शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

पुनर्गठनाच्या नावावर शेतकऱ्यांची थट्टा

By admin | Updated: June 24, 2016 02:13 IST

पावसाच्या सरी आल्या आणि शेतकरी लगबगीने कामाला लागला. काहींनी कपाशीची तर अनेकांनी सोयाबीनची तजवीज केली.

बँकांची मनमानी: लाखोंच्या शेतीमालकाला अपमानास्पद वागणूकसेलू : पावसाच्या सरी आल्या आणि शेतकरी लगबगीने कामाला लागला. काहींनी कपाशीची तर अनेकांनी सोयाबीनची तजवीज केली. ज्यांची आर्थिक क्षमता नाही व कृषी केंद्र चालक उधार देत नाही, त्यांनी बँकेत चकरा मारणे सुरूच आहे. त्यांच्या कर्जाचे पुनर्गठन नाकारून त्यांच्यावर बँकेचे अधिकारी खेकसावून धावत आहेत. शासनाच्या घोषणा ऐकायला गोड असल्या तरी कृतीत मात्र अतिशय कडू असल्याचे दिसत आहे. बँकेचे अधिकारी फक्त मागील वर्षीचे कर्ज थकीत आहे, त्यांचेच पुनर्गठन करून देत आहेत. इतरांशी बँक धड बोलालाही तयार नाही. बँकांच्या या व्यवहारामुळे शेतकऱ्यांची ऐन हंगामात घुमसट सुरू झाली आहे. गाठीला काहीच नसल्याने पेरण्या कशा कराव्या, या संकटात शेतकरी सापडला आहे. सततच्या नापिकीने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती एकदम खालावली आहे. उत्पन्न व खर्चाचा मेळ लागत नसल्याने कोणतेही कार्य शेवटास जात नाही. कर्जाचा डोंगर मात्र वाढत आहे. बँकेतून कर्जाचे पुनर्गठन होईल, या आशेवर शेतकरी आवश्यक कागदपत्रे घेवून बँकेत गेल्यावर तेथील अधिकारी व कर्मचारी त्यांच्याकडे ढुंकूनही पहायला तयार नाही, याचा अनुभव त्यांना आला. लाखो रुपये किंमतीची जमीन असताना बँकेत हजाराचीही पत नसल्याचे शेतकऱ्यांना वाटत आहे. शेतकऱ्यांना राष्ट्रीयत बँका अंगावर खेकसत अक्षरशा हातधरून बाहेर काढण्याची भाषा करीत असल्याचे डोळ्यात पाणी आणून शेतकरी सांगत आहेत. कर्जपुनर्गठन फक्त मागील वर्षी थकीत खातेदारांचेच केल्या जात आहे. इतरांना वरिष्ठ स्तरावरून आदेश नसल्याचे सांगितल्या जाते. वर्धा जिल्ह्यातील काही ठिकाणच्या राष्ट्रीयकृत बँकेकडून थकीत कर्जदारांचे ही कर्ज पुनर्गठीत करून त्याला कर्ज दिल्या जात आहे; मात्र सेलूच्या बँका कानावर हात ठेवत आमचा वेळ वाया घालवू नका, असे सांगत अक्षरश: शेतकऱ्यांना अपमानीत करून परत करीत आहेत.अखेर गहाणाचाच आधार शेतकऱ्यांकडे सोन्याचे दागिने आहे. त्यांनी ते गहाण करून शेतीची तयारी केली मात्र ज्यांच्याकडे ती व्यवस्थत्त नाही त्यांना कृषी केंद्र चालक उधार देत नाही. सावकार दारात उभा करीत नाही व बँका ता खेकसावून धावत असल्याने शेतकरी अडचणीत आहे. ‘त्या’ आठकोटींची प्रतीक्षा कायमच परिसरातील ४०० शेतकऱ्यांचे आठ कोटी श्रीकृष्ण जिनिंगचा संचालक सुनील टालाटुले याच्याकडे आहे. कापूस विकून त्यांना हक्काचे पैसे मिळाले नाही. महाराष्ट्र राज्य पणन मंडळ बाजार समितीला बिनव्याजी कर्ज देणार होते. ती रक्कम मिळाली नसल्याने शेतकऱ्यांचा जीव ऐन हंगामात टांगणीला लागला आहे.