याने पेरण्या कशा कराव्या, या संकटात शेतकरी सापडला आहे. सततच्या नापिकीने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती एकदम खालावली आहे. उत्पन्न व खर्चाचा मेळ लागत नसल्याने कोणतेही कार्य शेवटास जात नाही. कर्जाचा डोंगर मात्र वाढत आहे. बँकेतून कर्जाचे पुनर्गठन होईल, या आशेवर शेतकरी आवश्यक कागदपत्रे घेवून बँकेत गेल्यावर तेथील अधिकारी व कर्मचारी त्यांच्याकडे ढुंकूनही पहायला तयार नाही, याचा अनुभव त्यांना आला. लाखो रुपये किंमतीची जमीन असताना बँकेत हजाराचीही पत नसल्याचे शेतकऱ्यांना वाटत आहे. शेतकऱ्यांना राष्ट्रीयत बँका अंगावर खेकसत अक्षरशा हातधरून बाहेर काढण्याची भाषा करीत असल्याचे डोळ्यात पाणी आणून शेतकरी सांगत आहेत. कर्जपुनर्गठन फक्त मागील वर्षी थकीत खातेदारांचेच केल्या जात आहे. इतरांना वरिष्ठ स्तरावरून आदेश नसल्याचे सांगितल्या जाते. वर्धा जिल्ह्यातील काही ठिकाणच्या राष्ट्रीयकृत बँकेकडून थकीत कर्जदारांचे ही कर्ज पुनर्गठीत करून त्याला कर्ज दिल्या जात आहे; मात्र सेलूच्या बँका कानावर हात ठेवत आमचा वेळ वाया घालवू नका, असे सांगत अक्षरश: शेतकऱ्यांना अपमानीत करून परत करीत आहेत.अखेर गहाणाचाच आधार शेतकऱ्यांकडे सोन्याचे दागिने आहे. त्यांनी ते गहाण करून शेतीची तयारी केली मात्र ज्यांच्याकडे ती व्यवस्थत्त नाही त्यांना कृषी केंद्र चालक उधार देत नाही. सावकार दारात उभा करीत नाही व बँका ता खेकसावून धावत असल्याने शेतकरी अडचणीत आहे. ‘त्या’ आठकोटींची प्रतीक्षा कायमच परिसरातील ४०० शेतकऱ्यांचे आठ कोटी श्रीकृष्ण जिनिंगचा संचालक सुनील टालाटुले याच्याकडे आहे. कापूस विकून त्यांना हक्काचे पैसे मिळाले नाही. महाराष्ट्र राज्य पणन मंडळ बाजार समितीला बिनव्याजी कर्ज देणार होते. ती रक्कम मिळाली नसल्याने शेतकऱ्यांचा जीव ऐन हंगामात टांगणीला लागला आहे.