शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

कनिष्ठ महाविद्यालयांचा बायोमेट्रिक हजेरीला ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 23:33 IST

कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेत नाममात्र प्रवेश घ्यायचा व कोचिंग क्लासेसला नियमित उपस्थित रहायचे, अशा दांडीबहाद्दर विद्यार्थ्यांना आळा घालण्यासाठी शासनाने कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्याचा निर्णय घेतला; ......

ठळक मुद्देशिक्षण विभागाचे दुर्लक्ष : संस्थाचालकांचं ‘चांगभलं’

आनंद इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेत नाममात्र प्रवेश घ्यायचा व कोचिंग क्लासेसला नियमित उपस्थित रहायचे, अशा दांडीबहाद्दर विद्यार्थ्यांना आळा घालण्यासाठी शासनाने कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्याचा निर्णय घेतला; पण दोन महिन्याच्या कालावधीनंतरही शिक्षण विभागाच्या नाकर्तेपणामुळे अद्यापही कनिष्ठ महाविद्यालयांनी याची अंमलबजावनी केली नाही.कनिष्ठ महाविद्यालयांतील विज्ञान शाखेचे विद्यार्थी महाविद्यालयात नियमित उपस्थित न राहता, कोचिंग क्लासमध्ये नियमित उपस्थित राहतात. केवळ प्रात्याक्षिक परीक्षेसाठी महाविद्यालयात जाऊन ७५ टक्के हजेरी महाविद्यालयाकडून लावली जातात. परिणामी महाविद्यालयात न जाताही विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण होतो. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची बायोमेट्रीक्स पद्धतीने हजेरी सुरु करण्याचा निर्णय १५ जूनला शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्यावतीने घेण्यात आला. त्यानुसार राज्यातील सर्व खाजगी अनुदानित, विना अनुदानित, स्वयं अर्थसाहाय्यित कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रीक पद्धतीने सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र, अद्यापही ही योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविली गेली नसल्याचे चित्र बघावयास मिळते.माध्यमिक शिक्षण विभाग कर्तव्यशून्यआदेश निर्गमित झाल्यापासून एक महिन्याच्या आत कनिष्ठ महाविद्यालयाने आवश्यक ती यंत्रसामुग्री स्वत: उपलब्ध करुन घ्यावी, असे शासनाचे आदेश आहेत. तसेच संबंधित माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी, शिक्षण निरिक्षक यांनी कनिष्ठ महाविद्यालयात बायोमेट्रीक पद्धत सुरु करण्यात आली किंवा नाही याबाबत तपासणी करुन त्यासंदर्भातील अहवाल शासनास सादर करावा. महाविद्यालयांना आकस्मिक भेट देऊन बायोमेट्रीक उपस्थितीचा वेळोवेळी आढावा घ्यावा. असे आदेशित करण्यात आले आहे. परंतु, वर्ध्याच्या जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे अद्यापही याबाबत कुठलीही माहिती नाही. याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात विचारपूस केली तर एकमेकांकडे बोट दाखविण्यातच येथील अधिकारी धन्यता मानतात.महाविद्यालयाची मान्यता काढणारजी कनिष्ठ महाविद्यालये बायोमेट्रीक उपस्थितीबाबत कार्यवाही करणार नाही. त्या महाविद्यालयाविरुद्ध मान्यता काढून घेण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमुद केलेले आहे. मात्र, शिक्षण विभागही हातावर हात देऊन असल्याने महाविद्यालयही सुस्तावलेले आहे. या प्रकारावरुन शिक्षण विभागाकडूनच महाविद्यालयांना संमती असल्याचे दिसून येत आहे.पहिल्या टप्प्यातच उडला बोजवाराही योजना टप्प्या-टप्प्याने कार्यन्वित करण्याचा निर्णय घेत २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाकरिता मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक व औरंगाबाद या पाच विभागातील सर्व विज्ञान शाखेच्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रीक पध्दतीने घ्यायचे निर्देश दिले होते. परंतू या पहिल्या टप्प्यातच या योजनेचा बोजवारा उडाल्याचे दिसून येते. त्यामुळे ही योजना कितपत यशस्वी होते हा प्रश्नच आहे.यंदाही शिकवणी वर्गांसोबत करारचकाही कनिष्ठ महाविद्यालयांसोबत माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे हितसंबंध जुळलेले असल्याने जिल्ह्यात अद्यापही ही योजना राबविल्या गेली नाही. त्यामुळे यावर्षीही काही महाविद्यालयांनी १० ते १५ हजार रुपये प्रती प्रवेशप्रमाणे करार केल्याचे चित्र आहे. इतकेच नाही एका महाविद्यालयात महाविद्यालयीन वेळेत चक्क शिकवणीवर्गच भरतात. त्यामुळे महाविद्यालय आहे की शिकवणीवर्ग असा प्रश्न निर्माण होतो. पालकही याला पसंती देत असल्याने धनदांडग्या पालकाच्या पाल्याचा हा अनधिकृत प्रकार शैक्षणिक भवितव्य धोक्यात घालणारा आहे.

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी